शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

पोलीस भरतीतील मृत्यूंची जबाबदारी आयुक्तांनी स्वीकारली

By admin | Updated: June 19, 2014 02:58 IST

पोलीस भरती प्रक्रियेत पाच तरुणांचा मृत्यू होणे ही अत्यंत खेदाची बाब आहे. मुंबई पोलीस दलाचा प्रमुख म्हणून याची सर्वस्वी जबाबदारी मी स्वीकारतो

मुंबई : पोलीस भरती प्रक्रियेत पाच तरुणांचा मृत्यू होणे ही अत्यंत खेदाची बाब आहे. मुंबई पोलीस दलाचा प्रमुख म्हणून याची सर्वस्वी जबाबदारी मी स्वीकारतो. जेव्हा मुंबई पोलीस कौतुकास्पद कामगिरी करतात तेव्हा त्याचे श्रेय मलाच मिळते. मग या दुर्दैवी घटनेची जबाबदारी मी कशी टाळू शकेन, अशा शब्दांत मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया घाटकोपरच्या भरती केंद्रावर व्यक्त झाले.आठवडाभरात घाटकोपरच्या केंद्रावर चार तर नवी मुंबईतील केंद्रावर एक अशा एकूण पाच उमेदवारांचा भरती प्रक्रियेतील पाच किलोमीटर धावण्याच्या शर्यतीत मृत्यू झाला. त्यानंतर पहिल्यांदाच मुंबई पोलिसांनी अधिकृतरीत्या आपली भूमिका मांडली. आयुक्त मारियांसह अप्पर महासंचालक (प्रशिक्षण) एस.पी. गुप्ता यांनी घाटकोपर केंद्राला भेट दिली. तेथील व्यवस्था, योजनांचा आढावा घेतला.या वेळी माध्यमांशी बोलताना मारिया म्हणाले, राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेसाठी ३२ मिनिटांमध्ये पाच किलोमीटर धावण्याची चाचणी २०११पासून घेतली जाऊ लागली. तेव्हापासून यंदाची तिसरी भरती प्रक्रिया आहे. या तिन्ही प्रक्रिया उन्हाळ्याच्याच मोसमात याच पूर्व द्रुतगती मार्गावरील सर्व्हिस रोडवर पार पडल्या. गेल्या वर्षी ६८ हजार उमेदवार याच सर्व्हिस रोडवर पाच किलोमीटर अंतर धावले. मात्र तेव्हा अशी एकही घटना घडली नव्हती. यंदाच्या भरती प्रक्रियेत तब्बल १ लाख ६ हजार उमेदवार सहभागी झाले आहेत. त्यापैकी ३० हजार १९६ उमेदवारांनी आजपर्यंत ही चाचणी पूर्ण केलेली आहे. उर्वरित उमेदवार ही चाचणी पूर्ण करणार आहेत. मात्र ज्या पाच उमेदवारांचे मृत्यू झाले ते सकाळच्या सत्रात झाले. उन्हाळ्याच्याच हंगामात भरती प्रक्रिया का, या प्रश्नावर उत्तर देताना मारिया म्हणाले, लोकसभा निवडणुकांच्या बंदोबस्तासाठी बहुतांश मुंबई पोलीस दल रस्त्यावर होते. काही दिवसांत पाऊस सुरू होईल. त्यातच गणेशोत्सव, ईद, रमझान, दिवाळी, नवरात्र हा सणांचा हंगाम सुरू होईल. त्यातच विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. या सर्व कार्यक्रमांच्या बंदोबस्तात पुन्हा मुंबई पोलीस व्यस्त होतील आणि वर्ष संपेल. गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त महाराष्ट्रातच पाच किलोमीटर धावण्याची चाचणी असते असे नाही. उलट निमलष्करी दल, इंडो तिबेटीयन सीमा पोलिसांसह छत्तीसगड पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत १५ किलोमीटर धावण्याची चाचणी होते. राजस्थान, उत्तराखंडसह अन्य राज्यांमध्ये हे अंतर १० किलोमीटर इतके असते आणि फक्त महाराष्ट्रातच उन्हाळी हंगामात ही प्रक्रिया घेतली जाते असेही नाही. महाराष्ट्रात पाच किलोमीटरचे अंतर धावण्यासाठी ३२ मिनिटांचा अवधी दिला जातो. मात्र अन्यत्र १०-१५ किलोमीटरसाठी २३ ते २४ मिनिटे इतकाच अवधी असतो, असा दावा मारिया यांनी केला. जे झाले ते दुर्दैवी होते, त्यासाठी मी कुटुंबीयांची माफी मागतो. मात्र भरती प्रक्रिया किंवा त्याचे नियम याला जबाबदार नाहीत, असे मारिया यांनी सांगितले. (प्रतिनिधी)