शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
2
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
3
“मुंबईकर उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवतील, मविआच्या ५० जागाही येणार नाही”; भाजपाचा दावा
4
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
5
तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार
6
इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...
7
पूजा खेडकर हिला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
8
Jyoti Malhotra : "पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
9
सोनिया आणि राहुल गांधी यांना झाला १४२ कोटींचा फायदा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचा कोर्टात आरोप   
10
मुलांचं लग्न जमवताना एकमेकांच्या प्रेमात पडले व्याही आणि विहीण! लग्नासाठी कोर्टात पोहोचले पण... 
11
डॉक्टर की कसाई...! ५० जणांच्या हत्येनंतरही हात थरथरले नाहीत; अंगावर काटा आणणारी थरारक घटना
12
'एक नंबर तुझी कंबर' व्हायरल गाण्यावर नारकर कपलचा डान्स, व्हिएतनाममधून शेअर केला Video
13
Mumbai Rains: मुंबईत पावसाचा हाहाकार! पवईत झाड कोसळल्याने दोन जण जखमी, एकाची प्रकृती गंंभीर
14
'ऑपरेशन सिंदूर'बाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रा. अली खानला अंतरिम जामीन मंजूर
15
बापरे! गर्लफ्रेंड आहे की डाकू, बॉयफ्रेंडला रस्त्यात अडवला, कपडे फाटेपर्यंत चप्पलने मारले; छातीवर बसून गळा ...
16
“SCचे टॉप ५ जज सुट्ट्यांमध्ये कामावर, तरी प्रलंबित याचिकांचे खापर आमच्यावर”; CJI गवई संतापले
17
Mangal Gochar 2025: जूनमध्ये कुंजकेतू योग संघर्ष वाढवणार, 'या' पाच राशींना अधिक सतर्क राहावे लागणार!
18
पाकिस्तानची वाटचाल लष्करी राजवटीच्या दिशेने...; असीम मुनीर बनले दुसरे फिल्ड मार्शल
19
सोनं पुन्हा १ लाखाच्या जवळ? चांदीही ३००० नी महागली, तुमच्या शहरातील दर काय?
20
"मला अभिनयही करायचा आहे...", अभिजीत सावंतने व्यक्त केली इच्छा, बिग बॉसनंतर पुन्हा मिळाली प्रसिद्धी

गुणवत्तावाढीसाठी शाळांची होणार निवड

By admin | Updated: May 2, 2015 01:10 IST

सर्व शिक्षा अभियानांतर्गत सन २०१५-१६ या वर्षात गुणवत्तावाढीचा नवीन उपक्रम राज्यात राबविण्यात येणार आहे. त्याच्या अंमलबजावणीकरिता

अकोला : सर्व शिक्षा अभियानांतर्गत सन २०१५-१६ या वर्षात गुणवत्तावाढीचा नवीन उपक्रम राज्यात राबविण्यात येणार आहे. त्याच्या अंमलबजावणीकरिता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शाळांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या शाळांमध्ये गुणवत्तावाढीचा उपक्रम राबविण्यात येईल. शाळा निवडीची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली.राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने केलेले राज्यस्तरावरील सर्वेक्षण आणि विविध संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता समाधानकारक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर सन २०१५-१६ या वर्षात सर्व शिक्षा अभियान अंतर्गत नवीन उपक्रमामध्ये निवडक शाळांना गुणवत्तावाढीसाठी विशिष्ट कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या प्रकल्प मान्यता मंडळामार्फत आर्थिक तरतूद मंजूर केली आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत गुणवत्तावाढीसाठी शाळांची निवड करण्याचा निर्णय २१ एप्रिल रोजी घेण्यात आला. त्याच्या अंमलबजावणीकरिता राज्यात ३६ जिल्ह्यांमध्ये ४०८ गट आणि शहर साधन केंद्रांच्या समूह साधन केंद्रांतर्गत शाळांची निवड करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)