शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

दहावी, बारावी फेरतपासणी : केवळ अडीच हजार विद्यार्थ्यांच्या गुणांत बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 05:13 IST

- दीपक जाधवपुणे -  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ) बारावीच्या फेरतपासणीसाठी आलेल्या २२ हजार अर्जांपैकी केवळ २ हजार ३७४ पेपरच्या व दहावी फेरतपासणीसाठी आलेल्या १३ हजार अर्जांपैकी २ हजार २२५ पेपरच्या गुणांमध्ये बदल झाला आहे. सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांच्या तुलनेत राज्य मंडळांकडे फेरतपासणी आलेल्या आलेल्या अर्जांची ...

- दीपक जाधवपुणे -  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ) बारावीच्या फेरतपासणीसाठी आलेल्या २२ हजार अर्जांपैकी केवळ २ हजार ३७४ पेपरच्या व दहावी फेरतपासणीसाठी आलेल्या १३ हजार अर्जांपैकी २ हजार २२५ पेपरच्या गुणांमध्ये बदल झाला आहे. सीबीएसई, आयसीएसई आदी बोर्डांच्या तुलनेत राज्य मंडळांकडे फेरतपासणी आलेल्या आलेल्या अर्जांची संख्या व गुणांत झालेले बदल यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे.राज्य मंडळाच्या मुंबई, पुणे, कोकण, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर, नाशिक, अमरावती या विभागीय मंडळांमधून दहावीसाठी १४ लाख १६ हजार ९८६ तर बारावीसाठी १६ लाख  २८ हजार ६१३ इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंंतर पेपर तपासणीवर शंका उपस्थित करून फेरतपासणीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होते.गुणपडताळणी, छायांकित प्रत व पुनर्मूल्यांकन या तीन पद्धतीद्वारे विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करून घेता येते. गुणपडताळणीसाठी अर्ज केल्यास केवळ उत्तरपत्रिकेमधील प्रश्नांना देण्यात आलेल्या गुणांची बेरीज तपासण्यात येते. बारावीच्या गुणपडताळणीसाठी राज्य मंडळाकडे ३ हजार ४३८ अर्ज झाले होते. त्यापैकी केवळ १७० उत्तरपत्रिकांमध्ये गुणांमध्ये बदल झाले. तर दहावीच्या गुणपडताळणीसाठी आलेल्या १ हजार ३९६ अर्जांपैकी ५० उत्तरपत्रिकांच्या गुणांमध्ये बदल झाले.पुनर्मूल्यांकनामध्ये संपूर्ण उत्तरपत्रिका पुन्हा तपासली जाते. राज्य मंडळाकडे बारावीच्या २ हजार ६६० उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज आले होते, त्यापैकी केवळ १ हजार ३८३ उत्तरपत्रिकांच्या गुणात बदल झाले. तर दहावीचे २ हजार १४७ अर्ज पुनर्मूल्यांकनासाठी आले, त्यापैकी १ हजार ३७२ गुणपत्रिकांच्या अर्जात बदल झाला.राज्य मंडळ तसेच विभागीय मंडळस्तर पेपर तपासणीच्या मुख्य नियामकांच्या वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या. त्यामुळे पेपर तपासणी काटेकोरपणे होण्यास मदत झाली. विद्यार्थ्यांचे फेरतपासणीसाठी आलेले अर्जही लवकर निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. विभागस्तरावर प्रत्येक विषयनिहाय ३ सदस्यांच्या समितीकडून त्याचा वेगाने निपटारा करण्यात आला.- शकुंतला काळे, अध्यक्ष, राज्य मंडळ

टॅग्स :examपरीक्षाSSC Results 2018दहावी निकाल २०१८HSC Result 2018बारावी निकाल २०१८