शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

'चाहिए खर्चा, निकालो मोर्चा'! काही लोक तडजोड झाली नाही की...; एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 17:50 IST

धारावीच्या मुद्द्यावर विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे...

धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत अदानी समूहाच्या बीकेसी येथील कार्यालयावर मोर्चा काढला होता. महत्वाचे म्हणजे, पुनर्विकासाच्या माध्यमातून सरकार केवळ अदानी समूहाच्या फायद्याचा विचार करत असल्याचा आरोप करत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर आता, धारावीच्या मुद्द्यावर विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला असून, "काही लोक तडजोड झाली नाही की, असे मोर्चे काढतात. त्याला आपण 'चाहीए खर्चा, निकालो मोर्चा' असे म्हणतो", असे म्हणत खिल्ली उडवली आहे.

शिंदे म्हणाले, "धारावीकर ज्या काही नरक यातना भोगत आहेत, त्यातून आपण त्यांना बाहेर काढायला हवे. धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी न राहता. धारावीचा विकास कसा झाला? धरावीकरांचे जीवन कशा प्रकारे सुसह्य झाले? हे बघण्यासाठी जगातील लोकांनी यायला हवे." एवढेच नाही, तर "तेथे 300 स्क्वेअर फूट एसआरएमध्ये मिळते, आता येथे 350 स्क्वेअर फूड देण्याचा निर्णय झाला आहे," असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

शिंदे पुढे म्हणाले, "काही लोक तडजोड झाली नाही की, असे मोर्चे काढतात. त्याला आपण म्हणतो, 'चाहिए खर्चा, निकालो मोर्चा'. कुणी तरी मध्यंतरी माध्यमाला एक स्टेटमेंट दिले होते, मग ज्याच्या विरोधात मोर्चा काढला, एक वर्षापूर्वी तो तेथे मिटिंगला होता. हे मी बोलत नाही, टीव्हीवर जाहीर स्टेटमेंट आहे. यामुळे आपण यावर विचार करण्याची आवश्यकता आहे आणि या धारावी करांचे जे जीवन आहे. ते आज ज्या पद्धतीने जगत आहेत, त्यातून त्यांना बाहेर काढायचे असेल, तर सर्वांनी सकारात्मक भूमी घेणे आवश्यक आहे."

याच बरोबर, "कुणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करता कामा नये. जे काही ट्रान्सफरंट आहे, त्या सर्व बाबी येथे आहेत. सूचना आणि हरकतीला आणखी वेळ आहे. ते न करता. मोर्चा काढून काही तरी दबाव आणायचा, मग काही तरी  बोलणी होईल. हे सर्व लोकांना माहीत आहे," असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना