शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी बँकांना शाखा विलिनीकरणाची परवानगी द्यावी : सहकारी बॅकांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 14:03 IST

एकाहून अधिक बँकांना अडचणीतील बँकांच्या शाखा विलिन करुन घेण्याची परवानगी द्यावी अशी महत्त्वपूर्ण मागणी या बैठकीत करण्यात आली.

ठळक मुद्देआरबीआय गव्हर्नरांशी झालेल्या बैठकीत दिले मागण्यांचे निवेदनइतर नागरी बँकांना व्यवसाय विस्तार करण्यासाठी तयार प्रणाली होईल उपलब्ध विलिनीकरण झाल्यास आर्थिक अडचणीतील बँकांतील खातेदारांना दिलासा

पुणे : आर्थिक अडचणीतील नागरी सहकारी बँकेला एखाद्या नागरी सहकारी बँकेत विलिन करुन घेण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे एकाहून अधिक नागरी बँकांना त्यांच्या शाखा विलिन करुन घेण्याची परवानगी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) द्यावी अशा महत्त्वाच्या मागणीसह गुरुवारी (दि. २७) आठ पानी निवेदन आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांना देण्यात आले. बँकेच्या काही शाखांचे विलिनीकरण करुन घेण्याबाबत दास यांनी सकारात्मकता दर्शविल्याचे सहकार क्षेत्रातील प्रतिनिधींनी सांगितले. गेल्या पंचवीस वर्षांत प्रथमच आरबीआयच्या गव्हर्नर पदावरील सर्वोच्च अधिकाऱ्याने सहकारी संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. मुंबई येथील आरबीआयच्या मध्यवर्ती इमारतीत झालेली ही बैठक तब्बल दोन तास चालली. नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को ऑपरेटीव्ह बँक अ‍ॅण्ड क्रेडीट सोसायटीचे (नॅफकॅब) अध्यक्ष ज्योतींद्र मेहता, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, दिल्ली को ऑपरेटीव्ह बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष शिवदास आणि नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट को ऑपरेटीव्ह बँकेचे अध्यक्ष सुनील सिंघानी आणि टास्क फोर्स फॉर अर्बन को ऑपरेटीव्ह बँकचे (टॅफकब) प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.  आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरी सहकारी बँकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी नागरी सहकारी बँकांची तयारी आहे. मात्र, कोणत्याही एका बँकेला संपूर्ण बँक विलिनीकरण करुन घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अडचणीतील बँकेचा सर्व तोटा एकटी बँक सहन करु शकणार नाही. त्यामुळे एकाहून अधिक बँकांना अडचणीतील बँकांच्या शाखा विलिन करुन घेण्याची परवानगी द्यावी अशी महत्त्वपूर्ण मागणी या बैठकीत करण्यात आली. तसे झाल्यास आर्थिक अडचणीतील बँकांतील खातेदारांना दिलासा मिळेल. तसेच, इतर नागरी बँकांना व्यवसाय विस्तार करण्यासाठी तयार प्रणाली उपलब्ध होईल. याबाबत आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याची माहिती बैठकीस उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी दिली. ---------------------गेल्या पंचवीस वर्षांत प्रथमच आरबीआयच्या गव्हर्नरने सहकारी बँकींग क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधत अडचणी समजावून घेतल्या. सध्याचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी यापुर्वी तमिळनाडू सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून जबादारी सांभाळली आहे. त्यामुळे ते सहकारी बँकांच्या अडचणी नक्कीच समजून घेतील असा विश्वास वाटतो. विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रशासकीय मंडळ

टॅग्स :PuneपुणेbankबँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक