शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

CIDCO Land Scam Case : आघाडी सरकारच्या काळात प्रकल्पग्रस्तांना जमिनी दिल्या, सिडको प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 12:56 IST

पावसाळी अधिवेशनाच्या आज दुस-या दिवशी विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नागपूर- पावसाळी अधिवेशनाच्या आज दुस-या दिवशी विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यालाही मुख्यमंत्र्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. सिडको जमीन घोटाळ्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्या आरोपांचं मुख्यमंत्र्यांनी खंडन केलं. विरोधी पक्षांनी अर्धी वस्तुस्थिती मांडली आहे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आघाडी सरकारच्या काळात प्रकल्पग्रस्तांना जमिनी दिल्या गेल्या आहेत.आघाडी सरकारच्या काळात 660 हेक्टर जमिनीचं वाटप झालं होतं. या जमिनी जिल्हाधिका-यांच्या अखत्यारितील आहेत. आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्याधिका-यांचे अधिकार वाढवण्यात आले. जमीन व्यवहाराचे अधिकार पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत, त्यामुळे त्याचा मंत्र्यांशी किंवा मंत्रालयाशी संबंध नाही. कुणाच्या तरी सांगण्यावरून आरोप करू नका, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी पृथ्वीराज चव्हाणांना दिला आहे.सिडको प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करू, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. सिडकोच्या जमीन वाटप प्रकरणासह यापूर्वीच्या सरकारमध्ये अशाच प्रकारे देण्यात आलेल्या 200 जमीन प्रकरणांची न्यायालयीन चौकशी केली जाईल. मी काचेच्या घरात राहत नाही, त्यामुळे दुसऱ्यावर दगड मारण्यापूर्वी विचार करा, मी राजीनामा देणार नाही, पण तुम्ही खोटे आरोप केलेत म्हणून विरोधी पक्ष नेत्यांनी राजीनामे द्यावेत, असा पवित्राही मुख्यमंत्र्यांनी घेतला. विरोधकांनी खोटे आरोप केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची माफी मागावी यासाठी सत्ताधारी आमदार आक्रमक झालेत. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८cidcoसिडकोcongressकाँग्रेस