शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; "बाळासाहेबांच्या विचारांशी ज्यांनी बेईमानी केली..."  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 16:39 IST

होय मी कंत्राटी मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या विकासाचं कंत्राट घेतलंय, हे राज्य अधिक समृद्ध करण्याचं कंत्राट घेतलंय असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेत्यांना लगावला.

मुंबई - तुमचे लोक असताना आमचे लोक होते का? आमचे लोक घोषणा देत असताना तुमचे लोक पुढे गेले. मिटकरी आला आणि कळ काढायला लागला. रोज गद्दार गद्दार, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली नाही. बाळासाहेब म्हणायचे, काँग्रेस-राष्ट्रवादीचा आपला शत्रू, त्यांना जवळ करण्यापेक्षा मी माझं दुकान बंद करेन. आम्ही भाजपा-शिवसेना युती म्हणून निवडणूक लढवली. बहुमत मिळालं त्यानंतर अनैसर्गिक आघाडी केली. बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी कुणी केली? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला. 

एकनाथ शिंदे म्हणाले की, सिल्लोडच्या सभेत लोकांची दुतर्फा गर्दी झाली होती. सगळीकडे लोक बाहेर पडले होते. आम्ही गद्दार असतो तर लोकांनी आमच्याकडे पाठ फिरवली असती. आम्ही घेतलेली भूमिका ही लोकांना पटली आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी ज्यांनी बेईमानी केली त्यांच्याशी फारकत घेतली. आम्हाला भाडोत्री फौजफाट्याची आवश्यकता नाही असं त्यांनी म्हटलं.  

होय, मी कंत्राटी मुख्यमंत्री...माझा उल्लेख कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून केला. राज्याचा कुणीही मुख्यमंत्री असू द्या. नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबद्दल बोलले तेव्हा केंद्रीय मंत्री असताना त्यांना जेलमध्ये टाकून दिले. मुख्यमंत्र्याविरोधात अपशब्द वापरले. या देशाच्या लोकशाहीत घटनेप्रमाणे आम्ही इथं बसलोय. बहुमत सिद्ध करून बसलोय. आम्ही घटनेविरोधात कृत्य करणार नाही. जे अध्यक्ष आहेत त्यांना घटनेचा अभ्यास आहे. वैचारिक पातळी घसरली आहे. होय मी कंत्राटी मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या विकासाचं कंत्राट घेतलंय, हे राज्य अधिक समृद्ध करण्याचं कंत्राट घेतलंय. गोरगरिब जनतेचे अश्रू दूर करण्याचं कंत्राट घेतलंय. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचं कंत्राट घेतलंय. बहुजनांच्या हितासाठी कंत्राट घेतलंय. असंगाशी विसंगती करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री कधीही बरा असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं. 

केवळ वैचारिक दिवाळखोरीकेवळ वैचारिक दिवाळखोरीतून हिणवणे हेच उद्योग सुरू आहे. प्रत्येकाने मर्यादा सांभाळली पाहिजे. आम्ही आमच्या कामातून उत्तर देऊ. माझ्याकडे पण टँलेट आहे. माझ्या कलागुणांना कधी व्यासपीठ उपलब्ध करून दिले नाही. तुम्ही गपचुप जायचे. कानात सांगायचे. एकदा बोलणं झालं की संपलं मग. आणखी पुढेही शिल्लक ठेवायचं आहे. आम्हाला येऊन दीडच महिने झाले. पेट्रोल डिझेलचे दर कमी केले. १४ लाख शेतकऱ्यांना ६ हजार कोटींचे वाटप येत्या सप्टेंबरपासून सुरू होतंय अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना