शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

"महाराष्ट्रातल्या मोठ्या वक्फ घोटाळ्यात काँग्रेसचे बडे नेते"; CM फडणवीसांनी दिले कारवाईचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 08:45 IST

महाराष्ट्रातल्या मोठ्या वक्फ जमीन घोटाळ्यावर सरकार लवकरच कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

CM Devendra Fadnavis on Waqf Amendment Bill 2025: शुक्रवारी सकाळी संसदेत जोरदार चर्चेनंतर वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकावर लोकसभा आणि राज्यसभेत जोरदार चर्चा झाली. त्यानंतर बहुमताने वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं. त्यानंतर आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठण्यात येणार आहे. त्यानंतर याचे कायद्यात रुपांतर होईल. दुसरीकडे, महाराष्ट्रात मोठा वक्फ जमीन घोटाळा झाला असून यासंदर्भात आम्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर कारवाई करू, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

गुरुवारी लोकसभेनंतर राज्यसभेतही बहुमताने वक्फ दुरूस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं. लोकसभेत या विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली तर विरोधात २३२ एवढी मतं पडली.  अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत हे विधेयक मांडले होते. एआयएमआयएम आणि काँग्रेसच्या खासदारांनी वक्फ दुरुस्ती विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. हे घटनात्मक तरतुदींच्या विरोधात असल्याचे म्हणत सभागृहातील हा लढा आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. या विधेयकाविरोधात अनेक संघटना रस्त्यावर उतरून आंदोलनही करत आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्रातल्या वक्फ घोटाळ्यावर महाराष्ट्र सरकार कारवाई करणार असल्याचे द हिंदूला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

'जीव देऊ, पण दुरुस्ती मान्य करणार नाही', वक्फ विधेयकाविरोधात मुस्लिम संघटना रस्त्यावर

२००० ते २०१४ दरम्यान महाराष्ट्रात झालेल्या मोठ्या वक्फ जमीन घोटाळ्यावर महाराष्ट्र सरकार लवकरच कारवाई करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. वक्फ दुरुस्ती विधेयकाचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही. वक्फचे दुरुस्ती विधेयक  लोकशाहीवादी, समाजवादी प्रजासत्ताक भारताच्या घटनात्मक भावनेशी सुसंगत असून समाजाच्या फायद्यासाठी हे विधेयक मंजूर करण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.  जर मालमत्ता अल्लाहच्या नावावर असेल तर ती पारदर्शक असली पाहिजे आणि ती लोकांच्या हितासाठी वापरली जावी, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

"संपूर्ण वक्फची जमीन काँग्रेसने बळकावली आहे. २००० ते २०१४ या काळात मोठा घोटाळा झाला. काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांची त्यात नावे होती. मी विधानसभेतही हा मुद्दा मांडला होता. न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने ही जमीन या नेत्यांनी बळकावल्याचा अहवाल दिला होता. आता या प्रकरणी आम्ही कारवाई करणार आहोत," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या घोटाळ्यात सहभागी असलेल्या काँग्रेस नेत्यांच्या नावांबद्दल विचारले असता, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नावे आठवत नाहीत, परंतु अनेक प्रमुख नेत्यांची नावे होती, असं म्हटलं. 

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रcongressकाँग्रेस