शहरं
Join us  
Trending Stories
1
जे शिंदेंना मिळालं नाही ते नितीश कुमारांना मिळणार; बिहारमध्ये पुन्हा CM पद, फॉर्म्युला ठरला
2
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
3
ट्रम्प यांचा यु-टर्न! अमेरिकेच्या 'या' निर्णयानं भारताला होणार २६ हजार कोटींचा फायदा, 'यांना' मिळणार मोठा लाभ
4
सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास
5
Chandrayaan 4: भारत चंद्रावर जाणार; तेथील नमुने पृथ्वीवर आणणार, चांद्रयान-४ मोहिमेला सरकारची मंजुरी
6
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
7
Mumbai: मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर भीषण अपघात; ६० फुटांवरून पडून सुपरवायझरचा मृत्यू!
8
GenZ च्या आंदोलनामुळे हादरलेल्या नेपाळमध्ये अखेर निवडणुकांची घोषणा, मार्च महिन्यात मतदान
9
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
10
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
11
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
12
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
13
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
14
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
15
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
16
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
17
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
18
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
19
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
20
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईसारख्या शहरात आता लोकसंख्या दोन कोटींच्या घरात, मूलभूत स्रोतांची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 05:55 IST

मुंबईसारख्या शहरात आता लोकसंख्या दोन कोटींच्या घरात जाऊन पोहोचली आहे. आणि तरीही रोजीरोटीसाठी मुंबईत रोज इतर राज्यांतून येणाºया लोकांची आवक चालूच आहे.

- अ. पां. देशपांडेमुंबईसारख्या शहरात आता लोकसंख्या दोन कोटींच्या घरात जाऊन पोहोचली आहे. आणि तरीही रोजीरोटीसाठी मुंबईत रोज इतर राज्यांतून येणाºया लोकांची आवक चालूच आहे. इतक्या लोकांना सामावून घेण्याएवढी घरे, रस्ते, रेल्वे आणि बस वाहतुकीची साधने, पाणी, वीज या स्रोतांची टंचाई जाणवत आहे. त्यामुळेच सप्टेंबर महिन्यात एल्फिन्स्टन रोड स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीसारखे अपघात घडून येतात. या शहराचे क्षेत्रफळ मर्यादित आहे. त्यामुळे शहर विस्तारायला भूभाग नसल्याने येथील इमारती आता बहुमजली होत आहेत. पूर्वी त्या चार चार माजली असत आता त्या १२ - १२ मजली होऊ लागल्या आहेत. या शहरातील जे श्रीमंत लोक आहेत, त्यांनी राहत्या घरांशिवाय आणखी एक किंवा दोन-दोन घरे घेतली असून ती कुलूप लावून बंद ठेवली आहेत. अशा घरांची संख्याच मुळी काही लाखात आहे. भाजीविके, फेरीवाले किरकोळ दुकानदार यांच्या सोयी नीट न केल्याने ते शहरातील मोकळ्या जागांवर ठाण मांडून बसले आहेत. उदा. चर्चगेट स्टेशनजवळील क्र ॉस मैदान झोपडपट्टी आणि फिरस्त्या करमणूकवाल्यांनी व्यापले आहे. या ठिकाणी हे फेरीवाले गर्दी करून आपापला माल विकतात. तेव्हा अशा लोकांसाठी स्वस्तात पण बहुमजली इमारतीत सोय करायला हवी. म्हणजे या जागा परत मोकळ्या झाल्या तर लोकांना श्वास घ्यायला मोकळी जागा लाभेल. यासाठी हवाई दलातील निवृत्त अधिकारी मधू सावंत (आता वय वर्षे ९१) यांनी सुमारे २५ वर्षांपूर्वी एक योजना महापालिकेकडून मंजूर करून घेतली आहे. ती योजना अशी आहे की, प्रत्येक संस्थेने, शाळेने, सोसायटीने, दुकानदाराने, आपल्या समोरच्या मोकळ्या जागेची माहिती महापालिकेला पुरवावी. त्याचा एक नकाशा महापालिकेला द्यावा. तेथे छोटा बगीचा बनवावा. यासाठी महापालिका एक रुपयाच्या फीमध्ये परवानगी देते. त्यामुळे येथे आक्रमण होणार नाही आणि महापालिकेला हवी तेव्हा ती जागा ताब्यात घेता येईल.मुंबईचा २0१४ - ३४ या काळाचा विकास आराखडा तयार असून तो आता शासनाच्या मंजुरीअधीन आहे. त्यावर वास्तुशिल्पी आणि नगर नियोजन महाविद्यालयात शिकणाºया मुलांकडून सूचना मागवण्याचा उपक्रम मुंबई महानगरपालिका आणि आॅपरेशन रिसर्च फाउंडेशनने केला. त्याला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद आला असून त्यातील बक्षीसपात्र सूचनांचा एक अहवाल तयार झाला आहे. तो सायली उदास मंकीकर आणि प्राची मर्चंट या दोघींनी संपादित केला. त्या सूचनातील एक सूचना अशी आहे की, लंडन, स्कॉटलंड, फ्रान्स, हॉलंड या ठिकाणी घरे रिकामी ठेवल्यास त्यावर दंड बसतो. तशी पद्धत मुंबईत आणावी, जेणेकरून लाखावर रिकामी घरे भाड्याने दिली जातील. यामुळे शहरातील झोपडपट्टी काही प्रमाणात कमी व्हायला मदत होईल. शहरे सांस्कृतिकदृष्ट्या पुढारलेली करण्यासाठी त्या त्या शहराच्या गरजा लक्षात घेऊन, नाटक - सिनेमा - क्रीडा - आर्टगॅलरी - तरण तलाव अशा सोयी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यायला हव्यात. या गोष्टी मुंबईत झाल्या तर भविष्यात त्या पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद येथेही करता येतील.(संदर्भ - इनोव्हेटिव्ह आयडियाज फ्रॉम स्टुडंट्स आॅन मुंबई मेकओव्हर )