शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

कॉमिक पुस्तिकेतून ‘आघाडी’च्या कर्जमाफीवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 04:48 IST

‘कथा दोन कर्जमाफींची- धनाजी आणि गुणाजीची’ असे शीर्षक असलेली कॉमिक पुस्तिका प्रदेश भारतीय जनता पार्टीने काढली असून या पुस्तिकेच्या माध्यमातून आघाडी सरकारच्या काळातील कर्जमाफीवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

 मुंबई - ‘कथा दोन कर्जमाफींची- धनाजी आणि गुणाजीची’ असे शीर्षक असलेली कॉमिक पुस्तिका प्रदेश भारतीय जनता पार्टीने काढली असून या पुस्तिकेच्या माध्यमातून आघाडी सरकारच्या काळातील कर्जमाफीवर हल्लाबोल करण्यात आला आहे. उद्या भाजपाच्या महामेळाव्याहून परतणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांना या पुस्तिकेचे वाटप करण्यात येणार आहे.या कॉमिक कथेत आघाडी सरकारच्या कर्जमाफीचे आधी कौतुक करणारे धनाजी हे पात्र असून सध्याच्या सरकारची कर्जमाफी आणि लोकाभिमुख योजनांचे सोदाहरण समर्थन करणारे गुणाजी हे पात्र आहे. गुणाजी हा धनाजीचे असे काही ‘ब्रेन वॉश’ करतो की तालुक्याच्या ठिकाणी हल्लाबोल यात्रेत सहभागी होण्यासाठी निघालेला धनाजी कथेच्या शेवटी त्याच्यासारख्यांची माथी भडकविणाºयांवर हल्लाबोल करण्याचा इरादा व्यक्त करतो.आताच्या सरकारने पाच एकराचे बंधन काढल्याने विदर्भ, मराठवाड्यातील शेतकºयांना कर्जमाफीचा झालेला फायदा, आधीच्या कर्जमाफीत धनदांडग्यांना ४०-४० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कसे माफ झाले, तेव्हाच्या सत्तारूढ आमदाराच्या घरातील आठ जणांना कशी कर्जमाफी मिळाली होती, आताच्या सरकारने आमदार, खासदार, सरकारी अधिकारी, कर्मचारी अशा पगारदारांऐवजी गरजू शेतकºयांनाच कशी कर्जमाफी दिली हे विविध मुद्दे गुणाजी हा धनाजीला पटवून देतो.आघाडी सरकारमध्ये कर्जमाफीत झालेल्या घोटाळ्यांची माहिती गुणाजी देतो तेव्हा, ‘मग शेतकºयांच्या हक्काचे पैसे गेले कुठे’, असा सवाल धनाजी करतो. त्यावर, हा विचार आता तूच कर, कारण ती तुझ्या लाडक्या सरकारची कर्जमाफी होती ना’, असा चिमटा गुणाजी त्याला काढतो. बाजारातून चप्पल, नवीन फ्रॉक घ्यायचा की बांगड्या याबाबत गोंधळलेली गुणाजीची मुलगी पाहून धनाजी त्याला टोमणा मारतो, की ‘तुझी मुलगी देवेंद्र सरकारसारखीच गोंधळलेली आहे.कर्जमाफीबाबत या सरकारने अनेक शासन निर्णय बदलले. त्यावर, तुला बदललेले शासन निर्णय दिसले पण प्रत्येक निर्णयासोबत कर्जमाफीचे लाभार्थी वाढत गेले आणि अधिक फायदा करून देणारे ठरले, असे समर्थन गुणाजी करतो. याशिवाय, पंतप्रधान घरकुल योजना, मागेल त्याला शेततळे ही योजना, जलयुक्त शिवार आदी योजनांबाबतही गुणाजी हा धनाजीच्या मनात असलेले गैरसमज दूर करतो.हल्लाबोल तर करणारपण माथी भडकवली त्यांच्यावरया कॉमिक कथेतील आधी आघाडी सरकारचा समर्थक असलेल्या धनाजीचे मन गुणाजी मुद्देसूदपणे वळवितो तेव्हा आधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघालेला धनाजी शेवटी म्हणतो, ‘मी हल्लाबोल तर करणारच पण स्वत:च्या अज्ञानाच्या राक्षसावर अन् ज्यांनी आमची माथी भडकवली त्यांच्यावर!’

टॅग्स :BJPभाजपाFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र