शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

'मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी', विधानसभेच्या कामकाजावर विरोधकांचा दिवसभरासाठी बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:58 IST

Monsoon Session Maharashtra: 'शेतकऱ्यांचा अपमान सत्ताधाऱ्यांनी केल्याचाही विरोधकांचा आरोप

Monsoon Session Maharashtra: गेल्या दोन-चार महिन्यात महाराष्ट्रात विविध मुद्दे गाजले. अनेक मुद्द्यांवरून महाविकास आघाडीने महायुती सरकारले घेरले. त्यामुळे सोमवारपासून सुरु झालेल्या पावसाळी अधिवेशनाकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक प्रचंड आक्रमक झाल्याचे दिसले. कृषिमंत्री शेतकऱ्यांविरोधात विधाने करतात, भाजपाचे माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकर यांनी देखील शेतकऱ्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले अशा मुद्द्यांवरून विरोधकांनी विधानसभेत जोरदार आक्षेप घेतला. तसेच, विधानसभेच्या दिवसभराच्या कामकाजावरही बहिष्कार घातला.

नाना पटोलेंचे निलंबन

शेतकऱ्यांचा वारंवार अपमान सत्ताधारी करत आहेत, अशा सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी केली. शेतकऱ्यांच्या विषयावर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोलेविधानसभा अध्यक्षांच्या स्थानाजवळ गेले. या गोंधळामुळे विधानसभेचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर 'मुख्यमंत्री माफी मागा' अशी पुन्हा घोषणाबाजी सुरू झाली. त्यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांच्यावर एक दिवसाच्या निलंबनाची कारवाई केली.

"शेतकऱ्यांविरोधात विधान करणाऱ्यांचे सरकारकडून समर्थन?"

राज्यात आज शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे. बारा जिल्ह्यातील शेतकरी या महामार्गाला विरोध करत आहे, दुसरीकडे राज्याचे कृषिमंत्री शेतकऱ्यांविरोधात विधान करतात, सत्ताधारी आमदार बबनराव लोणीकर शेतकरी आमच्या पैशावर जगतात अशी उपकाराची भाषा करतात. लोणीकर यांच्यावर कारवाई होत नाही. यावरून अशी विधाने करणाऱ्यांचे सरकार समर्थन करत आहे का? असा सवाल काँग्रेस विधिमंडळाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

"सभागृहात विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न"

शेतकऱ्यांच्या विषयावर विरोधकांना सभागृहात बोलू दिले जात नाही, निलंबन केले जाते. शेतकऱ्यांच्या विषयावर आंदोलन करू, तुरुंगात टाकले तरी चालेल पण शेतकऱ्यांसाठी आम्ही लढत राहू, अशी आक्रमक भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतली. महाविकास आघाडीच्या नेत्यांना सभागृहात बोलूच दिले जात नाही, उलट शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलल्यावर कारवाई करण्यात येते, असा आरोप विरोधकांनी केला. यावर महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. विरोधकांनी पूर्ण दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार टाकत सभात्याग केला.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाMaharashtraमहाराष्ट्रNana Patoleनाना पटोलेVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस