शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Citizen Amendment Bill: काँग्रेसचा दबाव आल्यानं शिवसेना संभ्रमात?; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 19:14 IST

नागरिकत्व सुधारणा विधेयकावरील बदललेल्या भूमिकेवरुन फडणवीसांची शिवसेनेवर टीका

मुंबई: नागरिकत्व सुधारणा विधेयकावरील बदललेल्या भूमिकेवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. काल शिवसेनेनं लोकसभेत विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं. मग आता राज्यसभेतील मतदानाआधी शिवसेना संभ्रमात कशामुळे आहे, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसनं शिवसेनेवर दबाव आणल्यानं शिवसेनेच्या भूमिकेत बदल झाला का, असा प्रश्नदेखील त्यांनी विचारला. शिवसेनेनं लोकसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिला. मात्र आज दुपारी पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधेयकाबद्दल स्पष्टता आवश्यक असल्याचं म्हटलं. सरकारनं विधेयकाबाबतची भूमिका स्पष्ट न केल्यास राज्यसभेत विधेयकाला विरोध करू, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. त्यावर फडणवीसांनी जोरदार टीका केली. शिवसेनेनं लोकसभेत विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं. मात्र आता राज्यसभेतील मतदानाआधी शिवसेना संभ्रमात आहे. काँग्रेसचा दबाव आल्यानं सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेनं भूमिका बदलली का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवसेना आपली जुनी भूमिका बदलणार नाही, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली.उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला जवळपास दोन आठवडे झाले आहेत. मात्र अद्याप त्यांनी खातेवाटप केलेलं नाही. त्यावरुनही फडणवीसांनी ठाकरेंना लक्ष्य केलं. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारनं अद्याप खातेवाटपच केलेलं नाही. अशा परिस्थितीत उत्तरं कोण देणार, असा सवाल त्यांनी विचारला. उद्धव ठाकरेंसह काँग्रेस, राष्ट्रवादीनं शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी केली होती. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या मागणीचं पुढे काहीच झालेलं नाही, असं फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेlok sabhaलोकसभाShiv Senaशिवसेना