शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महामंडळावरील नियुक्त्यांचा पेच : काँग्रेस प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षांमध्येच रस्सीखेच; इच्छुकांना मनस्ताप, नियुक्त्या रखडल्या

By गौरीशंकर घाळे | Updated: May 2, 2022 06:07 IST

काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रदेश प्रभारी एच. के. पाटील व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात एकमत होत नसल्यानेच हा विषय रेंगाळला असल्याची माहिती आहे.

गौरीशंकर घाळे मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश प्रभारींमधील संघर्षामुळे महामंडळ नियुक्त्यांचा विषयच पुढे सरकत नसल्याचे चित्र सध्या काँग्रेसमध्ये आहे. आघाडीच्या राजकारणामुळे स्थानिक पातळीवर सहकारी पक्षाची कुरघोडी सहन करावी लागते. दुसरीकडे एकमत होत नसल्याने हक्काच्या महामंडळांचा तिढा सुटत नसल्याने इच्छुकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. राज्यातील महामंडळावरील नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यातही चार-चार बैठका आणि दिल्लीवाऱ्या झाल्या तरी काँग्रेसच्या नावांची गाडी पुढे सरकत नाही. 

काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रदेश प्रभारी एच. के. पाटील व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात एकमत होत नसल्यानेच हा विषय रेंगाळला असल्याची माहिती आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी सहमतीने काही नावे नक्की करावीत आणि प्रदेश प्रभारींनी अंतिम नावावर दिल्लीवरून मान्यतेची मोहोर आणावी, असा शिरस्ता आहे. हाच शिरस्ता पाळला जात नसल्याने सगळा खोळंबा झाल्याचे बोलले जाते. 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण या नेत्यांच्या चर्चेतून नावे ठरवावीत आणि पुढच्या टप्प्यात ही नावे प्रदेश प्रभारींकडे जायला हवीत. मात्र,  प्रदेशाध्यक्षांची आक्रमकता  व आग्रहामुळे विषय पुढे सरकलेला नाही. प्रदेशाध्यक्षांनी दोन वेळा दिल्लीवारी करीत विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात त्यांना यश मिळाले नाही. आपल्याच स्तरावर नावे अंतिम करण्याचा आग्रह प्रदेशाध्यक्षांनी धरल्याने प्रभारीही नाराज आहेत. 

प्रदेश प्रभारी व प्रदेशाध्यक्षांमधील वाढता तणाव वेगवेगळ्या कारणांनी समोरही येत आहे. अलीकडेच काँग्रेसची डिजिटल सदस्य नोंदणीची राष्ट्रव्यापी मोहीम पार पडली. यात प्रदेश काँग्रेसची नोंदणी समाधानकारक नसल्याबद्दल प्रभारी एच. के. पाटील यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. नोंदणीचा वेग वाढविण्यासाठी कान टोचूनही ठराविक नेत्यांच्या पट्ट्यातच जाणीवपूर्वक प्रयत्न झाले होते. सदस्य नोंदणी प्रदेशाध्यक्षांनी आघाडी घेणे अपेक्षित असताना अन्य नेत्यांची कामगिरी उजवी ठरल्याने प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारींमध्ये आलबेल नसल्याचे बोलले जात आहे. 

अजून किती काळ वाट पाहायची?महाविकास आघाडीच्या राजकारणात सहकारी पक्षांकडून होणारी कोंडी आता नित्याची झाली आहे. स्थानिक पातळीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून डावलले जाते. महामंडळाच्या दिलासा मिळेल अशी अपेक्षा असताना पक्षांतर्गत कारणाने त्यातही विलंब होत असल्याने अजून किती काळ वाट पाहायची, असा प्रश्न केला जात आहे.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस