शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

CM Eknath Shinde Birthday: शिंदे साहेब... जीवाला जीव देणारे नेते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 11:53 IST

आपल्या केवळ सहा महिन्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कालावधीत राज्याच्या हिताचे धडाकेबाज निर्णय आणि कृतीतून कायमच सर्वांच्या आदरस्थानी असलेले आणि प्रसंगी आमच्यासारख्या सामान्य सहकार्याच्या जीवाला जीव देणारे महाराष्ट्राचे एकमेव लोकप्रिय, लाडके मुख्यमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय ना. एकनाथजी शिंदे साहेब यांचा आज वाढदिवस....! त्यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा...!

शंभूराज शिवाजीराव देसाई. मंत्री (राज्य उत्पादन शुल्क ): महाराष्ट्र राज्य.पालकमंत्री सातारा, ठाणे जिल्हा -

सन्माननीय शिंदे हे केवळ राजकारणी, स समाजकारणी नाहीत तर ते उत्तम उद्योजक, प्रयोगशील शेतकरी आहेत. सामाजिक जीवनात वावरताना प्रॅक्टिकल विचार करुन त्याला कृतीची पूरक जोड देणारी जी काही मोजकी नेतेमंडळी आहेत, त्यात शिंदेसाहेबांचा अव्वल क्रमांक लागतो. आपल्या मंत्रिपद कार्यकाळात कोरोना संकटाच्या काळ असो अथवा आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या केवळ सहा महिन्यांतील कार्यकाळ असो. कोणताही राजकीय अभिनिवेश न बाळगता ते महाराष्ट्रासाठी ज्या तळमळीने, तडफेने कामे करतात त्याला तोड नाही. त्यामुळेच महाराष्ट्रातील प्रत्येकाला त्यांच्या प्रती जिव्हाळा, आदर, आपलेपणा वाटतो.

कोणतीही विकासकामे साकारताना त्यांनी कधी पक्षीय भेद न करता महाराष्ट्रभर विकासाचे जाळे निर्माण केले प्रसंगी विचारधारा जरी भिन्न असल्या तरी एकमेकांप्रती आदर, मैत्री, जिव्हाळा, आपुलकी सांभाळण्याची आणि जपण्याची आपल्या महाराष्ट्राची राजकीय, सामाजिक परंपरा आहे. शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे संस्कार साहेबांनी आपल्या कृतीतून महाराष्ट्रात रुजवले. त्याच संस्काराच्या शिदोरीवर आमच्यासारखे कार्यकर्ते काम करत आहेत. तोच खरा महाराष्ट्राच्या मातीचा संस्कार आहे. त्याला अहंकाराचा, खुनशीपणाचा वास नाही. त्यामुळे माननीय साहेबांच्यात रुजला तो महाराष्ट्राच्या मातीतला संस्काराचा गुण आहे.शिंदे आता जरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करत असले तरी राज्याच्या विधीमंडळात सहकारी म्हणून २००४ पासून आम्ही एकत्र काम करीत आहे. सन २००४ मध्ये एकाच वेळी आम्ही दोघे ही विधानसभेवर निवडुन आलो तेव्हापासून च नव्हे तर त्यापूर्वी पासून शिवसेनेमध्ये माझे आणि शिंदे साहेबांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि आजही ते तेवढेच जिव्हाळ्याचे आहेत.

सत्ता असो अथवा नसो सत्तेत असताना अहंकार आणि विरोधी पक्षात असताना एकारलेपणा, अक्रस्ताळेपणा मला त्यांच्यात कधीही जाणवला नाही. मैत्री कशी जपावी? सहकाऱ्यांशी कसा स्नेह ठेवावा? हे कुणाकडून शिकावे तर केवळ माझ्यासमोर केवळ एकच आदर्श व्यक्तिमत्त्व उभे राहते ते आदरणीय शिंदे साहेबांचे..! एवढेच नव्हे तर अगदी जीवाला जीव देणारे व्यक्तिमत्त्व कोण आहे ? या प्रश्नाचे उत्तर कोणी विचारले तर ते देखील केवळ आणि केवळ एकच नाव माझ्या डोळ्यासमोर येईल ते म्हणजे शिंदे यांचेच. आणि ही केवळ माझीच भावना नाही तर या राज्याच्या, आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेकांची माझ्यासारखी हीच भावना असेल यात तिळमात्र शंका नाही.

