शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

'चाहिए खर्चा, निकालो मोर्चा'! काही लोक तडजोड झाली नाही की...; एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 17:50 IST

धारावीच्या मुद्द्यावर विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे...

धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत अदानी समूहाच्या बीकेसी येथील कार्यालयावर मोर्चा काढला होता. महत्वाचे म्हणजे, पुनर्विकासाच्या माध्यमातून सरकार केवळ अदानी समूहाच्या फायद्याचा विचार करत असल्याचा आरोप करत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर आता, धारावीच्या मुद्द्यावर विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला असून, "काही लोक तडजोड झाली नाही की, असे मोर्चे काढतात. त्याला आपण 'चाहीए खर्चा, निकालो मोर्चा' असे म्हणतो", असे म्हणत खिल्ली उडवली आहे.

शिंदे म्हणाले, "धारावीकर ज्या काही नरक यातना भोगत आहेत, त्यातून आपण त्यांना बाहेर काढायला हवे. धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी न राहता. धारावीचा विकास कसा झाला? धरावीकरांचे जीवन कशा प्रकारे सुसह्य झाले? हे बघण्यासाठी जगातील लोकांनी यायला हवे." एवढेच नाही, तर "तेथे 300 स्क्वेअर फूट एसआरएमध्ये मिळते, आता येथे 350 स्क्वेअर फूड देण्याचा निर्णय झाला आहे," असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

शिंदे पुढे म्हणाले, "काही लोक तडजोड झाली नाही की, असे मोर्चे काढतात. त्याला आपण म्हणतो, 'चाहिए खर्चा, निकालो मोर्चा'. कुणी तरी मध्यंतरी माध्यमाला एक स्टेटमेंट दिले होते, मग ज्याच्या विरोधात मोर्चा काढला, एक वर्षापूर्वी तो तेथे मिटिंगला होता. हे मी बोलत नाही, टीव्हीवर जाहीर स्टेटमेंट आहे. यामुळे आपण यावर विचार करण्याची आवश्यकता आहे आणि या धारावी करांचे जे जीवन आहे. ते आज ज्या पद्धतीने जगत आहेत, त्यातून त्यांना बाहेर काढायचे असेल, तर सर्वांनी सकारात्मक भूमी घेणे आवश्यक आहे."

याच बरोबर, "कुणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करता कामा नये. जे काही ट्रान्सफरंट आहे, त्या सर्व बाबी येथे आहेत. सूचना आणि हरकतीला आणखी वेळ आहे. ते न करता. मोर्चा काढून काही तरी दबाव आणायचा, मग काही तरी  बोलणी होईल. हे सर्व लोकांना माहीत आहे," असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना