शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

...अन् अण्णांसोबत मंत्र्यांनाही घडला उपवास!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 10:05 IST

मुख्यमंत्र्यांसह चार मंत्री जवळपास साडे सहा तास उपाशी

मुंबई: लोकपाल, लोकायुक्ताची नेमणूक आणि कृषिमूल्य आयोगाच्या स्वायतत्तेबद्दल निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर अण्णा हजारे यांनी काल उपोषण सोडलं. अण्णा हजारेंच्या उपोषणाचा काल सातवा दिवस होता. मात्र अण्णांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्यासोबत आलेल्या मंत्र्यांनाही उपवास घडला. अण्णा हजारेंच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन काल राळेगणला आले होते. त्यांनी अण्णांसोबत जवळपास साडे पाच चर्चा केली. दुपारी दोनपासून या बैठकीला सुरुवात झाली. ही चर्चा संध्याकाळी साडेसातच्या सुमारास संपली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अण्णांसोबत पत्रकार परिषद घेतली आणि अण्णांच्या मागण्या मान्य झाल्याची माहिती दिली. यानंतर अण्णांनी उपोषण सोडलं. अण्णा हजारेंसोबतच्या बैठकीमुळे मुख्यमंत्र्यांसह त्यांच्यासोबत आलेल्या सर्वच मंत्र्यांना कडकडीत उपवास घडला. मुख्यमंत्री अण्णांच्या भेटीसाठी दुपारी राळेगणसिद्धीत दाखल झाले. त्यानंतर बंद दाराआड अण्णा हजारे, मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची चर्चा सुरू झाली. है चर्चा जवळपास साडेपाच तास चालली. अण्णा हजारेंचं उपोषण सुरू असल्यानं राळेगणसिद्धीतील सर्वांनी चूल बंद ठेवली होती. सर्व ग्रामस्थ आणि मुलं दिवसभर यादवबाबा मंदिरासमोर बसून होते. ग्रामस्थांनी जनावरंही उपोषणस्थळी आणली होती. त्यामुळे मुख्यमंत्री आणि त्यांच्यासह आलेल्या इतर मंत्र्यांना चहासुद्धा मिळू शकला नाही.  

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGirish Mahajanगिरीश महाजन