संकटकाळात कोणीही, कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही केलं पाहिजे. मदतीच्या कामांचा दिखावा केला नाही पाहिजे. अनावश्यक प्रसिद्धी केली नाही पाहिजे, प्रत्येकाने आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, असं आपल्या कार्यकर्त्यांना रोखठोकपणे सांगणारे सन्माननीय शिंदे त्यामुळेच वेगळे ठरतात. त्यांचा हा रोखठोक सल्ला राजकीय, सामाजिक जीवनात काम करणाऱ्या प्रत्येकालाच अंतर्मुख करणारा आहे. दिशा देणारा, मार्गदर्शन करणारा आहे. 

शिंदे हे स्पष्टवक्ते आहेत. विकासाची दृष्टी असणारे आणि त्या दृष्टीला कृतीची जोड देणारे नेते आहेत. त्यामुळेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या कामांचा आलेख ठळकपणाने दिसतो. त्यासाठी स्वतंत्रपणे प्रसिद्धी करण्याची गरज लागत नाही. मंत्रिमंडळात त्यांच्याबरोबर काम करत असताना सन्माननीय साहेबांचे फार मोलाचे मार्गदर्शन मिळते. महाराष्ट्राच्या तळागाळातील समस्या, प्रश्न यांबरोबर विकासकामांवरही साहेबांचे बारकाईने कसे लक्ष असते, प्रत्येक विषयाला ते नेहमीच कसे सकारात्मकतेने, संवेदनशीलपणे प्रतिसाद देतात हे या निमित्तानं विशेषत्वाने नमूद करावेच लागेल आणि हे माझ्या सारख्या कार्यकर्त्यांला खऱ्या अर्थाने आणखी मिळालेली शिदोरी समजतो.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मातीशी घट्ट नाळ असलेला हा संवेदनशील आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला नेता राज्याचा डोलारा सांभाळताना आपल्या कर्मभूमी आणि मायभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील गल्ली पासून वाडी वस्तीवरील विकासाच्या प्रश्नांची सोडवणूक करताना ही तेवढ्याच तडफेने तत्पर असतो हे नम्रपणे नमुद करावे लागेल आणि त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे हे माझे मी भाग्य समजतो. त्यांच्या या सहकार्याच्या संवेदनशीलतेच्या भावनेमुळेच महाराष्ट्रात ते अत्यंत लोकप्रिय आहेत.त्यांच्या वागण्या बोलण्यात सातारी कणखर बाणा असला तरी ते मोठ्या मनाचे नेते आहेत. त्यामुळेच केवळ पश्चिम महाराष्ट्रात च नाही तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही त्यांच्याबद्दल प्रत्येकाला आपुलकी, आपलेपणा वाटतो. सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात. त्यांच्यात कधीही अहंकार, आत्मपौढी दिसत नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. 

नवतंत्रज्ञानाचे आणि आधुनिकतेचे आचरण करणारे शिंदे आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर महाराष्ट्रभर आपल्या कीर्तीचा सुगंध पसरवत आहेत. राज्यात प्रत्येकाला त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे. नवकल्पनांच्या जोरावर आणि धडाकेबाज कृतीतून त्यांच्या हातून राज्याची अशीच सेवा निरंतर घडो, त्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो हीच त्यांच्या वाढदिनी माझी प्रार्थना!

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShambhuraj Desaiशंभूराज देसाईShiv SenaशिवसेनाChief Ministerमुख्यमंत्री