शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
3
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
4
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
5
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
6
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
7
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
8
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
9
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
10
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
11
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
12
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
13
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
14
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
15
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
16
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
17
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
18
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
19
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
20
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
Daily Top 2Weekly Top 5

“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 14:40 IST

CM Devendra Fadnavis Replied Sharad Pawar: पराभव झाल्यानंतर तो स्वीकारता आला पाहिजे. मोकळ्या मनाने चुका कबूल केल्या पाहिजेत. आत्मपरीक्षण करणे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला.

CM Devendra Fadnavis Replied Sharad Pawar: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विरोधकांनी केंद्रीय निवडणूक आयोग, भाजपावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही बिहार निवडणूक निकालावरून जोरदार हल्लाबोल केला. परंतु, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसच्या चुका दाखवायला मागे-पुढे पाहिले नाही. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच बिहार निवडणूक निकालावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली. शरद पवारांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.

मला एक शंका होती की, बिहारच्या महिलांनी इतक्या मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला याचा अर्थ आहे की दहा हजार रुपये देण्याची जी योजना आहे त्याचा हा परिणाम असावा. त्याचवेळी मतदान झाले होते. महाराष्ट्रात निवडणुकीच्या आधी पैसे वाटले. मताला पैसे येतात तसे नाही. अधिकृतपणे पैसे वाटले गेले. तसेच बिहारमध्ये झाले. पुढच्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचे वाटप करून निवडणुकीला सामोरे जायचे अशी भूमिका घेतली तर एकंदरीत निवडणूक पद्धतीबद्दल लोकांच्या विश्वासाला धक्का बसेल याची चिंता आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचे वाटप करणे हे योग्य आहे का, याचा विचार निवडणूक आयोगाने केला पाहिजे. निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात याच्यामध्ये दुमत असण्याचे कारण नाही. पण दहा दहा हजार रुपये ती लहान रक्कम नाही, असे शरद पवार यांनी म्हटले होते. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया विचारण्यात आली.

जो जीता वहीं सिकंदर, पराभव स्वीकारता आला पाहिजे

जो जीता वहीं सिकंदर, पराभव झाल्यानंतर तो स्वीकारता आला पाहिजे. मोकळ्या मनाने आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत. आत्मपरीक्षण केले पाहिजे. आत्मपरीक्षण करणे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही. खऱ्या अर्थाने या ठिकाणी ज्या योजना आहेत, त्या करण्याची संधी सगळ्यांना होती. त्यांचे सरकार असताना त्यांनाही होती. त्यांनी केल्या नाहीत. आम्ही योजना केल्या, त्या लोकांना आवडल्या. लोकांनी आम्हाला मतदान केले. त्यावर लोकांना दोष देण्याचे कारण काय आहे, असा प्रतिप्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला. 

दरम्यान, राहुल गांधी जोपर्यंत आत्मपरीक्षण करणार नाही, तोपर्यंत काही उपयोग नाही. आगामी स्थानिक स्वराज्य पक्षांच्या निवडणुका विरोधी पक्ष एकत्र लढतोय की, वेगवेगळा लढतोय यापेक्षा मुंबईच्या जनतेचा महायुतीवर विश्वास आहे. जनतेने महायुतीचाच महापौर बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोण काय लढत आहे, हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, या ठिकाणी महायुती निवडून येईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Fadnavis to Pawar: You didn't bring good schemes, winner takes all.

Web Summary : Fadnavis retorted to Pawar's criticism regarding Bihar election and fund distribution. He emphasized accepting defeat, self-introspection, and highlighted the popularity of their schemes. He added that Mumbai trusts Mahayuti.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवार