शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

'राज्यात पूरस्थिती असताना मुख्यमंत्री प्रचारात व्यस्त'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 06:33 IST

काँग्रेस नेते नाना पटोले यांचा आरोप

मुंबई : अतिवृष्टीमुळे राज्यातील विविध भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते व रहिवासी भागांत पाणी साचल्याने भीतीचे वातावरण आहे. अशा बिकट प्रसंगी राज्य आपत्ती निवारण प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष असलेले मुख्यमंत्री प्रचारयात्रेत व्यस्त आहेत.मुख्यमंत्र्यांनी तातडीने उपाययोजना करून जनतेला संकटातून न काढल्यास आम्ही मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षाचा ताबा घेऊ, असा इशारा प्रदेश काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे प्रदेश काँग्रेस, मुंबई काँग्रेस व काँग्रेस प्रचार समितीच्या नेत्यांची तातडीची बैठक घेतली. या वेळी बोलताना पटोले म्हणाले, मुख्यमंत्री राज्यभर प्रचार दौरे करत असल्याने संपूर्ण यंत्रणा मुख्यमंत्र्यांची बडदास्त ठेवण्यामध्ये व्यस्त आहे. राज्याच्या मुख्य सचिवांपासून विभाग व जिल्हा स्तरावरील अधिकारी कोणतीही पावले उचलताना दिसत नाहीत, अशी टीकाही त्यांनी त्यांना केली.काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आपत्तीग्रस्तांना आवश्यक मदत व साहाय्य करावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. या बैठकीस माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, मुंबई कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, कृपाशंकर सिंह, आमदार हरिभाऊ राठोड, मोहन जोशी, चरणजित सप्रा आदी नेते उपस्थित होते.‘एसडीआरएफ फंडातून मदत द्यावी’मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, पनवेल, बदलापूर, नवी मुंबई, रायगड, पेण, नाशिक, सांगली, कोल्हापूर यांसह राज्याच्या विविध भागांत महापुराने प्रचंड थैमान घातले आहे. कित्येकांना जीव गमवावा लागत आहे. लोक जीव मुठीत घेऊन वावरत आहेत. जनावरांच्या जीवितहानीची तर गणतीच नाही. घरात पाणी घुसल्याने नागरिकांना इतरत्र आश्रय घ्यावा लागत आहे. अनेक भागांतील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने नैसर्गिक आपत्ती जाहीर करून पूरग्रस्तांना ‘राष्ट्रीय आपदा व्यवस्थापन कायदा- २००५’नुसार एसडीआरएफ फंडातून मदत वितरित करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसfloodपूरRainपाऊसNana Patoleनाना पटोले