शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Dahi Handi: यंदाही घागर उताणीच रे, गोपाळा; भाजपचा आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 07:28 IST

गोविंदा पथकांच्या प्रमुखांशी मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन संवाद साधला. इतर रुग्णांना लागणारी ऑक्सिजनची गरज वगळता कोरोना रुग्णांसाठीच्या ऑक्सिजनची मागणी ७५० मेट्रिक टनच्या वर गेल्यास आपल्याला नाइलाजाने पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावा लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आपल्या सरकारचे प्रथम प्राधान्य हे जनतेचे प्राण वाचविण्याला असल्याचे सांगत यंदाही दहीहंडीचा उत्सव होणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी स्पष्ट केले. कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी सणवार, उत्सव बाजूला ठेवून जनतेचे प्राण वाचविण्याला आम्ही प्राधान्य दिले, हा संदेश जाऊ द्या, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर विरोधाचे सूर उमटले असून, भाजपने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (No Dahi Handi In Maharashtra This Year)

गोविंदा पथकांच्या प्रमुखांशी मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन संवाद साधला. इतर रुग्णांना लागणारी ऑक्सिजनची गरज वगळता कोरोना रुग्णांसाठीच्या ऑक्सिजनची मागणी ७५० मेट्रिक टनच्या वर गेल्यास आपल्याला नाइलाजाने पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावा लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आमदार सुनील प्रभू, आमदार प्रताप सरनाईक, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, माजी आमदार बाळा नांदगावकर आदी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांचा निर्णय  हा समाजहिताचा असल्याने आम्ही त्याचे समर्थन करतो, अशी प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी पत्रकारांना दिली. जय जवान गोविंदा पथकाचे विजय निकम यांनी मागणी केली की, मुख्यमंत्र्यांनी निर्णयाचा फेरविचार करावा. लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांना दहीहंडी उत्सवात सहभागी होण्याची परवानगी द्यावी. भाजपचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला असून, घाटकोपरमध्ये आम्ही दहीहंडी फोडणारच, असे सांगितले.

काहीही असो, थरथराट नाहीच श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्याच ठिकाणी कमी उंचीची दहीहंडी फोडली जाईल.  कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच सहभागी करून घेऊ, गर्दी होणार नाही याची दक्षता मंडळे घेतील, अशी भूमिका गोविंदा पथकांच्या समन्वय समितीने बैठकीत मांडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीला परवानगी दिली जाणार नाही, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.

अनुभव कटू आहे...गेल्या दोन लाटांत जी बालके अनाथ झाली, ज्यांच्या घरातील कर्ते पुरुष किंवा महिला गेल्या, कुटुंबेच्या कुटुंबे अनाथ झाली. त्याची कारणे समजून घेण्याची गरज आहे. दोन लाटांतील आपला अनुभव भयानक आहे. आपलाच नाहीतर, जगाचा अनुभवही कटू आहे. दोन डोस दिलेल्या देशांतही तिसऱ्या लाटेने आता कहर मांडला आहे. अनेक देशांत पुन्हा निर्बंध लावले जात आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.  

कोरोना निर्बंधांविरुद्ध आंदोलन करण्याची भाषा काही जण करतात. त्यांनी शासनाविरोधात आंदोलन करण्यापेक्षा कोरोनाविरुद्ध आंदोलन करावे.- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

संसर्ग हाताबाहेर गेला तर आतापर्यंत निर्बंधांचे कठोर पालन करून मिळालेले यश वाया जाईल. सगळे सण-उत्सव  घरात राहून साजरे केले. शासनाला सहकार्य केले तसेच यापुढेही केले पाहिजे.- अजित पवार, उपमुख्यमंत्री

डेल्टा प्लस हा विषाणू घातक असून, तो वेगाने पसरत आहे. दहीहंडी पथकातील एखाद्या गोविंदाला जरी लागण झालेली असेल तर पूर्ण चमू ताबडतोब बाधित होण्याची भीती असेल.- डॉ. संजय ओक, अध्यक्ष, टास्क फोर्स

दहीहंडी उत्सवात तरूणवर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होतो. जो ३५ च्या आतल्या वयोगटातील असतो. अजूनही आपल्याकडे या वयोगटातील युवकांचे पूर्णपणे लसीकरण झालेले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.- इक्बालसिंह चहल, आयुक्त, मुंबई महापालिका

दहीहंडीचे प्रकरण न्यायालयात असताना, ‘दहीहंडी काय गोविंदांनी पाकिस्तानात जाऊन फोडायची का’ असा प्रश्न काही वर्षांपूर्वी करणाऱ्या शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना दहीहंडी उत्सवाला मनाई करणे दुर्दैवी आहे.- आशिष शेलार, भाजपचे नेते

टॅग्स :Dahi Handiदहीहंडीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरे