शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: श्रीकांत शिंदेंचा मतदारसंघ भाजपकडे जाणार? मुख्यमंत्री म्हणाले, “अमित शाहांना सांगितलंय की...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 21:35 IST

Maharashtra Political Crisis: मिशन महाराष्ट्र अंतर्गत भाजप आता खुद्द मुख्यमंत्र्यांच्या पुत्राच्या जागेवरच दावा करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Maharashtra Political Crisis: आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) भाजपने आतापासूनच कंबर कसली असून, मागील वेळेस थोडक्यासाठी पराभव पत्कराव्या लागलेल्या देशभरातील अनेक मतदारसंघावर भर देण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री कामाला लागले आहेत. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघात एन्ट्री करत यावर भाजप दावा करणार असून, हा मतदारसंघ भाजपकडे जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट शब्दांत आपले मत व्यक्त केले आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपचे सध्या मिशन महाराष्ट्र सुरू आहे. भाजपने प्रामुख्याने १६ लोकसभा मतदारसंघ टार्गेट केले आहेत. यात कल्याण लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. या मतदारसंघात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे भाजप आता खुद्द मुख्यमंत्र्यांच्या पुत्राच्या जागेवरच दावा करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर बोलताना, कल्याण डोंबिवलीबाबत सुरू असलेल्या चर्चेची मला माहिती नाही. परंतु आगामी काळातील सर्व निवडणुका आम्ही एकत्र युती म्हणून लढू. शिवसेना-भाजप युती असेल, असे स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले असल्यामुळे आम्ही सगळ्या निवडणुका युतीतच लढणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

उरलेली शिल्लक सेना असेल तर...

एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघाबाबत भाष्य केले. आमच्यासोबत एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात ओरिजिनल शिवसेना आहे. त्यांचे जे लोक आमच्यासोबत आले आहेत. त्यांच्या जागेवर आम्ही कशाला दावा करणार?, उरलेली शिल्लक सेना असेल तर एकनाथ शिंदे आणि आम्ही ठरवू, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष्य केंद्रीत केले आहे का? असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. आमचे मिशन महाराष्ट्र आहे, आमचे मिशन इंडिया आहे. बारामती हे महाराष्ट्रातच येते, महाराष्ट्राबाहेर नाही, असे म्हणत फडणवीस यांनी राष्ट्रवादीला थेट इशारा दिला आहे. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShrikant Shindeश्रीकांत शिंदे