शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

दिवाळीनंतरच सुरू होणार महाविद्यालये : उदय सामंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 05:54 IST

मुख्यमंत्री, टास्क फोर्ससोबतच्या चर्चेनंतरच निर्णय

ठळक मुद्देमुख्यमंत्री, टास्क फोर्ससोबतच्या चर्चेनंतरच निर्णय

मुंबई : राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले टाकली जात आहेत. १ नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार असली तरी दिवाळीनंतरच प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू होतील, अशी परिस्थिती आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोविड टास्क फोर्ससोबतच्या चर्चेनंतरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात मंत्री सामंत म्हणाले की, अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक झाली. राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याच्या मन:स्थितीत आहोत. १ नोव्हेंबरपासून महाविद्यालये सुरू करावी, असे विद्यापीठ अनुदान आयोगाचे म्हणणे आहे. याच कालावधीत दिवाळी असल्याने शैक्षणिक वर्ष सुरू झाले तरी सणानंतरच महाविद्यालये सुरू करता येतील. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊनच निर्णय घेतला जाईल.

विद्यार्थी आणि पालकांच्या मनात अजूनही कोविडची भीती आहे. त्यामुळे उपस्थितीची सक्ती केली जाणार नाही. शिवाय, हमीपत्राचीही आवश्यकता नाही. सर्व बाबींचा विचार करून निर्णय केला जाईल. राज्यात कोरोनाची स्थिती कमी झाली आहे. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. जिथे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे, तिथे महाविद्यालये सुरू करायला हरकत नाही. मात्र, मुख्यमंत्रीच याबद्दलचा निर्णय घेतील, असेही सामंत म्हणाले.

३०७४ प्राध्यापकांच्या जागा राज्यात रिक्त 

  • राज्यातील विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक आणि प्राचार्य भरतीला तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. सोमवारी किंवा मंगळवारी प्राध्यापक भरतीची फाईल अर्थ विभागाकडे जाईल. राज्यात ३०७४ प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. 
  • सीएचबी तत्त्वावर प्राध्यापकांनाही चांगले मानधन मिळेल, याचाही विचार करण्यात येत असल्याचे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.
टॅग्स :collegeमहाविद्यालयDiwaliदिवाळीcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्र