शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

या, संधीसाधूंनो परत फिरा; काँग्रेस-राष्ट्रवादीची साद

By अतुल कुलकर्णी | Updated: December 13, 2018 06:56 IST

भाजपा शिवसेनेत गेलेल्या मूळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पुन्हा स्वगृही येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

मुंबई : भाजपा शिवसेनेत गेलेल्या मूळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पुन्हा स्वगृही येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिकडे जातानाची कारणे वेगळी होती, आता ते परत येण्यास उत्सुक आहेत, ही घरवापसी देशातच नाही तर राज्यातही होईल, अशी माहिती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. किती नेते परत येण्यास उत्सुक आहेत असे विचारले असता संख्या कशाला, लवकरच नावेही कळतील, असे उत्तर त्यांनी दिले.घरवापसीबद्दल बोलताना काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते म्हणाले, दोन्ही काँग्रेसचे अनेक जण भाजपा शिवसेनेत गेले आहेत. ते जर तिकडे गेले नसते तर भाजपाने त्यांच्या जागी दुसरे नेतृत्व उभे केले असते. तसे झाले असते तर या नेत्यांच्या मतदारसंघात त्यांना स्पर्धक तयार झाले असते. ते होऊ नये म्हणून हे लोक त्या पक्षात गेले होते. परिणामी त्यांना त्यांचे मतदारसंघ शाबूत राखता आले. जे तिकडे गेले त्यांना भाजपाने आश्वासनांशिवाय चार वर्षांत काहीही दिले नाही. तरीही मतदारसंघ शाबूत रहावेत म्हणून हे नेते शांत बसून होते. आता निवडणुका जवळ येत आहेत. जर लोकसभेच्या निवडणुका आधी झाल्या तर खासदारकीसाठी भाजपा-शिवसेनेत गेलेले लोक आधी परत येतील आणि त्याच्या निकालानंतर विधानसभेच्या तोंडावर बाकीचे नेते परत येतील. शिवाय हे नेते भाजपात राहून आम्हालाच मदत करतील, असा गौप्यस्फोटही या वरिष्ठ नेत्याने केला.काही नेते त्यांच्यावरील चौकशीचा ससेमिरा वाचावा म्हणूनही भाजपामध्ये गेले होते. त्यात माजी मंत्री विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते यांचा समावेश होता. तर काहींनी प्रदेश काँग्रेसचे तत्कालिन प्रभारी मोहन प्रकाश यांनी नाराज केल्यामुळे पक्ष सोडला होता. त्यातले प्रमुख नाव म्हणजे पालघरचे खासदार राजेंद्र गावित. काँग्रेसचे विद्यमान प्रभारी मल्लिकार्जून खरगे यांनी जे जे नाराज होऊन गेले त्यांची यादी करा, त्यांच्या जागी पर्यायी व्यक्ती मिळू शकते का ते शोधा पण त्याआधी नाराजांना पुन्हा पक्षात घेण्यासाठी कृती कार्यक्रम बनवा, अशा सूचना दिल्याचे या वरिष्ठ नेत्याने सांगितले.पुन्हा नवा उत्साहगेली काही वर्षे राष्ट्रवादीतून कोणी जोरकसपणे भाजपाचा विरोध केला नाही. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार नेमकी कोणती भूमिका घेतात हेच स्पष्ट होत नसल्याने आणि जर काही बोललो तर आपलाही भुजबळ होईल या भीतीपोटी अनेक नेते गप्प होते. पण कालच्या निकालाने राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही उत्साह संचारल्याचे बुधवारी शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिसून आले.कमी लेखणे चुकीचेभाजपाला एवढ्या निकालावरुन कमी लेखणे चुकीचे ठरेल कारण भाजपाने बुथ पातळीवर प्रचंड काम केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २८८ मतदारसंघाचे सर्व्हे तयार आहेत. तेवढी तयारी आमच्याकडे किती जणांनी केली आहे माहिती नाही, असे राष्ट्रवादीच्या नेत्याने स्पष्ट केले.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाShiv Senaशिवसेना