शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

कॉलेज युवकांना हवे सकारात्मक राजकारण: अमित ठाकरे, विद्यार्थ्यांशी साधला संवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 05:53 IST

अमित ठाकरे मनसेच्या महासंपर्क अभियानांतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

लोनाड : महाविद्यालयीन युवक-युवती राजकारणाकडे सकारात्मक बदल घडविण्यासाठी अपेक्षेने पाहत असून, त्यांच्या मनाला साद घालण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना करणार आहे. त्यामुळे मला चर्चेदरम्यान महाविद्यालयीन युवक-युवतींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असा दावा मनसे विद्यार्थी सेनाप्रमुख अमित ठाकरे यांनी गुरुवारी केला.

ठाकरे मनसेच्या महासंपर्क अभियानांतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ठाणे जिल्ह्यातील दौऱ्याचा प्रारंभ त्यांनी भिवंडी येथील शांग्रीला रिसॉर्ट येथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधून केला. त्यानंतर ते पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करत होते. 

याप्रसंगी मनसे उपाध्यक्ष डी. के. म्हात्रे, ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, उर्मिला तांबे, भिवंडी लोकसभा जिल्हा अध्यक्ष शैलेश बिडवी, मनसे विद्यार्थी ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख संतोष साळवी, भिवंडी शहराध्यक्ष मनोज गुळवी आदी उपस्थित होते. वाढती फी व आरक्षणामुळे महाविद्यालयांत प्रवेश मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांनी त्यांना सांगितले. विद्यार्थ्यांच्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, यासाठी हा प्रयत्न आहे, म्हणून सर्व महाविद्यालयांत मनसे विद्यार्थी सेनेची स्थापना करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे.

‘ग्रामीण विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविणार’ 

वासिंद : ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी मनविसे पाठबळ देणार असल्याची ग्वाही मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी दिली. मनविसेच्या महासंपर्क पुनर्बांधणी दौऱ्यानिमित्त ठाकरे गुरुवारी शहापुरात आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली. वाढलेली प्रवेश फी, शाळा तसेच कॉलेज व्यवस्थापन यांची मनमानी आणि  विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय आदी समस्या सोडविण्यासाठी मनविसेचे पाठबळ असणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Amit Thackerayअमित ठाकरेMNSमनसे