शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

“बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, उद्धव ठाकरे घरगडी समजतात”; CM शिंदेंचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 14:00 IST

CM Eknath Shinde News: उद्धव ठाकरे यांचे राम मंदिराचे प्रेम बेगडी आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली.

CM Eknath Shinde News: आमदार अपात्रता प्रकरणाी निकाल आल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. उद्धव ठाकरे कल्याण दौऱ्यावर असताना, शिंदे पिता-पुत्रांवर सडकून टीका केली. या टीकेबाबत प्रतिक्रिया विचारली असता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच शब्दांत पलटवार केला. बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, उद्धव ठाकरे घरगडी समजतात, या शब्दांत एकनाथ शिंदे यांनी हल्लाबोल केला.

कल्याणमध्ये काय होणार ? घराणेशाहीला विरोध असेल तर गद्दारांच्या घराणेशाहीचे तिकीट मोदीच कापतील. म्हणजे वापरा आणि फेका. हे धोरण. हे गद्दार कचऱ्याच्या टोपलीत जाणार. नाही गेले तर आपण आहोतच कचऱ्याच्या टोपलीत टाकायला. गद्दार घराणेशाहीच्या मुळावर घाव घालण्यासाठी चाललो आहे. आपले माननीय पंतप्रधान महाराष्ट्रात आले होते. माझ्या माहिती प्रमाणे ते पुन्हा एकदा ते येणार आहेत. उद्या मकरसंक्रांत आहे.  तिळगूळ वाटप सुरु आहे. तिळगूळ घ्या गोडगोड बोला. या लोकसभेच्या निवडणुकीत हुकूमशाहीवर संक्रांत येणार, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. याला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. 

बाळासाहेब सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, उद्धव ठाकरे घरगडी समजतात

लोकशाहीत दौरा करायचा प्रत्येकाला अधिकार आहे. उद्धव ठाकरे यांनी घराणेशाहीची व्याख्या सांगावी. जे स्वतःचे  कुटुंब एकत्र ठेवू शकले नाहीत. ज्यांनी  केवळ माझे कुटुंब माझी जवाबदारी  पाहिली. ते यावर बोलत आहेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आपल्या नेत्यांना, सहकाऱ्यांना सवंगडी समजत होते. उद्धव ठाकरे यांनी  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. ते आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजतात, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे राममंदिर उभारण्याचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. उद्धव ठाकरे यांचे राममंदिराचे प्रेम बेगडी आहे. हेच म्हणायचे मंदिर वही बनायेंगे तारीख नहीं बतायेंगे. पण मोदींनी मंदिर पण तयार केले आणि तारीख पण जाहीर केली. राम मंदिर हा आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे. तो राजकीय विषय होऊ शकत नाही. तसेच मोदी यांनी काळाराम मंदिर स्वच्छ केले तसेच मंदिरे स्वच्छ करण्याचे आवाहन केले, त्यानुसार राज्यातील मंदिर स्वच्छ करणे परिसर स्वच्छ केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, आम्ही जी डीप क्लीन मोहीम सुरु केली आहे. त्याने ठाण्यातील प्रदूषण कमी झाले आहे. या डीप क्लीन मोहिमेत समाजातील सर्व घटक  सहभागी होतात. यातून आम्हाला एक लोक चळवळ निर्माण करायची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या स्वच्छ भारत मोहिमेतून याची प्रेरणा घेतली. स्वच्छ भारत अभियानाला जसा प्रतिसाद मिळत आहे. तसाच प्रतिसाद महाराष्ट्र मध्ये मिळतो. याने  प्रदूषण कमी होण्यास खूप परिणाम झाला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना