शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

पक्षांतर्गत विरोधकांवरही मुख्यमंत्र्यांचा दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 05:20 IST

प्रकाश आंबेडकरांचा आरोप : विरोधकांच्या मागे चौकशांचा ससेमिरा

मुंबई : विविध चौकश्यांचा ससेमिरा लावून विरोधीपक्षातील नेत्यांना संपविण्याचे धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राबवित आहेतच, शिवाय पक्षांतर्गत विरोधकही त्यांच्या निशाण्यावर आहेत. चंद्रकांत पाटील, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदी मंडळी आता गप्प आहे, कारण सर्वांनाच ब्लॅकमेलिंगची भीती आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.

राज्य सहकारी बँकप्रकरणी अजित पवार यांच्यासह अन्य विरोधकांच्या चौकशीची जी वेळ साधली आहे; त्यात राजकारणाचा वास येतो आहे. एक-एक करून विरोधकांना संपविण्याचे सरकारचे धोरण आहे. राज्य सहकारी बँक घोटाळ्यासंदर्भातील अहवाल का प्रकाशित केला जात नाही, असा सवालही त्यांनी केला.

पी. चिदम्बरम आदी विरोधी नेत्यांच्या चौकशीचे हे लोण पक्षांतर्गत विरोधकांपर्यंत पोहचणार आहे. चंद्रकांत पाटील हे एक उदाहरण आहेत. उद्धव ठाकरेंना विचारा की ते का बोलत नाहीत? कारण ब्लॅकमेलिंगची भीती सगळ्यांनाच आहे, असेही आंबेडकर म्हणाले. आपल्यावरही दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. नक्षलवाद्यांशी संबंध जोडण्यात आला पण त्याला पुरून उरल्याचे आंबेडकर म्हणाले.वंचितची सत्ता आल्यास एससी, एसटीच्या धर्तीवर ओबीसींनाही पदोन्नतीमध्ये आरक्षण देऊ , क्रिमिलेअरची अट काढण्यासाठी अभ्यासगट स्थापन केला जाईल. ओबीसींसाठी स्वतंत्र बजेट करून विद्यार्थ्यांना फ्री-शीप आणि स्कॉलरशीपचा निर्णय घेऊ, असे आश्वासनही आंबेडकर यांनी दिले.

आघाडीसाठी काँग्रेसला अल्टिमेटमएमआयएमसोबत आमची युती कायम आहे. लवकरच जागा वाटपही होईल. काँग्रेसला आघाडीसाठी ३१ आॅगस्टपर्यंतची मुदत आहे. आता आघाडीसाठी जास्त काळ थांबणार नसल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस