शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
4
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
5
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
6
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
7
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
8
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
9
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
10
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
11
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
12
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
13
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
14
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
15
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
16
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
17
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
18
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
19
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
20
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...

Citizen Amendment Bill: काँग्रेसचा दबाव आल्यानं शिवसेना संभ्रमात?; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 19:14 IST

नागरिकत्व सुधारणा विधेयकावरील बदललेल्या भूमिकेवरुन फडणवीसांची शिवसेनेवर टीका

मुंबई: नागरिकत्व सुधारणा विधेयकावरील बदललेल्या भूमिकेवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. काल शिवसेनेनं लोकसभेत विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं. मग आता राज्यसभेतील मतदानाआधी शिवसेना संभ्रमात कशामुळे आहे, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसनं शिवसेनेवर दबाव आणल्यानं शिवसेनेच्या भूमिकेत बदल झाला का, असा प्रश्नदेखील त्यांनी विचारला. शिवसेनेनं लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिला. मात्र आज दुपारी पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधेयकाबद्दल स्पष्टता आवश्यक असल्याचं म्हटलं. सरकारनं विधेयकाबाबतची भूमिका स्पष्ट न केल्यास राज्यसभेत विधेयकाला विरोध करू, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. त्यावर फडणवीसांनी जोरदार टीका केली. शिवसेनेनं लोकसभेत विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं. मात्र आता राज्यसभेतील मतदानाआधी शिवसेना संभ्रमात आहे. काँग्रेसचा दबाव आल्यानं सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेनं भूमिका बदलली का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवसेना आपली जुनी भूमिका बदलणार नाही, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली.उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला जवळपास दोन आठवडे झाले आहेत. मात्र अद्याप त्यांनी खातेवाटप केलेलं नाही. त्यावरुनही फडणवीसांनी ठाकरेंना लक्ष्य केलं. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं अद्याप खातेवाटपच केलेलं नाही. अशा परिस्थितीत उत्तरं कोण देणार, असा सवाल त्यांनी विचारला. उद्धव ठाकरेंसह काँग्रेस, राष्ट्रवादीनं शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली होती. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या मागणीचं पुढे काहीच झालेलं नाही, असं फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेlok sabhaलोकसभाShiv Senaशिवसेना