शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

CAA: मुस्लिमांना काँग्रेसनं कायम व्होट मशीन मानलं; गडकरींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 12:58 IST

काँग्रेसनं मुस्लिमांसाठी काय केलं; नितीन गडकरींचा सवाल

नागपूर: काँग्रेसनं मुस्लिमांना केवळ व्होट मशीन मानलं. त्यामुळे त्यांच्याकडून सुरू असलेल्या अपप्रचाराला बळी पडू नका, असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. सुधारित नागरिकत्व कायदा मुस्लिमविरोधी नसल्याचं स्पष्ट करत त्यांनी काँग्रेसवर शरसंधान साधलं. काँग्रेसनं मुस्लिमांसाठी काय केलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नागपुरात सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते. हिंदू असणं पाप आहे का, असा सवाल उपस्थित करत नितीन गडकरींनी शेजारील देशांमधील अल्पसंख्यांकांच्या परिस्थितीवर भाष्य केलं. पाकिस्तानमध्ये आधी 19 टक्के हिंदू होते. आता तिथे केवळ 3 टक्के हिंदू आहेत. मुस्लिम नागरिकांना शरणार्थी म्हणून आश्रय देण्यासाठी जगात 100 ते 150 देश आहेत. मात्र हिंदू, बौद्ध, इसाई, पारशी लोकांसाठी कोणताही देश नाही, असं गडकरी म्हणाले. जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधींनी शरणार्थींना संकटकाळी आधार देण्याचं आश्वासन दिलं होतं. आमचं सरकार तेच करतंय. शरणार्थींना नागरिकत्व देतंय. त्यात काय चुकलं, असा सवाल त्यांनी विचारला.सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे मुस्लिमांवर कोणताही अन्याय होणार नाही. नवा कायदा अल्पसंख्यांक विरोधी नाही, असं गडकरींनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. काँग्रेसनं परदेशी लोकांसाठी रेड कार्पेट अंथरलं. व्होट बँकेसाठी त्यांनी राजकारण केलं. मात्र संघात कधीच द्वेष शिकवला नाही. मुस्लिमांना देशाबाहेर काढा असं कुणीही म्हटलेलं नाही. आम्ही धर्म न पाहता विकास करतो, असं गडकरी म्हणाले. भारतानं कायम सर्वांना स्वीकारलं आहे. आपण विस्तारवादी नाही. रतन टाटा पारशी आहेत. तरीही देशानं त्यांचा स्वीकार केला. आपण कुठलाही भेदभाव करत नाही. आपल्या देशाच्या मुस्लिमांना सौदीमध्ये हिंदुस्तानीच म्हणतात. हिंदुत्व देशाची संस्कृती आणि ओळख आहे. आम्हाला कुणी सहिष्णुता शिकवू नये, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. व्हॉट बँकेसाठी काही पक्ष लोकांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण करत असल्याची टीका त्यांनी केली.  अस्पृश्यता, जातीयवाद आम्हाला दूर करायचा आहे. राम मंदिराची पहिली शिळा अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्यानेच ठेवली आहे. हिंदुत्व हेच आमचं राष्ट्रीयत्व असल्याचं स्पष्ट करत गडकरींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा दाखला दिला. शिवरायांनी कधीच जातीय भेदभाव केलेला नाही. त्यांनी एकही मशीद तोडली नाही. तेच आमचे आदर्श आहेत, असं गडकरींनी सांगितलं.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNitin Gadkariनितीन गडकरीcongressकाँग्रेस