शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी CM एकनाथ शिंदेंची माफी; विरोधकांना केलं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 17:53 IST

छत्रपती शिवाजी महाराज हा विषय राजकारणाचा नाही. हा विषय आमच्यासाठी श्रद्धा आणि अस्मितेचा आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

मुंबई - मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर राज्यात सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात आला. विरोधकांनी या मुद्द्यांवर रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलन केले. या घटनेबाबत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागत विरोधकांनाही आवाहन आहे. छत्रपती शिवाजी महाराज ही आपली श्रद्धा, अस्मिता आहे यावर विरोधकांनी राजकारण करू नये, सर्वांनी एकमताने शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा त्याठिकाणी कसा उभा राहील यासाठी सहकार्य करावे असं शिंदेंनी म्हटलं आहे.

मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले की, विरोधक माफीची मागणी ते करतायेत, छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांचं आराध्य दैवत आहे. त्यांच्या चरणावर मी एकदा नव्हे १०० वेळा डोकं ठेवायला तयार आहे. १०० वेळा माफी मागायला कमीपणा वाटणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच आम्ही राज्याचा कारभार करतो. मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोधकांनीही सद्बुद्धी द्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांचा रुबाबदार पुतळा तिथे उभारण्यासाठी ज्या काही सूचना असतील त्या विरोधकांनी सांगितल्या पाहिजेत. सहकार्य केले पाहिजे. झालेली घटना दुर्दैवी आहे. नौदलाने चांगल्या भावनेने तो पुतळा उभारला पण ही घटना घडलेली आहे. या घटनेचं राजकारण करणे त्यापेक्षा दुर्दैवी आहे. राजकारण करायला इतर मुद्दे आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज आपली श्रद्धा, दैवत आहे यावर राजकारण करू नये असं त्यांनी सांगितले. 

तसेच कालच्या बैठकीत तो संपूर्ण परिसर संरक्षित करावा अशी नेव्हीच्या अधिकाऱ्यांनी मागणी केली आहे. त्यांच्या अधिकाऱ्यांना तिथे पाहणी करणे आणि हा पुतळा पुन्हा उभं करणे यासाठी ते कटिबद्ध आहे. अजित पवारांनीही जाहीर माफी मागितली. शिवसेना, भाजपा आणि अजित पवार  आम्ही सगळे महायुतीत काम करतो. छत्रपती शिवाजी महाराज हा विषय राजकारणाचा नाही. हा विषय आमच्यासाठी श्रद्धा आणि अस्मितेचा आहे. त्यामुळे कुणीही यामध्ये राजकारण न करता शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा तिथं उभा कसा राहील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

दरम्यान, मालवणची घटना अतिशय दुर्दैवी, मनाला वेदना देणारी आहे. नेव्हीने जो कार्यक्रम तिथे घेतला तो चांगल्या भावनेने घेतला होता. दुर्दैवाने शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला. त्याबाबत काल महत्त्वाची बैठक बोलावली होती. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नेव्हीचे अधिकारी आणि आपले अधिकारी होते. त्यात २ संयुक्त समिती स्थापन केली. त्यात एक समिती दुर्घटना कशी झाली त्याची चौकशी आणि कारवाई करेल. दुसरी समिती त्यात तज्ज्ञ, शिल्पकार, आयआयटी, इंजिनिअर, नेव्हीचे अधिकारी असतील त्या समितीच्या माध्यमातून लवकरात लवकर शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे उभा राहिले ही जनसामान्यांची भावना आहे. त्यावर आम्ही लक्ष केंद्रीत करतोय. अनेक शिल्पकारांना आम्ही बैठकीला बोलावले होते. मालवणात पुन्हा मजबुतीने पुतळा उभा राहावा. लोकांच्या भावना तीव्र आहेत त्या आम्ही समजू शकतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजBJPभाजपा