शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

सहकारमंत्र्यांचा साखर कारखाना पाडला बंद; शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 00:54 IST

ऊसदराचा प्रश्न अद्याप न सुटल्याने जिल्ह्यात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आंदोलक शेतक-यांनी शनिवारीही हल्लाबोल करीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा भंडारकवठे येथील लोकमंगल साखर कारखाना बंद पाडला.

सोलापूर : ऊसदराचा प्रश्न अद्याप न सुटल्याने जिल्ह्यात शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आंदोलक शेतकºयांनी शनिवारीही हल्लाबोल करीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा भंडारकवठे येथील लोकमंगल साखर कारखाना बंद पाडला. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन करण्यात आले.लोकमंगल साखर कारखान्यासमोर बळीराजा संघटना व संयुक्त शेतकरी संघटनेचे दुसºया दिवशीही धरणे आंदोलन सुरूच होते. रात्री भजनी मंडळाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला. शेतकºयांनी स्वत:हून ऊसतोडणी बंद केली आहे. त्यामुळे शुक्रवारी मध्यरात्रीपासून गाळप ठप्प झाले आहे. तर पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस दरवाढीच्या मागणीसाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. कारखाने चालवायचे जमत नसेल तर राजीनामे द्या. प्रशासक बसवून आम्ही चालवून दाखवू, असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी यावेळी दिले.बार्शी तालुक्यातील वैराग येथील शिवाजी चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रस्ता रोको करण्यात आला. दोन तास चाललेल्या रस्ता रोको आंदोलनामुळे बार्शी, सोलापूर, माढा, मोहोळ, उस्मानाबाद आदी ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती. कुर्डूवाडी- बार्शी रोडवरील रिधोरे येथील सीना नदीच्या पुलावर मध्यभागी टायर जाळून टाकल्याने दोन तास वाहतुकीची कोंडी झाली होती़माळशिरस तालुक्यात रयत क्रांती संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, मनसे, काँग्रेस या पक्षांच्यावतीने सोमवारी माळशिरस येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऊस तोडणी थांबविण्याच्या सूचना कामगारांना दिल्या आहेत़आंदोलनामुळे दोन तास वाहतूककोंडीदोन तास चाललेल्या रस्ता रोको आंदोलनामुळे बार्शी, सोलापूर, माढा, मोहोळ, उस्मानाबाद आदी ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती.कुर्डूवाडी- बार्शी रोडवरील रिधोरे येथील सीना नदीच्या पुलावर मध्यभागी टायर जाळून टाकल्याने दोन तास वाहतुकीची कोंडी झाली होती़साखर कारखान्यांचे काटे तपासणीसाठी आकस्मिक पथक - गिरीश बापटसाखर कारखान्यांकडे असलेल्या काट्यांच्या गुणवत्तेत दोष असल्याच्या तक्रारी आहेत़ त्यामुळे त्यांच्या तपासणीसाठी आकस्मिक तपासणी पथके नेमली नेमल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. साखर कारखान्यांमध्ये उसाच्या वजनासाठी इलेक्ट्रॉनिक्स काटे लावण्यासंदर्भात मागणी सुरु आहे. त्या संदर्भात भविष्यात निर्णय होईलच. मात्र सध्या तरी ही उपाययोजना केली आहे, असेही बापट म्हणाले.रेशन दुकानदारांच्या संदर्भातील प्रकरणांच्या सुनावणीसाठी आता दुकानदारांना मुंबईत बोलावण्याऐवजी आम्हीच त्यांच्या गावात जाऊन सुनावणी घेत आहेत. त्या अंतर्गत सोलापुरात ५१, पुण्यात ८५, नाशिक ९६ आणि औरंगाबादमध्ये १२५ दुकानदारांच्या प्रकरणांवर सुनावण्या झाल्या आहेत. राज्यात सव्वातीन हजार सुनावण्या या तीन दिवसांत झाल्या असून, २०१७ च्या अखेरपर्यंत सर्व प्रकरणे निकाली काढली जाणार आहेत, असेही बापट म्हणाले.पॉस मशिनच्या माध्यमातून राज्यातील ५२ हजार ८०० रेशन दुकाने जोडण्याचा मानस आहे. आतापर्यंत ५१ हजार ५०० दुकानांमध्ये पॉस मशिन दिल्या आहेत. राज्यात असलेल्या १० ते १२ लाख बोगस शिधापत्रिकाधारक बायोमेट्रिक प्रणालीमुळे आपोआपच बाद होतील. त्यातून तीन ते चार हजार कोटींच्या अन्नधान्याची बचत होईल.द्वारपोच योजनेच्या माध्यमातून दुकानदारांच्या दारापर्यंत धान्य पोहोचविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे हमालीवरील खर्च वाचला असून, २० जिल्ह्यात हे काम सुरु आहे. १५० गोदामांची संख्या वाढली असून, नव्याने गोदाम निर्माण केले जाणार आहेत, अशी माहिती बापट यांनी दिली.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने