शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

दहावी, बारावी फेरतपासणी : केवळ अडीच हजार विद्यार्थ्यांच्या गुणांत बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 05:13 IST

- दीपक जाधवपुणे -  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ) बारावीच्या फेरतपासणीसाठी आलेल्या २२ हजार अर्जांपैकी केवळ २ हजार ३७४ पेपरच्या व दहावी फेरतपासणीसाठी आलेल्या १३ हजार अर्जांपैकी २ हजार २२५ पेपरच्या गुणांमध्ये बदल झाला आहे. सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांच्या तुलनेत राज्य मंडळांकडे फेरतपासणी आलेल्या आलेल्या अर्जांची ...

- दीपक जाधवपुणे -  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ) बारावीच्या फेरतपासणीसाठी आलेल्या २२ हजार अर्जांपैकी केवळ २ हजार ३७४ पेपरच्या व दहावी फेरतपासणीसाठी आलेल्या १३ हजार अर्जांपैकी २ हजार २२५ पेपरच्या गुणांमध्ये बदल झाला आहे. सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांच्या तुलनेत राज्य मंडळांकडे फेरतपासणी आलेल्या आलेल्या अर्जांची संख्या व गुणांत झालेले बदल यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे.राज्य मंडळाच्या मुंबई, पुणे, कोकण, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर, नाशिक, अमरावती या विभागीय मंडळांमधून दहावीसाठी १४ लाख १६ हजार ९८६ तर बारावीसाठी १६ लाख  २८ हजार ६१३ इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंंतर पेपर तपासणीवर शंका उपस्थित करून फेरतपासणीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होते.गुणपडताळणी, छायांकित प्रत व पुनर्मूल्यांकन या तीन पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करून घेता येते. गुणपडताळणीसाठी अर्ज केल्यास केवळ उत्तरपत्रिकेमधील प्रश्नांना देण्यात आलेल्या गुणांची बेरीज तपासण्यात येते. बारावीच्या गुणपडताळणीसाठी राज्य मंडळाकडे ३ हजार ४३८ अर्ज झाले होते. त्यापैकी केवळ १७० उत्तरपत्रिकांमध्ये गुणांमध्ये बदल झाले. तर दहावीच्या गुणपडताळणीसाठी आलेल्या १ हजार ३९६ अर्जांपैकी ५० उत्तरपत्रिकांच्या गुणांमध्ये बदल झाले.पुनर्मूल्यांकनामध्ये संपूर्ण उत्तरपत्रिका पुन्हा तपासली जाते. राज्य मंडळाकडे बारावीच्या २ हजार ६६० उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज आले होते, त्यापैकी केवळ १ हजार ३८३ उत्तरपत्रिकांच्या गुणात बदल झाले. तर दहावीचे २ हजार १४७ अर्ज पुनर्मूल्यांकनासाठी आले, त्यापैकी १ हजार ३७२ गुणपत्रिकांच्या अर्जात बदल झाला.राज्य मंडळ तसेच विभागीय मंडळस्तर पेपर तपासणीच्या मुख्य नियामकांच्या वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या. त्यामुळे पेपर तपासणी काटेकोरपणे होण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांचे फेरतपासणीसाठी आलेले अर्जही लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. विभागस्तरावर प्रत्येक विषयनिहाय ३ सदस्यांच्या समितीकडून त्याचा वेगाने निपटारा करण्यात आला.- शकुंतला काळे, अध्यक्ष, राज्य मंडळ

टॅग्स :examपरीक्षाSSC Results 2018दहावी निकाल २०१८HSC Result 2018बारावी निकाल २०१८