शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांतर्गत विरोधकांवरही मुख्यमंत्र्यांचा दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 05:20 IST

प्रकाश आंबेडकरांचा आरोप : विरोधकांच्या मागे चौकशांचा ससेमिरा

मुंबई : विविध चौकश्यांचा ससेमिरा लावून विरोधीपक्षातील नेत्यांना संपविण्याचे धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राबवित आहेतच, शिवाय पक्षांतर्गत विरोधकही त्यांच्या निशाण्यावर आहेत. चंद्रकांत पाटील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदी मंडळी आता गप्प आहे, कारण सर्वांनाच ब्लॅकमेलिंगची भीती आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

राज्य सहकारी बँकप्रकरणी अजित पवार यांच्यासह अन्य विरोधकांच्या चौकशीची जी वेळ साधली आहे; त्यात राजकारणाचा वास येतो आहे. एक-एक करून विरोधकांना संपविण्याचे सरकारचे धोरण आहे. राज्य सहकारी बँक घोटाळ्यासंदर्भातील अहवाल का प्रकाशित केला जात नाही, असा सवालही त्यांनी केला.

पी. चिदम्बरम आदी विरोधी नेत्यांच्या चौकशीचे हे लोण पक्षांतर्गत विरोधकांपर्यंत पोहचणार आहे. चंद्रकांत पाटील हे एक उदाहरण आहेत. उद्धव ठाकरेंना विचारा की ते का बोलत नाहीत? कारण ब्लॅकमेलिंगची भीती सगळ्यांनाच आहे, असेही आंबेडकर म्हणाले. आपल्यावरही दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. नक्षलवाद्यांशी संबंध जोडण्यात आला पण त्याला पुरून उरल्याचे आंबेडकर म्हणाले.वंचितची सत्ता आल्यास एससी, एसटीच्या धर्तीवर ओबीसींनाही पदोन्नतीमध्ये आरक्षण देऊ , क्रिमिलेअरची अट काढण्यासाठी अभ्यासगट स्थापन केला जाईल. ओबीसींसाठी स्वतंत्र बजेट करून विद्यार्थ्यांना फ्री-शीप आणि स्कॉलरशीपचा निर्णय घेऊ, असे आश्वासनही आंबेडकर यांनी दिले.

आघाडीसाठी काँग्रेसला अल्टिमेटमएमआयएमसोबत आमची युती कायम आहे. लवकरच जागा वाटपही होईल. काँग्रेसला आघाडीसाठी ३१ आॅगस्टपर्यंतची मुदत आहे. आता आघाडीसाठी जास्त काळ थांबणार नसल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस