शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कपटी सावत्र भावांपासून बहिणींनी सावध राहावं; CM एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 14:31 IST

सरकारी योजनांवरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करणाऱ्या विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

मुंबई - लाडकी बहिण योजना, आनंदाचा शिधा यासारख्या गरिबांसाठी असणाऱ्या योजनांविरोधात विरोधक कोर्टात गेले. गोरगरिबांच्या तोंडचा घास तुम्ही हिसकावण्याचा प्रयत्न करताय. कोविडमध्येही तुम्ही खिचडी हिसकावली. मात्र आता तुम्ही गोरगरिब बहिण, भावांचा घास हिरावताय त्याचे उत्तर तुम्हाला या निवडणुकीत तुम्हाला द्यावे लागेल. त्यामुळे या कपटी सावत्र भावांपासून सावध राहा असं मी माझ्या बहिणींना सांगतो असं विधान करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भीक घेऊ नका, विकले जाऊ नका. लाच घेऊ नका हे कुठले शब्द तुम्ही बहिणींसाठी वापरताय? तुम्हाला १५०० रुपयांचे मोल नाही. मात्र सर्वसामान्य महिला भगिनींना त्याचे मोल आहे. तिचं कुटुंब चालवायला कसरत करावी लागते. १५०० रुपये ती बहिण घरासाठी खर्च करेल. हे पैसे अर्थव्यवस्थेत येतील. अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. माझी प्रत्येक बहिण, कुटुंबातील स्त्री अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे मोफत सिलेंडर योजना, १५०० रुपये दिले आहेत. विरोधकांच्या टीकेला माझ्या बहिणी उत्तर देतील असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय मुघलांच्या घोड्यांना जसं संताजी धनाजी पाण्यात दिसायचे तसं उद्धव ठाकरेंना मी दिसतो. महायुतीचं सरकार स्थापन झालं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालाय हे त्यांना अजून पचनी पडत नाही. दररोज झोपता, उठता, बसता त्यांना स्वप्नातही मी दिसतो. सरकार पडेल, आज पडेल, उद्या पडेल, २ दिवसाने पडेल असं सांगत होते आज सरकारला २ वर्ष होऊन गेली. जे घटनाबाह्य सरकार म्हणतात, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात त्यांनी आणलेल्या योजनेचे तुम्ही फॉर्म कसे भरता, बॅनर लावतात. त्यामुळे हे लोक दुटप्पी आहेत. सर्वसामान्य बहिणींची, लाडक्या भावांची या लोकांना काळजी नाही. या लोकांना केवळ घेणं माहिती आहे देणं नाही. आमचं सरकार देणारं आहे असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, परमबीर सिंह यांनी जे आरोप केले ती वस्तूस्थिती आहे. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात होते. विरोधी पक्षाला अडचणीत आणणं, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणं हे समजू शकतो परंतु मी तर त्यांच्या सरकारमधील मंत्री होतो. माझ्याबाबतीत अशाप्रकारे प्रयत्न केला गेला. मी स्पष्टपणे योग्य वेळी याबाबत सांगेन. मला गुन्ह्यात अडकवण्याचा, माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला ही वस्तूस्थिती आहे. मी योग्य वेळी त्यावर बोलेन असं सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी परमबीर सिंह यांच्या आरोपांना दुजोरा दिला. 

"महाराष्ट्रात शांतता राखण्यासाठी जे काही करावं लागेल ते करू"

सर्वपक्षीय बैठक आम्ही बोलावली होती. त्या बैठकीत संध्याकाळपर्यंत येणार म्हणाले आणि कुणी आले नाही. दुर्दैवाने राज्यात २ समाजात जो संघर्ष सुरू आहे तो थांबला पाहिजे ही माझी आणि सरकारची प्रामाणिक भूमिका आहे. मी शरद पवारांना भेटलो तेव्हाही हेच सांगितले. निवडणूक येते जाते, सरकार येतात, जातात पण असं कधीही आपल्या राज्यात पाहायला मिळालं नव्हते. या महाराष्ट्राची जी संस्कृती, परंपरा आहे त्याला बाधा येता कामा नये. त्यामुळे जे काही समाजासाठी करता येईल, वातावरण शांत करण्यासाठी सर्व प्रयत्न, जे काही करायचे ते आम्ही करू असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांच्या सर्वपक्षीय बैठकीच्या तोडग्यावर दिलं आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४