शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

पोलीस भरतीतील मृत्यूंची जबाबदारी आयुक्तांनी स्वीकारली

By admin | Updated: June 19, 2014 02:58 IST

पोलीस भरती प्रक्रियेत पाच तरुणांचा मृत्यू होणे ही अत्यंत खेदाची बाब आहे. मुंबई पोलीस दलाचा प्रमुख म्हणून याची सर्वस्वी जबाबदारी मी स्वीकारतो

मुंबई : पोलीस भरती प्रक्रियेत पाच तरुणांचा मृत्यू होणे ही अत्यंत खेदाची बाब आहे. मुंबई पोलीस दलाचा प्रमुख म्हणून याची सर्वस्वी जबाबदारी मी स्वीकारतो. जेव्हा मुंबई पोलीस कौतुकास्पद कामगिरी करतात तेव्हा त्याचे श्रेय मलाच मिळते. मग या दुर्दैवी घटनेची जबाबदारी मी कशी टाळू शकेन, अशा शब्दांत मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया घाटकोपरच्या भरती केंद्रावर व्यक्त झाले.आठवडाभरात घाटकोपरच्या केंद्रावर चार तर नवी मुंबईतील केंद्रावर एक अशा एकूण पाच उमेदवारांचा भरती प्रक्रियेतील पाच किलोमीटर धावण्याच्या शर्यतीत मृत्यू झाला. त्यानंतर पहिल्यांदाच मुंबई पोलिसांनी अधिकृतरीत्या आपली भूमिका मांडली. आयुक्त मारियांसह अप्पर महासंचालक (प्रशिक्षण) एस.पी. गुप्ता यांनी घाटकोपर केंद्राला भेट दिली. तेथील व्यवस्था, योजनांचा आढावा घेतला.या वेळी माध्यमांशी बोलताना मारिया म्हणाले, राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेसाठी ३२ मिनिटांमध्ये पाच किलोमीटर धावण्याची चाचणी २०११पासून घेतली जाऊ लागली. तेव्हापासून यंदाची तिसरी भरती प्रक्रिया आहे. या तिन्ही प्रक्रिया उन्हाळ्याच्याच मोसमात याच पूर्व द्रुतगती मार्गावरील सर्व्हिस रोडवर पार पडल्या. गेल्या वर्षी ६८ हजार उमेदवार याच सर्व्हिस रोडवर पाच किलोमीटर अंतर धावले. मात्र तेव्हा अशी एकही घटना घडली नव्हती. यंदाच्या भरती प्रक्रियेत तब्बल १ लाख ६ हजार उमेदवार सहभागी झाले आहेत. त्यापैकी ३० हजार १९६ उमेदवारांनी आजपर्यंत ही चाचणी पूर्ण केलेली आहे. उर्वरित उमेदवार ही चाचणी पूर्ण करणार आहेत. मात्र ज्या पाच उमेदवारांचे मृत्यू झाले ते सकाळच्या सत्रात झाले. उन्हाळ्याच्याच हंगामात भरती प्रक्रिया का, या प्रश्नावर उत्तर देताना मारिया म्हणाले, लोकसभा निवडणुकांच्या बंदोबस्तासाठी बहुतांश मुंबई पोलीस दल रस्त्यावर होते. काही दिवसांत पाऊस सुरू होईल. त्यातच गणेशोत्सव, ईद, रमझान, दिवाळी, नवरात्र हा सणांचा हंगाम सुरू होईल. त्यातच विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. या सर्व कार्यक्रमांच्या बंदोबस्तात पुन्हा मुंबई पोलीस व्यस्त होतील आणि वर्ष संपेल. गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त महाराष्ट्रातच पाच किलोमीटर धावण्याची चाचणी असते असे नाही. उलट निमलष्करी दल, इंडो तिबेटीयन सीमा पोलिसांसह छत्तीसगड पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत १५ किलोमीटर धावण्याची चाचणी होते. राजस्थान, उत्तराखंडसह अन्य राज्यांमध्ये हे अंतर १० किलोमीटर इतके असते आणि फक्त महाराष्ट्रातच उन्हाळी हंगामात ही प्रक्रिया घेतली जाते असेही नाही. महाराष्ट्रात पाच किलोमीटरचे अंतर धावण्यासाठी ३२ मिनिटांचा अवधी दिला जातो. मात्र अन्यत्र १०-१५ किलोमीटरसाठी २३ ते २४ मिनिटे इतकाच अवधी असतो, असा दावा मारिया यांनी केला. जे झाले ते दुर्दैवी होते, त्यासाठी मी कुटुंबीयांची माफी मागतो. मात्र भरती प्रक्रिया किंवा त्याचे नियम याला जबाबदार नाहीत, असे मारिया यांनी सांगितले. (प्रतिनिधी)