शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

"लखनऊमध्ये त्यांची २०० एकर जागा, पण मी फक्त..."; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2024 10:17 IST

महायुती सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.

CM Eknath Shinde : राज्यातील मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या महायुती सरकारला रविवारी दोन वर्ष पूर्ण झाली. दोन वर्षापूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात राज्यात सत्ता स्थापन केली होती.महायुती सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहीली आहे.  बाळासाहेब ठाकरेंचा विचार राज्याच्या विकासाचा ध्यास यावर दोन वर्षं पूर्ण झाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच एका मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी कमी काळाता महायुती सरकारने खूप काम केल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. यासोबत त्यांनी उद्धव ठाकरेंवरही जोरदार निशाणा साधला.

"प्रत्यक्षात कमी काळाता महायुती सरकारने खूप काम केले. महाविकास आघाडीने बंद केलेली कामे मग ती मेट्रोची असो वा रस्त्याची. ती सर्व कामे आम्ही पुन्हा सुरू केली आहेत. जनतेची इच्छा आहे की आम्ही सत्तेत यावे कारण आम्ही सर्वसामान्यांचे सरकार आहोत. सरकारला २ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि आम्ही खूप काम केले आहे," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यासोबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासकामांचे कौतुक केले आणि या वाटचालीत महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहील, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवरही प्रहार केला. "शिवसेना ठाकरे गटाकडे जे साडेचार टक्के मतं राहिले आहेत. लोकसभेला ठाकरे गटाच्या काही जागा कोणामुळे निवडून आल्या हे सर्वांना माहिती आहे. काँग्रेसची व्होट बँक त्यांच्याकडे आली. मात्र, काँग्रेसची व्होट बँक तात्पुरती आहे. ही तात्पुरती आलेली सूज आहे. पण सूज जास्त काळ राहत नाही," अशी बोचरी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली.

योग्य वेळी सगळं बोलणार - मु्ख्यमंत्री शिंदे

"ठाकरे गटाची जागा फक्त आरोप करणाऱ्यांमध्ये आहे. माझ्याकडे त्यांच्याविषयी भरपूर माहिती आहे. लखनऊमध्ये त्यांची २०० एकर जागा आहे. आणखी कुठे काय काय आहे याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. पण मी आरोपाला फक्त आरोपाने उत्तर देत नाही. यावर योग्य वेळी मी सर्व बोलणार आहे," असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला.

"ज्यांचं आयुष्य फक्त खोके जमा करण्यात गेलं. उठता, बसता त्यांना खोक्याशिवाय काहीही समजलं नाही याचा साक्षीदार मी आहे. राज ठाकरे एकदा म्हणाले होते की, त्यांना खोके नाही कंटेनर पाहिजे. खोके ठेवायला कंटेनर लागतो ना? त्यांनी आयुष्यभर फक्त खोके जमा करण्याचं काम केलं आहे," असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

टॅग्स :MahayutiमहायुतीEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना