शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

राज ठाकरेंचा विधानसभा निकालांवर संशय, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 20:06 IST

CM Devendra Fadnavis First Reaction On Raj Thackeray Statement: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर शंका व्यक्त करणाऱ्या राज ठाकरेंवर महायुतीतील नेते टीका करताना पाहायला मिळत आहेत.

CM Devendra Fadnavis First Reaction On Raj Thackeray Statement: वरळी येथे मनसेचा राज्यस्तरीय मेळावा पार पडला.  या मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत काही आक्षेप नोंदवत संशय व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीचे निकाल येऊन अनेक दिवस उलटले आहे. नंतर प्रथमच राज ठाकरे यांनी मेळाव्यात कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांसमोर जाहीरपणे भूमिका मांडली. राज ठाकरे यांनी केलेल्या मतप्रदर्शनावरून भाजपासह महायुतीतील नेते राज ठाकरेंवर टीका करत आहेत. यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकावर पहिली प्रतिक्रिया दिली. 

विधानसभा निवडणूक निकाल लागल्यावर महाराष्ट्रभर सन्नाटा पसरला. लोकांनाच हा निर्णय कळला नाही, पचला नाही. माझ्याकडे संघ परिवाराशी संबंधित एक व्यक्ती आली होती, ते म्हणाले 'इतना सन्नाटा क्यो है भाई, कोई तो जिता होगा... कोणीतरी जिंकलं ना मग जल्लोष का नाही? काही काही गोष्टींवर विश्वासच बसू शकत नाही. भाजपाला १३२ जागा मिळाल्या, मागील वेळी १०५ मिळाल्या होत्या. २०१४ साली १२२ जागा होत्या. भाजपाचे समजू शकतो, पण अजित पवारांना ४२ जागा कुणाचा तरी विश्वास बसेल का? त्याशिवाय जे इतके वर्ष राजकारण करत आले, ज्यांच्या जीवावर हे लोक मोठे झाले त्या शरद पवारांना फक्त १० जागा मिळतात.  या सर्व न समजण्यासारख्या गोष्टी आहेत, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथे प्रचारसभा, बैठका घेत आहेत.

पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेवर प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, राज ठाकरे यांच्याबद्दल आपण महाराष्ट्रात बोलू, असे सांगत एका वाक्यात उत्तर दिले. तसेच दिल्ली विधानसभेत परिवर्तन होणार आहे. दिल्लीची जनता भाजपासोबत जाणार आहे. दिल्लीतील परिवर्तन महिला करणार आहेत. आम आदमी पक्षाचे सरकार उलथवण्याचा निर्णय दिल्लीकरांनी घेतला आहे, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. 

दरम्यान, राज ठाकरे यांनी निवडणूक निकालाची दाखले देत चिरफाड केली. हा निकाल कसा लागला यावर संशय व्यक्त करत लोकसभेनंतर लगेचच तीन चार महिन्यात निकाल फिरतो कसा? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. आपल्याला लोकांनी मतदान केले आहे. फक्त ते आपल्यापर्यंत आले नाही, असा दावा करत आता आगामी निवडणुकीच्या कामाला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाMNSमनसेmaharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024