मुंबई : राज्यातील अतिवृष्टीग्रस्त व पूरग्रस्तांना येत्या आठ दिवसांत सर्वसमावेशक मदत जाहीर केली जाईल आणि मदतीची रक्कम दिवाळीच्या आत बँक खात्यात जमा करण्याचा प्रयत्न असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अतिवृष्टीवर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना माहिती दिली. राज्यात सुमारे ६० लाख हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
येत्या दोन-तीन दिवसांत नुकसानीची सगळ्या प्रकारची माहिती मिळणार आहे. त्यानंतर मदतीचे सर्वंकष धोरण ठरवू. ज्यावेळी दुष्काळ पडतो, त्यावेळी ज्या सवलती देण्यात येतात त्या सर्व सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
...तर जास्तीचा तांदूळअतिवृष्टीग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू, १० किलो तांदूळ, ५ लिटर केरोसीन, ३ किलो तूरडाळ मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पिठाच्या गिरण्या बंद असतील तर तिथे १० किलो अतिरिक्त म्हणजे २० किलो तांदूळ दिला जाईल.
स्कूल बॅग, वह्याहीपाच लाख शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, सहा वह्या, पुस्तके, कंपास आणि पाण्याची बाटली देणार. त्यासाठी सीएसआर अंतर्गत मदत घेणार.
नुकसान भरपाईसाठी सर्वंकष धोरण आणणार सर्व आकडेवारी आल्यानंतर केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात येईल, केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करणारच आहे पण केंद्राच्या मदतीसाठी न थांबता खरडून गेलेली जमीन, विहिरी, पडलेली घरे यासह सर्वप्रकारच्या नुकसान भरपाईसाठी सर्वंकष धोरण अमलात आणले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
‘ते’ २,२०० कोटी रुपये नेमके कधीचे?अतिवृष्टीग्रस्तांना २२०० कोटी रुपयांच्या मदतीचे वितरण सुरू झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठवाड्यात अतिवृष्टीची पाहणी करायला गेले असतानाच स्पष्ट केले होते. हा निधी ऑगस्टपर्यंत झालेल्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्यांसाठी आहे.
बँकांकडून वसुली नाही : शेतकऱ्यांना बँकेच्या नोटीस यायचे प्रकरण एकाच जिल्ह्यात झाले आहे. त्या नोटीसही जुन्या आहेत. तिथे बँकांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. बँकांना कुठेही वसुली करू देणार नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
आरोग्य किट देणारप्राथमिक औषधे (ताप, सर्दी, खोकला आदींवर), टूथब्रश, टूथपेस्ट, तेल, त्वचारोगावरील औषधे असलेल्या पाच लाख किटचे वितरण करणार.
Web Summary : CM Fadnavis assured comprehensive aid for flood-affected people in a week, disbursing funds before Diwali. Approximately 60 lakh hectares suffered damage. The government will provide essential supplies, school kits, and healthcare kits. Banks are instructed to halt recovery efforts from farmers.
Web Summary : मुख्यमंत्री फडणवीस ने एक सप्ताह में बाढ़ प्रभावित लोगों के लिए व्यापक सहायता का आश्वासन दिया, दिवाली से पहले धन का वितरण। लगभग 60 लाख हेक्टेयर में नुकसान हुआ। सरकार आवश्यक आपूर्ति, स्कूल किट और स्वास्थ्य किट प्रदान करेगी। बैंकों को किसानों से वसूली के प्रयासों को रोकने के निर्देश दिए गए हैं।