शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 06:24 IST

पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे...

मुंबई : उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक या भागात अडकले होते. त्यात नांदेड जिल्ह्यातील ११ व इतर जिल्ह्यांतील ४० अशा ५१ पर्यटकांचा समावेश असून हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन केंद्र व उत्तरकाशी जिल्हा आपत्ती केंद्राशी राज्य सरकारकडून संपर्क साधला जात आहे. पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तराखंडचे सचिव दिलीप जवळकर, पोलिस महानिरीक्षक नीलेश भरणे यांच्याशी संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरवण्याची विनंती केली आहे. प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणणे हीच प्राथमिकता आहे, असे ते म्हणाले. 

मालेगावचे सात यात्रेकरू संपर्काबाहेर -उत्तराखंडमधील धराली गावात ढगफुटीमुळे झालेल्या दुर्घटनेनंतर यात्रेसाठी गेलेल्या शहरातील सात जणांचा संपर्क होत नसल्याने त्यांच्या नातेवाइकांच्या चिंता वाढल्या आहेत. राज्य व केंद्र सरकारने त्यांचा शोध घेत सर्वांना सुखरूप परत आणावे, अशी मागणी त्यांच्या परिवाराने केली आहे.  छत्रपती संभाजीनगरातून गेलेले १८, सोलापूरचे ४, पुण्यातील २४ आणि जळगावचे २२ भाविक सुखरूप आहेत. संपर्कासाठी क्रमांक :  राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र - ९३२११५८७१४३/ ०२२-२२०२७९९०/०२२-२२७९४२२९ राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, उत्तराखंड : ०१३५-२७१०३३४/८२१८८६७००५

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रUttarakhandउत्तराखंड