शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

राज्यातील नागरिकही आमच्याच सोबत - नरेश म्हस्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 10:19 IST

नागरिक तुमच्यासोबत नाहीत, असा अपप्रचार केला जात असल्याचे म्हस्के यांनी नमूद केले.

नरेश म्हस्के प्रवक्ते, शिंदेसेनाखासदार, आमदार, लोकप्रतिनिधी तुमच्यासोबत असले, तरी नागरिक तुमच्यासोबत नाहीत, असा अपप्रचार केला जात आहे. परंतु, जे खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आले आहेत, ते नागरिकांच्या विश्वासावरच आले आहेत. त्यामुळे अपप्रचाराचे परिणाम येत्या काही दिवसांत दिसतील. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम मुख्यमंत्री करीत आहेत. देशाच्या विकासासाठी मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे, देशाची अर्थव्यवस्था बळकट करायची आहे, विकासाची कामे करायची आहेत, म्हणूनच आम्ही महायुतीत आहोत.

मुंबईत सहा मतदारसंघ आहेत, त्यातील तीन शिंदेसेनेला मिळतील, तर तीन मतदारसंघांत भाजप लढेल. या सहा मतदारसंघांतून विकासाची कामे नागरिकांपर्यंत नेण्याचे काम केले जात आहे. मतदार याद्यांवर काम करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी १० शिवदूतांची नेमणूक केली आहे. मुंबई ठाण्याच्या जागेचा तिढा अद्याप सुटला नसला, तरी काही दिवसांत उमेदवाराची घोषणा होईल. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढावा, अशी अपेक्षा असते. त्यामुळे ठाण्यावर कोणी दावा केला, तर त्यात गैर काहीच नाही. परंतु, जो कोणी उमेदवार असेल, तो महायुतीचा असेल. आम्ही तर मोदी हेच आमचे उमेदवार आहेत, असे समजतो. ठाणे जिल्हा शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. ठाण्यासह इतर आजूबाजूच्या शहरांचा विकास होत असून, ठाणे हे राहण्यायोग्य शहर असल्याने या शहराला प्राधान्य दिले जात आहे.

यापूर्वीही शिवसेनेची होती, यापुढेही शिवसेनेचीच राहणार आहे. 'गद्दारी विरुद्ध निष्ठावंत' अशी टीका केली जाते, परंतु बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी कोणी केली? ज्या काँग्रेसने नेहमी सावरकरांचा तिरस्कार केला, त्यांच्या मांडीला मांडी लावून कोण बसले आहे?, महायुतीचा धर्म कोणी मोडला?, हिंदुत्वाचे विचार बाजूलाकोणी सारले?, ज्या दिवशी काँग्रेससोबत जाण्याची वेळ येईल, त्या दिवशी मी माझा पक्ष बंद करेन, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगायचे. मात्र, त्याच काँग्रेसबरोबर जवळीक कोणी साधली?, स्वार्थासाठी हिंदुत्वाला तिलांजली देत मुख्यमंत्रीपद कोणी मिळविले?, त्यामुळे गद्दार व निष्ठावंत कोण, हे आम्हाला कोणी सांगायची गरज नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्राने अनेक बदल पाहिले. बंद प्रकल्प सुरू केले. मुंबई, ठाणे जिल्ह्यात विकासाची कामे झपाट्याने झाली आहेत. रस्त्यांची कामे, मेट्रो, कोस्टल रोड, सौंदर्गीकरणाची कामे आदींसह वाहतूककोंडी सोडविण्यावर भर दिला आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shiv Senaशिवसेना