शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सत्तेची किमया ! रिकाम्या खुर्च्यांनी त्रस्त काँग्रेसच्या स्थानिक कार्यक्रमांना वाढतेय गर्दी

By रवींद्र देशमुख | Updated: March 9, 2020 11:14 IST

सत्तेचा फायदा काँग्रेसला कमकुवत झालेले संघटन मजबूत करण्यासाठी होणार आहे. ज्याची आवश्यकता शिवसेना आणि राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक आहे. 

- रवींद्र देशमुख

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उदय आणि काँग्रेसची झालेली पिछेहाट यामुळे देशातील सर्वात जुन्या पक्षाच्या संघटनाला मोठा धक्का बसला होता. सत्ता काळात काँग्रेसकडून देखील केडरवर दुर्लक्ष झालं होतच. त्यामुळे सत्ता जाताच काँग्रेसला घरघर लागली. महाराष्ट्रातूनही 2014 मध्ये काँग्रेसची सत्ता गेल्यामुळे काँग्रेसकडे कार्यकर्त्यांना वणवण भासली होती. मात्र 2019 मध्ये राज्यात सत्ता येताच काँग्रेसचे संघटन पुन्हा मजबूत होण्यास सुरुवात झाली आहे. 

गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्या वेळी गर्दी जमत नसल्याने काँग्रेसनेते हैराण झाले होते. त्याचवेळी सत्ताधारी भाजप प्रचार सभांच्या गर्दीचा उच्चांक तयार करत होते. हा फरक सत्तेचा होता हे स्पष्टच होते. गर्दी जमत नसल्यामुळे भाजपकडूनही काँग्रेसवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. त्यामुळे अनेक काँग्रसनेते कार्यक्रम घेण्यास धजावत नव्हते. कार्यक्रम घेतला तरी निम्म्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या. मात्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर चित्र बदलताना दिसत आहे.

विधानसभेचे अध्यक्ष आणि काँग्रेसनेते नाना पटोले यांचा नुकताच जालना शहरात जाहीर सत्कार करण्यात आला. येथील एका सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र हे सभागृह गर्दीने भरेल का, अशी शंका विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांनाच होती. खुद्द गोरंट्याल यांनीच तशी शंका उपस्थित होती. त्याचे कारण म्हणजे, निवडणूक प्रचारातील अनुभव त्यांना होता. मात्र जालना येथील सभागृह भरले होते. अर्थात ही सत्तेची किमया आहे, हे वेगळं सांगायला नको. मात्र या सत्तेचा फायदा काँग्रेसला कमकुवत झालेले संघटन मजबूत करण्यासाठी होणार आहे. ज्याची आवश्यकता शिवसेना आणि राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक आहे.