शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

Dahi Handi: यंदाही घागर उताणीच रे, गोपाळा; भाजपचा आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 07:28 IST

गोविंदा पथकांच्या प्रमुखांशी मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन संवाद साधला. इतर रुग्णांना लागणारी ऑक्सिजनची गरज वगळता कोरोना रुग्णांसाठीच्या ऑक्सिजनची मागणी ७५० मेट्रिक टनच्या वर गेल्यास आपल्याला नाइलाजाने पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावा लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आपल्या सरकारचे प्रथम प्राधान्य हे जनतेचे प्राण वाचविण्याला असल्याचे सांगत यंदाही दहीहंडीचा उत्सव होणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी स्पष्ट केले. कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी सणवार, उत्सव बाजूला ठेवून जनतेचे प्राण वाचविण्याला आम्ही प्राधान्य दिले, हा संदेश जाऊ द्या, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर विरोधाचे सूर उमटले असून, भाजपने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. (No Dahi Handi In Maharashtra This Year)

गोविंदा पथकांच्या प्रमुखांशी मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन संवाद साधला. इतर रुग्णांना लागणारी ऑक्सिजनची गरज वगळता कोरोना रुग्णांसाठीच्या ऑक्सिजनची मागणी ७५० मेट्रिक टनच्या वर गेल्यास आपल्याला नाइलाजाने पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावा लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आमदार सुनील प्रभू, आमदार प्रताप सरनाईक, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, माजी आमदार बाळा नांदगावकर आदी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांचा निर्णय  हा समाजहिताचा असल्याने आम्ही त्याचे समर्थन करतो, अशी प्रतिक्रिया माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी पत्रकारांना दिली. जय जवान गोविंदा पथकाचे विजय निकम यांनी मागणी केली की, मुख्यमंत्र्यांनी निर्णयाचा फेरविचार करावा. लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांना दहीहंडी उत्सवात सहभागी होण्याची परवानगी द्यावी. भाजपचे आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरुद्ध आंदोलनाचा इशारा दिला असून, घाटकोपरमध्ये आम्ही दहीहंडी फोडणारच, असे सांगितले.

काहीही असो, थरथराट नाहीच श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्याच ठिकाणी कमी उंचीची दहीहंडी फोडली जाईल.  कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच सहभागी करून घेऊ, गर्दी होणार नाही याची दक्षता मंडळे घेतील, अशी भूमिका गोविंदा पथकांच्या समन्वय समितीने बैठकीत मांडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीला परवानगी दिली जाणार नाही, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.

अनुभव कटू आहे...गेल्या दोन लाटांत जी बालके अनाथ झाली, ज्यांच्या घरातील कर्ते पुरुष किंवा महिला गेल्या, कुटुंबेच्या कुटुंबे अनाथ झाली. त्याची कारणे समजून घेण्याची गरज आहे. दोन लाटांतील आपला अनुभव भयानक आहे. आपलाच नाहीतर, जगाचा अनुभवही कटू आहे. दोन डोस दिलेल्या देशांतही तिसऱ्या लाटेने आता कहर मांडला आहे. अनेक देशांत पुन्हा निर्बंध लावले जात आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.  

कोरोना निर्बंधांविरुद्ध आंदोलन करण्याची भाषा काही जण करतात. त्यांनी शासनाविरोधात आंदोलन करण्यापेक्षा कोरोनाविरुद्ध आंदोलन करावे.- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

संसर्ग हाताबाहेर गेला तर आतापर्यंत निर्बंधांचे कठोर पालन करून मिळालेले यश वाया जाईल. सगळे सण-उत्सव  घरात राहून साजरे केले. शासनाला सहकार्य केले तसेच यापुढेही केले पाहिजे.- अजित पवार, उपमुख्यमंत्री

डेल्टा प्लस हा विषाणू घातक असून, तो वेगाने पसरत आहे. दहीहंडी पथकातील एखाद्या गोविंदाला जरी लागण झालेली असेल तर पूर्ण चमू ताबडतोब बाधित होण्याची भीती असेल.- डॉ. संजय ओक, अध्यक्ष, टास्क फोर्स

दहीहंडी उत्सवात तरूणवर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होतो. जो ३५ च्या आतल्या वयोगटातील असतो. अजूनही आपल्याकडे या वयोगटातील युवकांचे पूर्णपणे लसीकरण झालेले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.- इक्बालसिंह चहल, आयुक्त, मुंबई महापालिका

दहीहंडीचे प्रकरण न्यायालयात असताना, ‘दहीहंडी काय गोविंदांनी पाकिस्तानात जाऊन फोडायची का’ असा प्रश्न काही वर्षांपूर्वी करणाऱ्या शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना दहीहंडी उत्सवाला मनाई करणे दुर्दैवी आहे.- आशिष शेलार, भाजपचे नेते

टॅग्स :Dahi Handiदहीहंडीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरे