शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
3
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
4
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
5
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
6
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
7
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
9
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
10
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
11
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
12
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
13
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
14
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
15
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
16
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
17
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
18
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
19
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"

या, संधीसाधूंनो परत फिरा; काँग्रेस-राष्ट्रवादीची साद

By अतुल कुलकर्णी | Updated: December 13, 2018 06:56 IST

भाजपा शिवसेनेत गेलेल्या मूळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुन्हा स्वगृही येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

मुंबई : भाजपा शिवसेनेत गेलेल्या मूळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा स्वगृही येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिकडे जातानाची कारणे वेगळी होती, आता ते परत येण्यास उत्सुक आहेत, ही घरवापसी देशातच नाही तर राज्यातही होईल, अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. किती नेते परत येण्यास उत्सुक आहेत असे विचारले असता संख्या कशाला, लवकरच नावेही कळतील, असे उत्तर त्यांनी दिले.घरवापसीबद्दल बोलताना काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते म्हणाले, दोन्ही काँग्रेसचे अनेक जण भाजपा शिवसेनेत गेले आहेत. ते जर तिकडे गेले नसते तर भाजपाने त्यांच्या जागी दुसरे नेतृत्व उभे केले असते. तसे झाले असते तर या नेत्यांच्या मतदारसंघात त्यांना स्पर्धक तयार झाले असते. ते होऊ नये म्हणून हे लोक त्या पक्षात गेले होते. परिणामी त्यांना त्यांचे मतदारसंघ शाबूत राखता आले. जे तिकडे गेले त्यांना भाजपाने आश्वासनांशिवाय चार वर्षांत काहीही दिले नाही. तरीही मतदारसंघ शाबूत रहावेत म्हणून हे नेते शांत बसून होते. आता निवडणुका जवळ येत आहेत. जर लोकसभेच्या निवडणुका आधी झाल्या तर खासदारकीसाठी भाजपा-शिवसेनेत गेलेले लोक आधी परत येतील आणि त्याच्या निकालानंतर विधानसभेच्या तोंडावर बाकीचे नेते परत येतील. शिवाय हे नेते भाजपात राहून आम्हालाच मदत करतील, असा गौप्यस्फोटही या वरिष्ठ नेत्याने केला.काही नेते त्यांच्यावरील चौकशीचा ससेमिरा वाचावा म्हणूनही भाजपामध्ये गेले होते. त्यात माजी मंत्री विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते यांचा समावेश होता. तर काहींनी प्रदेश काँग्रेसचे तत्कालिन प्रभारी मोहन प्रकाश यांनी नाराज केल्यामुळे पक्ष सोडला होता. त्यातले प्रमुख नाव म्हणजे पालघरचे खासदार राजेंद्र गावित. काँग्रेसचे विद्यमान प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांनी जे जे नाराज होऊन गेले त्यांची यादी करा, त्यांच्या जागी पर्यायी व्यक्ती मिळू शकते का ते शोधा पण त्याआधी नाराजांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी कृती कार्यक्रम बनवा, अशा सूचना दिल्याचे या वरिष्ठ नेत्याने सांगितले.पुन्हा नवा उत्साहगेली काही वर्षे राष्ट्रवादीतून कोणी जोरकसपणे भाजपाचा विरोध केला नाही. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार नेमकी कोणती भूमिका घेतात हेच स्पष्ट होत नसल्याने आणि जर काही बोललो तर आपलाही भुजबळ होईल या भीतीपोटी अनेक नेते गप्प होते. पण कालच्या निकालाने राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही उत्साह संचारल्याचे बुधवारी शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिसून आले.कमी लेखणे चुकीचेभाजपाला एवढ्या निकालावरुन कमी लेखणे चुकीचे ठरेल कारण भाजपाने बुथ पातळीवर प्रचंड काम केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २८८ मतदारसंघाचे सर्व्हे तयार आहेत. तेवढी तयारी आमच्याकडे किती जणांनी केली आहे माहिती नाही, असे राष्ट्रवादीच्या नेत्याने स्पष्ट केले.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाShiv Senaशिवसेना