शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

'राज्यात पूरस्थिती असताना मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 06:33 IST

काँग्रेस नेते नाना पटोले यांचा आरोप

मुंबई : अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते व रहिवासी भागांत पाणी साचल्याने भीतीचे वातावरण आहे. अशा बिकट प्रसंगी राज्य आपत्ती निवारण प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असलेले मुख्यमंत्री प्रचारयात्रेत व्यस्त आहेत.मुख्यमंत्र्यांनी तातडीने उपाययोजना करून जनतेला संकटातून न काढल्यास आम्ही मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षाचा ताबा घेऊ, असा इशारा प्रदेश काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे प्रदेश काँग्रेस, मुंबई काँग्रेस व काँग्रेस प्रचार समितीच्या नेत्यांची तातडीची बैठक घेतली. या वेळी बोलताना पटोले म्हणाले, मुख्यमंत्री राज्यभर प्रचार दौरे करत असल्याने संपूर्ण यंत्रणा मुख्यमंत्र्यांची बडदास्त ठेवण्यामध्ये व्यस्त आहे. राज्याच्या मुख्य सचिवांपासून विभाग व जिल्हा स्तरावरील अधिकारी कोणतीही पावले उचलताना दिसत नाहीत, अशी टीकाही त्यांनी त्यांना केली.काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आपत्तीग्रस्तांना आवश्यक मदत व साहाय्य करावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. या बैठकीस माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, मुंबई कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, कृपाशंकर सिंह, आमदार हरिभाऊ राठोड, मोहन जोशी, चरणजित सप्रा आदी नेते उपस्थित होते.‘एसडीआरएफ फंडातून मदत द्यावी’मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, पनवेल, बदलापूर, नवी मुंबई, रायगड, पेण, नाशिक, सांगली, कोल्हापूर यांसह राज्याच्या विविध भागांत महापुराने प्रचंड थैमान घातले आहे. कित्येकांना जीव गमवावा लागत आहे. लोक जीव मुठीत घेऊन वावरत आहेत. जनावरांच्या जीवितहानीची तर गणतीच नाही. घरात पाणी घुसल्याने नागरिकांना इतरत्र आश्रय घ्यावा लागत आहे. अनेक भागांतील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने नैसर्गिक आपत्ती जाहीर करून पूरग्रस्तांना ‘राष्ट्रीय आपदा व्यवस्थापन कायदा- २००५’नुसार एसडीआरएफ फंडातून मदत वितरित करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसfloodपूरRainपाऊसNana Patoleनाना पटोले