शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एकनाथ शिंदेंना पुन्हा धक्का! बांधकाम व्यावसायिकाची 'मित्र'मधून उचलबांगडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 12:10 IST

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अजय आशर यांना मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मित्र’ संस्थेच्या उपाध्यक्षपदावरून हटवलं

Ajay Asher Removed From MITRA: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का दिल्याचे म्हटलं जात आहे. एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय अजय आशर यांना मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मित्र’ संस्थेच्या उपाध्यक्षपदावरून हटवलं आहे. अजय आशर यांच्या उचलबांगडीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राजकीय धक्का बसल्याचे म्हटलं जात आहे. दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता पदमुक्त केलं होतं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना निवृत्त झालेले कैलास जाधव यांना एमसीआरडीसीच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी कैलास जाधव यांना तात्काळ सेवामुक्त करण्याचे आदेश दिले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात घेतलेले अनेक महत्त्वाचे निर्णय फडणवीस सरकारकडून बदलले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिल्याचे म्हटलं जात आहे. नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रात महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशनची निर्मिती केली आहे. एकनाथ शिंदे यांचे सरकारअसताना २०२२ मध्ये उपमुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय अजय आशर यांना मित्राचे उपाध्यक्ष केलं होते. मात्र आता मुख्यमंत्री फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अजय आशर यांची मित्रच्या नियमित मंडळावरुन उचलबांगडी केली आहे. त्यांच्या जागी दिलीप वळसे पाटील, राणा जगजितसिंह पाटील, राजेश क्षीरसागर यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

अजय आशर हे मोठे बांधकाम व्यावसायिक असून आणि आशर ग्रुपचे चेअरमन आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मित्रा संस्थेच्या उपाध्यक्षपदी अजय आशर आणि डॉ.राजेश क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली होती. अजय आशर यांचे बांधकाम क्षेत्र, सामाजिक, नागरी आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठं नाव आहे. दोन वर्षापूर्वी झालेल्या दावोस दौऱ्याच्या शिष्टमंडळात ‘मित्र’च्या अजय आशर यांचाही समावेश होता.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या काही निर्णयांवरुन मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यातील 'शीतयुद्ध'ची चर्चा फेटाळून लावली होती. काही लोकांना कथा तयार करण्यात सलीम-जावेद यांच्याशी स्पर्धा करायची आहे. आम्हा दोघांना ओळखणाऱ्या लोकांना आम्ही एकत्र आल्यावर काय करतो ते कळेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार