शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचे उल्लंघन करून अलमट्टी धरण ५२ टक्के भरले; कर्नाटकच्या कृतीने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 13:08 IST

अलमट्टी धरणात २३ हजार २३० क्युसेक पाण्याची आवक असून, केवळ १० हजार क्युसेक विसर्ग

सांगली : अलमट्टी धरण जून महिन्यात ४७ टक्क्यांपर्यंत भरण्यास केंद्रीय जलआयोगाने परवानगी दिली आहे; पण कर्नाटक सरकारच्या जलसंपदा विभागाने मान्सून पावसाचा जोर वाढण्यापूर्वीच अलमट्टी धरणात ५२ टक्के पाणीसाठा ठेवून जलआयोगाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. कर्नाटक सरकारच्या या भूमिकेमुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील कृष्णा, पंचगंगा, वारणा नदीकाठच्या नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.कर्नाटकातील अलमट्टी धरणाची १२३ टीएमसी म्हणजे ५१९.६ मीटरपर्यंत पाणीसाठवण क्षमता आहे. या धरणामध्ये कुठल्या महिन्यात किती पाणीसाठा केला पाहिजे, याबद्दल केंद्रीय जलआयोगाने नियम ठरविले आहेत. त्यानुसार जूनअखेरपर्यंत ५७ टीएमसी म्हणजेच ५१३.६० मीटर म्हणजेच ४७ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा ठेवणे गरजेचे आहे. असे असतानाही अलमट्टी धरण व्यवस्थापनाने दि. १५ जून रोजी धरणात ६४.०३ टीएमसी पाणीसाठा ठेवला असून, ५२ टक्के धरण भरले आहे. सध्याच्या पाणीसाठ्याची आकडेवारी केंद्रीय जलआयोगाच्या नियमाला धरून नाही. सध्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील धरण क्षेत्रात पावसाचा फारसा जोर नाही. येत्या आठवड्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच अलमट्टी धरण ५२ टक्के भरल्यामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील कृष्णा, वारणा, पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अलमट्टी धरणात २३ हजार २३० क्युसेक पाण्याची आवक असून, केवळ १० हजार क्युसेक विसर्ग आहे. मान्सूनचा जोर वाढल्यानंतर येणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन अलमट्टी धरणाचे अधिकारी कसे करणार आहेत, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.

अलमट्टी धरणाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय : चंद्रशेखर पाटाेळेपावसाळा सुरू झाल्यापासून कर्नाटकातील अलमट्टी धरण व्यवस्थापन विभागाशी आम्ही संपर्कात आहोत. आपल्या पाटबंधारे विभागाचे अधिकारीही तिथे नियुक्त केले आहेत. जून महिन्यात अलमट्टी धरण व्यवस्थापनाने ४७ टक्के पाणीसाठा ठेवला पाहिजे; पण त्यांनी त्यापेक्षा जास्त ठेवल्याबद्दल अलमट्टी येथील अधिकाऱ्यांना कल्पना दिली आहे. ते पाण्याचा विसर्ग वाढवतील, असा विश्वासही पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी व्यक्त केला.

अलमट्टी धरण व्यवस्थापनच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय जलआयोगाच्या नियमांचे पालन केले नाही. ४७ टक्के पाणीसाठा ठेवण्याऐवजी ५२ टक्के पाणीसाठा ठेवला आहे. याबद्दल राज्य सरकारने कर्नाटक सरकारला नोटीस काढली पाहिजे. तसेच केंद्रीय जलआयोगाकडेही तक्रार केली पाहिजे. आमच्या सामाजिक संस्थेतर्फे केंद्रीय जलआयोगाकडे तक्रार करणार आहे. -सर्जेराव पाटील, निमंत्रक, कृष्णा महापूर नियंत्रण समिती