शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गर्दी करतो, ताकद दाखवतो तो नव्हे; तर समाजाच्या आरोग्याची काळजी घेतो तोच खरा नेता: उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 15:03 IST

Uddhav Thackeray: भाजपनं आज राज्यभर केलेल्या आंदोलनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका

ठळक मुद्देकोल्हापुरात सारथी उपकेंद्राचा शुभारंभ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलामराठा समाजानं दाखवलेल्या संयमाबद्दल मुख्यमंत्र्यांकडून संभाजीराजेंचं कौतुकभाजपच्या आजच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी साधला निशाणा

Uddhav Thackeray: कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घ्यायला हवी. मागण्या आहेत हे मान्य आहे. पण सरकार जर तुमचं ऐकत असेल तर संघर्ष कशाला? सध्याच्या काळात मोठ्या संख्येनं समाजाला रस्त्यावर उतरवायचं आणि न्याय हक्कासाठी लढा द्यायचा अन् घरी जाताना जे संकट आहे तेचे संकट घरोघरी पोहोचवायचं हे काही नेतृत्वाचं लक्षण नाही, असा घणाघात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या आजच्या आंदोलनावर केला आहे. 

...तर मी राजकारणातून संन्यास घेईन; ओबीसी आरक्षणावरून फडणवीस आक्रमक

कोल्हापुरात सारथी उपकेंद्राचा शुभारंभ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री हसन मुश्रीफ, शाहू छत्रपती, अशोक चव्हाण यांच्या उपस्थित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात मराठा समाजानं दाखवलेल्या संयमाबद्दल भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं कौतुक केलं. संभाजीराजेंचं कौतुक करत असतानाच उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता भाजप नेत्यांवर निशाणा साधला. 

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजप आक्रमक, राज्यभर जोरदार निदर्शनं अन् रास्तारोको

"कोरोनाचं संकट केवळ महाराष्ट्रावर नव्हे, तर जगावर आहे. आरक्षणाचा प्रश्न समोर आहे हे मान्य आहे. पण संघर्षाला रस्त्यावर उतरायचं, न्यायहक्कासाठी गर्दी करायची आणि जे संकट आहे तेच संकट घरोघरी पोहोचवायचं हे काही नेतृत्वाचं लक्षण नाही. खरा नेता तोच आहे जो समाजाचं रक्षण चहुबाजुंनी करतो. आर्थिक आरक्षण, राजकीय आरक्षण, नोकरीत आरक्षण हा जसा न्यायहक्क आहे. तसा समाजाच्या आरोग्याची चिंता वाहणारा नेता पाहिजे. गर्दी केली, ताकद दाखवली नंतर साथ पसरली तर ते काही योग्य होणार नाही. त्यामुळे संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी साधायचा हे ज्याला कळतं तोच खरा नेता असतो", असं उद्धव ठाकरे म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन समाजाला रस्त्यावर उतरू न देता अतिशय समजुतदारपणाने समाजाला शांत राहण्याचं आवाहन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजे छत्रपती यांचे आभार व्यक्त केले. 

"आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज वाटलं असतं तर काहीही करु शकला असता. आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला काही कायदेशीर अडथळे पार करायेच आहेत. आपण कायद्याची लढाई सोडून दिलेली नाही. आपला समजुतदारपणा समाजाला दिशा दाखवणार आहे. मराठा समाजासाठी जे जे काही करता येईल ते सर्व सरकारकडून केले जाईल. सरकार कोणत्याहीप्रकारे मागे राहणार नाही, असे वचन मी तुम्हाला देतो", असं उद्धव ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस