शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 23:20 IST

CM Devendra Fadnavis Reply To Rahul Gandhi On Vote Chori: महाराष्ट्रातील पराभव जिव्हारी लागला आहे. जनतेने जो झटका दिला, त्यातून ते अजूनही वर येऊ शकलेले नाहीत, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना लगावला आहे.

CM Devendra Fadnavis Reply To Rahul Gandhi On Vote Chori: महाराष्ट्रातील पराभव त्यांना जिव्हारी लागला आहे. त्यांना फार अपेक्षा होती. त्यांनी हॉटेलही बूक करून ठेवले होते. त्यांनी मंत्रिमंडळाची रचना केली होती. काँग्रेसमध्ये अनेक मुख्यमंत्री तयार झाले होते आणि अशातच त्यांना जो जनतेने झटका दिला त्यातून ते अजून वर येऊ शकलेले नाहीत. आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या संदर्भात केलेली सगळी वक्तव्य खोटी निघाली. सगळी वक्तव्य ही पुराव्याविना केली होती आणि त्याचे पुरावे निवडणूक आयोगाने तात्काळ दिल्याने ते तोंडावर आपटले आहेत, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला.

पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल गांधींनी हायड्रोजन बॉम्ब-हायड्रोजन बॉम्ब सांगितला, तर अख्खा भारत घाबरलेला होता की, आता हे कोणता हायड्रोजन बॉम्ब फोडणार, पण लवंगी फटाका ते फोडू शकले नाहीत. त्यांनी फुसका बार लावला आहे. मी यापूर्वीही सांगितले होते की, राहुल गांधी हे सीरियल लायर आहेत. रोज खोटे बोलायचे आणि गोबेल्सचे तत्व मांडायचे, हा प्रयत्न त्यांचा असतो. इतके वेळा निवडणूक आयागाने त्यांना नोटीस दिली. परंतु, ते एकही पुरवा आजपर्यंत देऊ शकले नाहीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

अशा प्रकारचा नेता मी यापूर्वी कधीही बघितलेला नाही

तरीही राहुल गांधींचे एका गोष्टीसाठी कौतुक करतो की, प्रत्येक वेळी माध्यमांसमोर येऊन खोटे बोलण्याची त्यांची हिंमत खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. अशा प्रकारचा नेता मी यापूर्वी कधीही बघितलेला नाही, असा खोचक टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला. तसेच ते कितीही खोटे बोलले तरी जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही. त्यांना जनतेतच जावे लागेल. जनतेत जातील तरच निवडणुकींचे निकाल कदाचित कधीतरी त्यांच्या बाजूने येतील. पण असेच खोटे बोलत राहिले तर कधीच त्यांच्या बाजूने निकाल येऊ शकत नाही, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयुक्त मतचोरीला संरक्षण देत आहेत. विरोधकांची नावे मतदार यादीतून वगळली जातात. त्यात प्रामुख्याने दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समुदायाची नावे हटवण्यात आली. मतदारांची नावे जाणुनबुजून यादीतून काढण्यात आली. ज्यांच्या नावाने ही नावे काढली त्यांनाही याची कल्पना नाही. आळंदमध्ये याहून अधिक मते वगळली गेली असतील परंतु आम्ही ६ हजार मतदार काढले. इतर राज्यातील मोबाईल नंबर वापरून कर्नाटकातील मतदार यादीतून काढले गेले, असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPoliticsराजकारण