शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
4
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
7
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
8
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
9
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
10
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
11
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
12
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
13
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
14
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
15
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
16
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
17
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
18
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
19
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
20
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी

नियमांचे उल्लंघन करून अलमट्टी धरण ५२ टक्के भरले; कर्नाटकच्या कृतीने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 13:08 IST

अलमट्टी धरणात २३ हजार २३० क्युसेक पाण्याची आवक असून, केवळ १० हजार क्युसेक विसर्ग

सांगली : अलमट्टी धरण जून महिन्यात ४७ टक्क्यांपर्यंत भरण्यास केंद्रीय जलआयोगाने परवानगी दिली आहे; पण कर्नाटक सरकारच्या जलसंपदा विभागाने मान्सून पावसाचा जोर वाढण्यापूर्वीच अलमट्टी धरणात ५२ टक्के पाणीसाठा ठेवून जलआयोगाच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. कर्नाटक सरकारच्या या भूमिकेमुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील कृष्णा, पंचगंगा, वारणा नदीकाठच्या नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.कर्नाटकातील अलमट्टी धरणाची १२३ टीएमसी म्हणजे ५१९.६ मीटरपर्यंत पाणीसाठवण क्षमता आहे. या धरणामध्ये कुठल्या महिन्यात किती पाणीसाठा केला पाहिजे, याबद्दल केंद्रीय जलआयोगाने नियम ठरविले आहेत. त्यानुसार जूनअखेरपर्यंत ५७ टीएमसी म्हणजेच ५१३.६० मीटर म्हणजेच ४७ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा ठेवणे गरजेचे आहे. असे असतानाही अलमट्टी धरण व्यवस्थापनाने दि. १५ जून रोजी धरणात ६४.०३ टीएमसी पाणीसाठा ठेवला असून, ५२ टक्के धरण भरले आहे. सध्याच्या पाणीसाठ्याची आकडेवारी केंद्रीय जलआयोगाच्या नियमाला धरून नाही. सध्या कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील धरण क्षेत्रात पावसाचा फारसा जोर नाही. येत्या आठवड्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच अलमट्टी धरण ५२ टक्के भरल्यामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील कृष्णा, वारणा, पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अलमट्टी धरणात २३ हजार २३० क्युसेक पाण्याची आवक असून, केवळ १० हजार क्युसेक विसर्ग आहे. मान्सूनचा जोर वाढल्यानंतर येणाऱ्या पाण्याचे व्यवस्थापन अलमट्टी धरणाचे अधिकारी कसे करणार आहेत, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.

अलमट्टी धरणाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय : चंद्रशेखर पाटाेळेपावसाळा सुरू झाल्यापासून कर्नाटकातील अलमट्टी धरण व्यवस्थापन विभागाशी आम्ही संपर्कात आहोत. आपल्या पाटबंधारे विभागाचे अधिकारीही तिथे नियुक्त केले आहेत. जून महिन्यात अलमट्टी धरण व्यवस्थापनाने ४७ टक्के पाणीसाठा ठेवला पाहिजे; पण त्यांनी त्यापेक्षा जास्त ठेवल्याबद्दल अलमट्टी येथील अधिकाऱ्यांना कल्पना दिली आहे. ते पाण्याचा विसर्ग वाढवतील, असा विश्वासही पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी व्यक्त केला.

अलमट्टी धरण व्यवस्थापनच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय जलआयोगाच्या नियमांचे पालन केले नाही. ४७ टक्के पाणीसाठा ठेवण्याऐवजी ५२ टक्के पाणीसाठा ठेवला आहे. याबद्दल राज्य सरकारने कर्नाटक सरकारला नोटीस काढली पाहिजे. तसेच केंद्रीय जलआयोगाकडेही तक्रार केली पाहिजे. आमच्या सामाजिक संस्थेतर्फे केंद्रीय जलआयोगाकडे तक्रार करणार आहे. -सर्जेराव पाटील, निमंत्रक, कृष्णा महापूर नियंत्रण समिती