शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 23:20 IST

CM Devendra Fadnavis Reply To Rahul Gandhi On Vote Chori: महाराष्ट्रातील पराभव जिव्हारी लागला आहे. जनतेने जो झटका दिला, त्यातून ते अजूनही वर येऊ शकलेले नाहीत, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना लगावला आहे.

CM Devendra Fadnavis Reply To Rahul Gandhi On Vote Chori: महाराष्ट्रातील पराभव त्यांना जिव्हारी लागला आहे. त्यांना फार अपेक्षा होती. त्यांनी हॉटेलही बूक करून ठेवले होते. त्यांनी मंत्रिमंडळाची रचना केली होती. काँग्रेसमध्ये अनेक मुख्यमंत्री तयार झाले होते आणि अशातच त्यांना जो जनतेने झटका दिला त्यातून ते अजून वर येऊ शकलेले नाहीत. आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या संदर्भात केलेली सगळी वक्तव्य खोटी निघाली. सगळी वक्तव्य ही पुराव्याविना केली होती आणि त्याचे पुरावे निवडणूक आयोगाने तात्काळ दिल्याने ते तोंडावर आपटले आहेत, या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला.

पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल गांधींनी हायड्रोजन बॉम्ब-हायड्रोजन बॉम्ब सांगितला, तर अख्खा भारत घाबरलेला होता की, आता हे कोणता हायड्रोजन बॉम्ब फोडणार, पण लवंगी फटाका ते फोडू शकले नाहीत. त्यांनी फुसका बार लावला आहे. मी यापूर्वीही सांगितले होते की, राहुल गांधी हे सीरियल लायर आहेत. रोज खोटे बोलायचे आणि गोबेल्सचे तत्व मांडायचे, हा प्रयत्न त्यांचा असतो. इतके वेळा निवडणूक आयागाने त्यांना नोटीस दिली. परंतु, ते एकही पुरवा आजपर्यंत देऊ शकले नाहीत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

अशा प्रकारचा नेता मी यापूर्वी कधीही बघितलेला नाही

तरीही राहुल गांधींचे एका गोष्टीसाठी कौतुक करतो की, प्रत्येक वेळी माध्यमांसमोर येऊन खोटे बोलण्याची त्यांची हिंमत खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. अशा प्रकारचा नेता मी यापूर्वी कधीही बघितलेला नाही, असा खोचक टोला मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला. तसेच ते कितीही खोटे बोलले तरी जनतेचा त्यांच्यावर विश्वास नाही. त्यांना जनतेतच जावे लागेल. जनतेत जातील तरच निवडणुकींचे निकाल कदाचित कधीतरी त्यांच्या बाजूने येतील. पण असेच खोटे बोलत राहिले तर कधीच त्यांच्या बाजूने निकाल येऊ शकत नाही, असे फडणवीस म्हणाले.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयुक्त मतचोरीला संरक्षण देत आहेत. विरोधकांची नावे मतदार यादीतून वगळली जातात. त्यात प्रामुख्याने दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समुदायाची नावे हटवण्यात आली. मतदारांची नावे जाणुनबुजून यादीतून काढण्यात आली. ज्यांच्या नावाने ही नावे काढली त्यांनाही याची कल्पना नाही. आळंदमध्ये याहून अधिक मते वगळली गेली असतील परंतु आम्ही ६ हजार मतदार काढले. इतर राज्यातील मोबाईल नंबर वापरून कर्नाटकातील मतदार यादीतून काढले गेले, असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPoliticsराजकारण