शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

Surya Grahan 2019 : कंकणाकृती सूर्यग्रहणावर ढगाळ वातावरणाचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 06:36 IST

Surya Grahan 2019 : खराब हवामानाचा शेतीला फटका: काही ठिकाणी पावसाची शक्यता

मुंबई : लक्षद्वीपपासून उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत एक कमी दाबाचा पट्टा विस्तारत आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही विभिन्न वाऱ्यांचे संगम क्षेत्र तयार झालेले आहे. या सगळ्याचा परिणाम होऊन मुंबईसह नागपूर, अकोला, नाशिक, पुणे येथे तुरळक पावसाची शक्यता आहे. तसेच २६ डिसेंबर रोजी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असल्याने गुरुवारी होणाºया कंकणाकृती सूर्यग्रहणावर सावट आले आहे.

बुधवारी पहाटे आणि दिवसभरात मुंबई-ठाण्यासह नाशिक व सांगली भागात तुरळक शिडकावाही झाला. दरम्यान पाऊस व ढगाळ हवामानामुळे श्ोतीचे नुकसान झाले आहे. मंगळवारप्रमाणेच बुधवारीदेखील मुंबई आणि आसपासच्या परिसरातील वातावरण ढगाळ होते. मुंबईकर थंडीची वाट पाहत असतानाच त्यांना पावसाची भेट मिळाली. बुधवारी मुंबईचे किमान तापमान २४.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. तर राज्यातील बहुतांशी शहरांचे किमान तापमान १८ अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात आणि कोकण-गोव्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. विदर्भाच्या काही भागात व कोकण-गोव्याच्या उर्वरित भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर विदर्भाच्या उर्वरित भागात किंचित वाढ झाली आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान गोंदिया येथे १४.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

पावसाची शक्यता२६ डिसेंबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर २७ ते २९ डिसेंबर रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण-गोवा व विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात वाºयाचे एक संगम क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बºयाच भागांत तसेच मध्य आणि पूर्व मध्य प्रदेशात विखुरलेला पाऊस पडेल. विदर्भ आणि मराठवाड्यात एक-दोन ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.हवेचा दर्जा वाईटकुलाबा व भांडुप येथील हवेचा दर्जा मध्यम असून बोरीवली व चेंबूर येथील हवेचा दर्जा पूर्णत: घसरल्याची नोंद करण्यात आली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुंबईतील बीकेसी, मालाड व वरळी येथील हवेचा दर्जा अत्यंत वाईट असल्याची नोंद ‘सफर’ने केली आहे.मुंबईसह महाराष्ट्रात २६ डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. २७ डिसेंबरपासून अंशत: निरभ्र आकाश राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.- कृष्णानंद होसाळीकर, उपमहासंचालक,मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग

टॅग्स :solar eclipseसूर्यग्रहणsurya grahanसूर्यग्रहणenvironmentपर्यावरण