शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

कंपनीचा डेटा असतो, मग देशाचा का नको ? सुनील देवधर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 19:48 IST

बहुसंख्य कोण आहेत त्यावरून समाजाचे चारित्र्य घडते.

ठळक मुद्दे‘नागरित्व संशोधन कायदा’ या विषयावर सुनील देवधर यांचे व्याख्यान आपलेच काही लोक सत्य, अहिंसा, दया, क्षमा, शांती यात आहेत अडकले

पुणे: कोणत्याही देशाची भावना ही तिथल्या बहुसंख्य समाजाची भावना काय आहे तीच असते. इथे हिंदू बहुसंख्य आहेत तर तीच इथली भावना आहे. कंपनीचे रजीस्टर असते तर देशाचे का नको? त्यामुळे एनआरसी, सीएए देशासाठी व देशाच्या सुरक्षेसाठीच आहे हे समजून घ्या असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांनी केले.डेक्कन एज्युकेशन सोसायटी व पद्मवती बनहट्टी प्रतिष्ठान यांनी बीएमसीसीच्या टाटा सभागृहात नागरिकत्व संशोधन या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. देवधर म्हणाले, काश्मिरमधून पंडिताना हाकलून दिले, त्यावेळी कोणाला काही म्हणावेसे वाटले नाही. या देशात किमान ५ कोटी घुसखोर आहेत, त्यातील दोन सव्वादोन लाख ख्रिश्चन आहेत, बाकी सगळे बांगला देशी घुसखोर आहेत. त्यांना हाकलून नाही लावायचे तर काय करायचे? एनआरसी व सीएए त्यासाठीच आहे. मात्र त्याबाबत अपप्रचार केला जात आहे. कोणताही कंपनी किंवा अगदी उद्योग असला तर तिथे रजिस्टर असते. एखाद्या महाविद्यालयात ५ हजार विद्यार्थी आहेत व तिथे १०० जण जास्तीचे येऊन आम्हीही बसतो म्हणाले तर बसू दिले जाईल का? देश मग काय वेगळा आहे असा सवाल करून देवधर म्हणाले, देशातील नागरिकांचीही अशी नोंद हवी. हे आम्ही नाही तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच सांगितले. आम्ही ते करतो आहोत. काँग्रेसवाल्यांना इतक्या वर्षात जे जमले नाही ते नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी करून दाखवले. योगी आदित्यनाथ तेच करत आहेत. त्यांच्याबरोबर राहिले पाहिजे. हिंदू असाल तर ते अभिमानानेच सांगितले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वात मोठे हिंदुत्ववादी. त्यांनी सांगितले, मी हिंदू असले तरी हिंदू म्हणून मरणार नाही. त्यांना मुस्लिम ख्रिश्चन यांच्याकडून लगेच ऑफर आल्या. मात्र त्यांनी मी असे केले तर माझा बांधव या जमिनीपासून तुटेल असे सांगत त्या नाकारल्या व भारतीय भूमीतील बौद्ध धर्म स्विकारला. विवेकानंदानी जगाला सांगितले, होय, मी हिंदू आहे. आपलेच काही लोक सत्य, अहिंसा, दया, क्षमा, शांती यात अडकले आहेत. काश्मिरी पंडिताना कोणी दया दाखवली नाही. आम्हीही ती आता कोणाला दाखवणार नाही.प्राचार्य चंद्रकांत रावळ यांनी आभार मानले. शरद कुंटे,महेश आठवले, आदेश गोखले व्यासपीठावर उपस्थित होते. 

टॅग्स :Puneपुणेcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपाPakistanपाकिस्तानBangladeshबांगलादेश