शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

कंपनीचा डेटा असतो, मग देशाचा का नको ? सुनील देवधर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 19:48 IST

बहुसंख्य कोण आहेत त्यावरून समाजाचे चारित्र्य घडते.

ठळक मुद्दे‘नागरित्व संशोधन कायदा’ या विषयावर सुनील देवधर यांचे व्याख्यान आपलेच काही लोक सत्य, अहिंसा, दया, क्षमा, शांती यात आहेत अडकले

पुणे: कोणत्याही देशाची भावना ही तिथल्या बहुसंख्य समाजाची भावना काय आहे तीच असते. इथे हिंदू बहुसंख्य आहेत तर तीच इथली भावना आहे. कंपनीचे रजीस्टर असते तर देशाचे का नको? त्यामुळे एनआरसी, सीएए देशासाठी व देशाच्या सुरक्षेसाठीच आहे हे समजून घ्या असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांनी केले.डेक्कन एज्युकेशन सोसायटी व पद्मवती बनहट्टी प्रतिष्ठान यांनी बीएमसीसीच्या टाटा सभागृहात नागरिकत्व संशोधन या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. देवधर म्हणाले, काश्मिरमधून पंडिताना हाकलून दिले, त्यावेळी कोणाला काही म्हणावेसे वाटले नाही. या देशात किमान ५ कोटी घुसखोर आहेत, त्यातील दोन सव्वादोन लाख ख्रिश्चन आहेत, बाकी सगळे बांगला देशी घुसखोर आहेत. त्यांना हाकलून नाही लावायचे तर काय करायचे? एनआरसी व सीएए त्यासाठीच आहे. मात्र त्याबाबत अपप्रचार केला जात आहे. कोणताही कंपनी किंवा अगदी उद्योग असला तर तिथे रजिस्टर असते. एखाद्या महाविद्यालयात ५ हजार विद्यार्थी आहेत व तिथे १०० जण जास्तीचे येऊन आम्हीही बसतो म्हणाले तर बसू दिले जाईल का? देश मग काय वेगळा आहे असा सवाल करून देवधर म्हणाले, देशातील नागरिकांचीही अशी नोंद हवी. हे आम्ही नाही तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच सांगितले. आम्ही ते करतो आहोत. काँग्रेसवाल्यांना इतक्या वर्षात जे जमले नाही ते नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी करून दाखवले. योगी आदित्यनाथ तेच करत आहेत. त्यांच्याबरोबर राहिले पाहिजे. हिंदू असाल तर ते अभिमानानेच सांगितले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वात मोठे हिंदुत्ववादी. त्यांनी सांगितले, मी हिंदू असले तरी हिंदू म्हणून मरणार नाही. त्यांना मुस्लिम ख्रिश्चन यांच्याकडून लगेच ऑफर आल्या. मात्र त्यांनी मी असे केले तर माझा बांधव या जमिनीपासून तुटेल असे सांगत त्या नाकारल्या व भारतीय भूमीतील बौद्ध धर्म स्विकारला. विवेकानंदानी जगाला सांगितले, होय, मी हिंदू आहे. आपलेच काही लोक सत्य, अहिंसा, दया, क्षमा, शांती यात अडकले आहेत. काश्मिरी पंडिताना कोणी दया दाखवली नाही. आम्हीही ती आता कोणाला दाखवणार नाही.प्राचार्य चंद्रकांत रावळ यांनी आभार मानले. शरद कुंटे,महेश आठवले, आदेश गोखले व्यासपीठावर उपस्थित होते. 

टॅग्स :Puneपुणेcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपाPakistanपाकिस्तानBangladeshबांगलादेश