शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

कंपनीचा डेटा असतो, मग देशाचा का नको ? सुनील देवधर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 19:48 IST

बहुसंख्य कोण आहेत त्यावरून समाजाचे चारित्र्य घडते.

ठळक मुद्दे‘नागरित्व संशोधन कायदा’ या विषयावर सुनील देवधर यांचे व्याख्यान आपलेच काही लोक सत्य, अहिंसा, दया, क्षमा, शांती यात आहेत अडकले

पुणे: कोणत्याही देशाची भावना ही तिथल्या बहुसंख्य समाजाची भावना काय आहे तीच असते. इथे हिंदू बहुसंख्य आहेत तर तीच इथली भावना आहे. कंपनीचे रजीस्टर असते तर देशाचे का नको? त्यामुळे एनआरसी, सीएए देशासाठी व देशाच्या सुरक्षेसाठीच आहे हे समजून घ्या असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांनी केले.डेक्कन एज्युकेशन सोसायटी व पद्मवती बनहट्टी प्रतिष्ठान यांनी बीएमसीसीच्या टाटा सभागृहात नागरिकत्व संशोधन या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. देवधर म्हणाले, काश्मिरमधून पंडिताना हाकलून दिले, त्यावेळी कोणाला काही म्हणावेसे वाटले नाही. या देशात किमान ५ कोटी घुसखोर आहेत, त्यातील दोन सव्वादोन लाख ख्रिश्चन आहेत, बाकी सगळे बांगला देशी घुसखोर आहेत. त्यांना हाकलून नाही लावायचे तर काय करायचे? एनआरसी व सीएए त्यासाठीच आहे. मात्र त्याबाबत अपप्रचार केला जात आहे. कोणताही कंपनी किंवा अगदी उद्योग असला तर तिथे रजिस्टर असते. एखाद्या महाविद्यालयात ५ हजार विद्यार्थी आहेत व तिथे १०० जण जास्तीचे येऊन आम्हीही बसतो म्हणाले तर बसू दिले जाईल का? देश मग काय वेगळा आहे असा सवाल करून देवधर म्हणाले, देशातील नागरिकांचीही अशी नोंद हवी. हे आम्ही नाही तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच सांगितले. आम्ही ते करतो आहोत. काँग्रेसवाल्यांना इतक्या वर्षात जे जमले नाही ते नरेंद्र मोदी व अमित शहा यांनी करून दाखवले. योगी आदित्यनाथ तेच करत आहेत. त्यांच्याबरोबर राहिले पाहिजे. हिंदू असाल तर ते अभिमानानेच सांगितले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वात मोठे हिंदुत्ववादी. त्यांनी सांगितले, मी हिंदू असले तरी हिंदू म्हणून मरणार नाही. त्यांना मुस्लिम ख्रिश्चन यांच्याकडून लगेच ऑफर आल्या. मात्र त्यांनी मी असे केले तर माझा बांधव या जमिनीपासून तुटेल असे सांगत त्या नाकारल्या व भारतीय भूमीतील बौद्ध धर्म स्विकारला. विवेकानंदानी जगाला सांगितले, होय, मी हिंदू आहे. आपलेच काही लोक सत्य, अहिंसा, दया, क्षमा, शांती यात अडकले आहेत. काश्मिरी पंडिताना कोणी दया दाखवली नाही. आम्हीही ती आता कोणाला दाखवणार नाही.प्राचार्य चंद्रकांत रावळ यांनी आभार मानले. शरद कुंटे,महेश आठवले, आदेश गोखले व्यासपीठावर उपस्थित होते. 

टॅग्स :Puneपुणेcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपाPakistanपाकिस्तानBangladeshबांगलादेश