शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

मुख्यमंत्र्यांनी '' या '' ११ प्रश्नांची उत्तरे द्यावीत : राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 18:23 IST

... अन्यथा आम्ही देखील मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ जनतेची आक्रोश यात्रा काढू, असा इशारा शेट्टी यांनी दिला.

ठळक मुद्दे स्वाभिमानी काढणार आक्रोश यात्रा

पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारपासून महाजनादेश यात्रा काढत आहे. बांधकाम मजुरांचे मृत्यू, पीक विमा योजनेत खासगी कंपन्यांकडून करण्यात येणारी नफेखोरी, धनगर आरक्षण, कांदा आणि ठिबकचे थकलेले अनुदान अशा अकरा प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांना द्यावी लागतील. अन्यथा आम्ही देखील मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ जनतेची आक्रोश यात्रा काढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वसंतराव नाईक यांच्या नंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्री पदाची कारकीर्द पूर्ण केल्याचा उल्लेख करुन स्वत:ची पाठ थोपटून घेतली. आता अगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाजनादेश यात्रा काढत आहेत. पुणे शहरामधे बांधकाम मजुरांना आपले प्राण गमवावे लागले. बांधकाम कामगार मंडळाकडे दहा हजार कोटींचा निधी जमा झाला आहे. त्यातील किती पैसे बांधकाम मजुरांवर खर्च करण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सहकारमंत्री सुभाष देशमुख, तानाजी सावंत, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी संबंधित साखर कारखान्यांकडे ऊस बिलाची थकबाकी आहे. शेतकºयांनो धीर धरा असे आपण त्यांना सांगणार आहात का? असा प्रश्न शेट्टी यांनी या वेळी उपस्थित केला. धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे सर्व लाभ कसे देणार, लिंगायत समाजाला ओबीसीच्या सवलती कशा देणार, मराठवाड्यातून विमा कंपन्यांनी २९०० कोटी रुपये जमा केले. मराठवाड्यात तीव्र दुष्काळ असताना १२२१ कोटी रुपयांचा नफा मिळविला. हा नफा कसा कमावले हे आपण शेतकºयांना कसे सांगणार आहात. खरेतर सरकारने पीक विमा योजना नव्हे तर, प्रधानमंत्री कॉर्पोरेट कल्याण योजना सुरु केली असल्याची टीका शेट्टी यांनी केली. तसेच, मुख्यमंत्र्यांना या प्रश्नांची उत्तरे न दिल्यास मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश या यात्रा मार्गावरुन स्वाभिमानी संघटना जनतेची आक्रोश यात्रा काढेल, असे शेट्टी यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेRaju Shettyराजू शेट्टीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGovernmentसरकारElectionनिवडणूक