शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

सहकारी बँकांना शाखा विलिनीकरणाची परवानगी द्यावी : सहकारी बॅकांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 14:03 IST

एकाहून अधिक बँकांना अडचणीतील बँकांच्या शाखा विलिन करुन घेण्याची परवानगी द्यावी अशी महत्त्वपूर्ण मागणी या बैठकीत करण्यात आली.

ठळक मुद्देआरबीआय गव्हर्नरांशी झालेल्या बैठकीत दिले मागण्यांचे निवेदनइतर नागरी बँकांना व्यवसाय विस्तार करण्यासाठी तयार प्रणाली होईल उपलब्ध विलिनीकरण झाल्यास आर्थिक अडचणीतील बँकांतील खातेदारांना दिलासा

पुणे : आर्थिक अडचणीतील नागरी सहकारी बँकेला एखाद्या नागरी सहकारी बँकेत विलिन करुन घेण्यास अडचणी येऊ शकतात. त्यामुळे एकाहून अधिक नागरी बँकांना त्यांच्या शाखा विलिन करुन घेण्याची परवानगी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) द्यावी अशा महत्त्वाच्या मागणीसह गुरुवारी (दि. २७) आठ पानी निवेदन आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांना देण्यात आले. बँकेच्या काही शाखांचे विलिनीकरण करुन घेण्याबाबत दास यांनी सकारात्मकता दर्शविल्याचे सहकार क्षेत्रातील प्रतिनिधींनी सांगितले. गेल्या पंचवीस वर्षांत प्रथमच आरबीआयच्या गव्हर्नर पदावरील सर्वोच्च अधिकाऱ्याने सहकारी संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. मुंबई येथील आरबीआयच्या मध्यवर्ती इमारतीत झालेली ही बैठक तब्बल दोन तास चालली. नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को ऑपरेटीव्ह बँक अ‍ॅण्ड क्रेडीट सोसायटीचे (नॅफकॅब) अध्यक्ष ज्योतींद्र मेहता, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, दिल्ली को ऑपरेटीव्ह बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष शिवदास आणि नॅशनल फेडरेशन ऑफ स्टेट को ऑपरेटीव्ह बँकेचे अध्यक्ष सुनील सिंघानी आणि टास्क फोर्स फॉर अर्बन को ऑपरेटीव्ह बँकचे (टॅफकब) प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.  आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरी सहकारी बँकांना त्यातून बाहेर काढण्यासाठी नागरी सहकारी बँकांची तयारी आहे. मात्र, कोणत्याही एका बँकेला संपूर्ण बँक विलिनीकरण करुन घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अडचणीतील बँकेचा सर्व तोटा एकटी बँक सहन करु शकणार नाही. त्यामुळे एकाहून अधिक बँकांना अडचणीतील बँकांच्या शाखा विलिन करुन घेण्याची परवानगी द्यावी अशी महत्त्वपूर्ण मागणी या बैठकीत करण्यात आली. तसे झाल्यास आर्थिक अडचणीतील बँकांतील खातेदारांना दिलासा मिळेल. तसेच, इतर नागरी बँकांना व्यवसाय विस्तार करण्यासाठी तयार प्रणाली उपलब्ध होईल. याबाबत आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याची माहिती बैठकीस उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी दिली. ---------------------गेल्या पंचवीस वर्षांत प्रथमच आरबीआयच्या गव्हर्नरने सहकारी बँकींग क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधत अडचणी समजावून घेतल्या. सध्याचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी यापुर्वी तमिळनाडू सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून जबादारी सांभाळली आहे. त्यामुळे ते सहकारी बँकांच्या अडचणी नक्कीच समजून घेतील असा विश्वास वाटतो. विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रशासकीय मंडळ

टॅग्स :PuneपुणेbankबँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक