शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

गर्दी करतो, ताकद दाखवतो तो नव्हे; तर समाजाच्या आरोग्याची काळजी घेतो तोच खरा नेता: उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 15:03 IST

Uddhav Thackeray: भाजपनं आज राज्यभर केलेल्या आंदोलनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जोरदार टीका

ठळक मुद्देकोल्हापुरात सारथी उपकेंद्राचा शुभारंभ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आलामराठा समाजानं दाखवलेल्या संयमाबद्दल मुख्यमंत्र्यांकडून संभाजीराजेंचं कौतुकभाजपच्या आजच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी साधला निशाणा

Uddhav Thackeray: कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घ्यायला हवी. मागण्या आहेत हे मान्य आहे. पण सरकार जर तुमचं ऐकत असेल तर संघर्ष कशाला? सध्याच्या काळात मोठ्या संख्येनं समाजाला रस्त्यावर उतरवायचं आणि न्याय हक्कासाठी लढा द्यायचा अन् घरी जाताना जे संकट आहे तेचे संकट घरोघरी पोहोचवायचं हे काही नेतृत्वाचं लक्षण नाही, असा घणाघात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या आजच्या आंदोलनावर केला आहे. 

...तर मी राजकारणातून संन्यास घेईन; ओबीसी आरक्षणावरून फडणवीस आक्रमक

कोल्हापुरात सारथी उपकेंद्राचा शुभारंभ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री हसन मुश्रीफ, शाहू छत्रपती, अशोक चव्हाण यांच्या उपस्थित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात मराठा समाजानं दाखवलेल्या संयमाबद्दल भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं कौतुक केलं. संभाजीराजेंचं कौतुक करत असतानाच उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता भाजप नेत्यांवर निशाणा साधला. 

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजप आक्रमक, राज्यभर जोरदार निदर्शनं अन् रास्तारोको

"कोरोनाचं संकट केवळ महाराष्ट्रावर नव्हे, तर जगावर आहे. आरक्षणाचा प्रश्न समोर आहे हे मान्य आहे. पण संघर्षाला रस्त्यावर उतरायचं, न्यायहक्कासाठी गर्दी करायची आणि जे संकट आहे तेच संकट घरोघरी पोहोचवायचं हे काही नेतृत्वाचं लक्षण नाही. खरा नेता तोच आहे जो समाजाचं रक्षण चहुबाजुंनी करतो. आर्थिक आरक्षण, राजकीय आरक्षण, नोकरीत आरक्षण हा जसा न्यायहक्क आहे. तसा समाजाच्या आरोग्याची चिंता वाहणारा नेता पाहिजे. गर्दी केली, ताकद दाखवली नंतर साथ पसरली तर ते काही योग्य होणार नाही. त्यामुळे संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी साधायचा हे ज्याला कळतं तोच खरा नेता असतो", असं उद्धव ठाकरे म्हणाले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन समाजाला रस्त्यावर उतरू न देता अतिशय समजुतदारपणाने समाजाला शांत राहण्याचं आवाहन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजे छत्रपती यांचे आभार व्यक्त केले. 

"आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा समाज वाटलं असतं तर काहीही करु शकला असता. आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला काही कायदेशीर अडथळे पार करायेच आहेत. आपण कायद्याची लढाई सोडून दिलेली नाही. आपला समजुतदारपणा समाजाला दिशा दाखवणार आहे. मराठा समाजासाठी जे जे काही करता येईल ते सर्व सरकारकडून केले जाईल. सरकार कोणत्याहीप्रकारे मागे राहणार नाही, असे वचन मी तुम्हाला देतो", असं उद्धव ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस