शहरं
Join us  
Trending Stories
1
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
2
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
3
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
4
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
5
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
6
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
7
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
8
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
9
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
10
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
11
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
12
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
13
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
14
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
15
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
16
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
17
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
18
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
19
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
20
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadnavis : "अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर चित्रपट तयार करणार"; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 17:22 IST

Devendra Fadnavis And hilyabai Holkar : देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट तयार करणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. याच दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट तयार करणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. 

"एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार असताना अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय आपण  घेतला. राम शिंदे आणि आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं. यासाठी मी जेव्हा पंतप्रधान मोदींना भेटलो आणि सांगितलं की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमासाठी निमंत्रित करायचं आहे. तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले की, माझ्यासमोर हा प्रश्न आहे की एकीकडे जन्मस्थळ आणि दुसरीकडे कर्मस्थळ." 

"छावा चित्रपटानंतर आजच्या पिढीला देदीप्यमान इतिहास माहिती झाला"

"मोदींनी सांगितलं की, यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्मस्थळावर मी सभा घेण्याचं ठरवलं आहे. मात्र पुढच्यावेळी जन्मस्थळावर नक्की येईल असा विश्वास पंतप्रधानांनी आपल्याला दिला. कधी-कधी इतिहास फार क्रूर असतो. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याकरता दुर्देवाने चित्रपटाची निर्मिती झाली आणि छावा चित्रपटानंतर आजच्या पिढीला देदीप्यमान इतिहास माहिती झाला. याआधीही माहिती होता पण जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आपण कुठेतरी अपयशी झालो होतो."

"अहिल्यामातांच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट तयार करणार"

"आमच्या लक्षात आलं की चित्रपट हे असं माध्यम आहे त्यामधून इतिहास सर्वांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे आपल्या मंत्रिमंडळाने असा निर्णय घेतला आहे की, अहिल्यामातांच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट आपण तयार करणार आहोत. सर्व भाषांमध्ये तयार करणार आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात अहिल्यामातांचं चरित्र, त्यांचं कर्तृत्व आणि देशावरचे उपचार हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजे हा आपला प्रयत्न आहे.  अहिल्यामातांकडून प्रेरणा घेऊन आपण काम करत आहोत" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAhilyanagarअहिल्यानगर