शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

कपटी सावत्र भावांपासून बहिणींनी सावध राहावं; CM एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 14:31 IST

सरकारी योजनांवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करणाऱ्या विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

मुंबई - लाडकी बहिण योजना, आनंदाचा शिधा यासारख्या गरिबांसाठी असणाऱ्या योजनांविरोधात विरोधक कोर्टात गेले. गोरगरिबांच्या तोंडचा घास तुम्ही हिसकावण्याचा प्रयत्न करताय. कोविडमध्येही तुम्ही खिचडी हिसकावली. मात्र आता तुम्ही गोरगरिब बहिण, भावांचा घास हिरावताय त्याचे उत्तर तुम्हाला या निवडणुकीत तुम्हाला द्यावे लागेल. त्यामुळे या कपटी सावत्र भावांपासून सावध राहा असं मी माझ्या बहिणींना सांगतो असं विधान करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भीक घेऊ नका, विकले जाऊ नका. लाच घेऊ नका हे कुठले शब्द तुम्ही बहिणींसाठी वापरताय? तुम्हाला १५०० रुपयांचे मोल नाही. मात्र सर्वसामान्य महिला भगिनींना त्याचे मोल आहे. तिचं कुटुंब चालवायला कसरत करावी लागते. १५०० रुपये ती बहिण घरासाठी खर्च करेल. हे पैसे अर्थव्यवस्थेत येतील. अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. माझी प्रत्येक बहिण, कुटुंबातील स्त्री अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे मोफत सिलेंडर योजना, १५०० रुपये दिले आहेत. विरोधकांच्या टीकेला माझ्या बहिणी उत्तर देतील असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय मुघलांच्या घोड्यांना जसं संताजी धनाजी पाण्यात दिसायचे तसं उद्धव ठाकरेंना मी दिसतो. महायुतीचं सरकार स्थापन झालं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालाय हे त्यांना अजून पचनी पडत नाही. दररोज झोपता, उठता, बसता त्यांना स्वप्नातही मी दिसतो. सरकार पडेल, आज पडेल, उद्या पडेल, २ दिवसाने पडेल असं सांगत होते आज सरकारला २ वर्ष होऊन गेली. जे घटनाबाह्य सरकार म्हणतात, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात त्यांनी आणलेल्या योजनेचे तुम्ही फॉर्म कसे भरता, बॅनर लावतात. त्यामुळे हे लोक दुटप्पी आहेत. सर्वसामान्य बहिणींची, लाडक्या भावांची या लोकांना काळजी नाही. या लोकांना केवळ घेणं माहिती आहे देणं नाही. आमचं सरकार देणारं आहे असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, परमबीर सिंह यांनी जे आरोप केले ती वस्तूस्थिती आहे. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात होते. विरोधी पक्षाला अडचणीत आणणं, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणं हे समजू शकतो परंतु मी तर त्यांच्या सरकारमधील मंत्री होतो. माझ्याबाबतीत अशाप्रकारे प्रयत्न केला गेला. मी स्पष्टपणे योग्य वेळी याबाबत सांगेन. मला गुन्ह्यात अडकवण्याचा, माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला ही वस्तूस्थिती आहे. मी योग्य वेळी त्यावर बोलेन असं सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी परमबीर सिंह यांच्या आरोपांना दुजोरा दिला. 

"महाराष्ट्रात शांतता राखण्यासाठी जे काही करावं लागेल ते करू"

सर्वपक्षीय बैठक आम्ही बोलावली होती. त्या बैठकीत संध्याकाळपर्यंत येणार म्हणाले आणि कुणी आले नाही. दुर्दैवाने राज्यात २ समाजात जो संघर्ष सुरू आहे तो थांबला पाहिजे ही माझी आणि सरकारची प्रामाणिक भूमिका आहे. मी शरद पवारांना भेटलो तेव्हाही हेच सांगितले. निवडणूक येते जाते, सरकार येतात, जातात पण असं कधीही आपल्या राज्यात पाहायला मिळालं नव्हते. या महाराष्ट्राची जी संस्कृती, परंपरा आहे त्याला बाधा येता कामा नये. त्यामुळे जे काही समाजासाठी करता येईल, वातावरण शांत करण्यासाठी सर्व प्रयत्न, जे काही करायचे ते आम्ही करू असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांच्या सर्वपक्षीय बैठकीच्या तोडग्यावर दिलं आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४