शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

राज्यात चिकुनगुनियाचा फैलाव, रुग्ण वाढले; नागपूरमध्ये सर्वाधिक संसर्ग, मुंबई दुसऱ्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 05:58 IST

देशात १२,५८७ रुग्ण, त्यापैकी सर्वाधिक ४,७९२ रुग्ण महाराष्ट्रात

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले आहेत. गेल्या सहा वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक  ५,७५७ रुग्ण २०२४ मध्ये सापडले आहेत. त्यात पहिल्या क्रमांकावर नागपूर शहर आणि दुसऱ्या क्रमांकावर मुंबई आहे. यंदा रुग्ण मोठ्या संख्येने वाढल्याने वैद्यकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय झाला आहे.

चिकुनगुनिया हा विषाणूजन्य आजार एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस डासांच्या संक्रमित मादीपासून फैलावतो. डेंग्यूसारखी लक्षणे असली तरी या आजारासाठी भिन्न उपचारांची आवश्यकता असते. राज्याच्या आरोग्य विभागामार्फत रुग्ण शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. 

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ऑक्टोबर २०२४ पर्यंत चिकुनगुनिया रुग्णांची माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार या आजाराचे १२,५८७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ४,७९२ रुग्ण महाराष्ट्रात आढळले. तर दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे. तेथे २,२१३ रुग्ण आढळले आहेत.

लक्षणे काय?

  • रुग्णाला दोन ते बारा दिवस जास्त ताप येतो. 
  • सांधे दुखतात, काही रुग्णांमध्ये वेदना अनेक आठवडे, महिनेही टिकतात. 
  • सांध्यांना सूज येते.
  • आजारपणाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी अंगावर पुरळ येतो.
  • डोकेदुखी, डोके दाबल्यासारखे जाणवते.

यापूर्वी या आजाराचे रुग्ण राज्याच्या ग्रामीण भागात आढळत असत. आता मुंबईतही त्यांची संख्या वाढली आहे.  या आजारात लक्षणानुसार औषध दिले जाते. आजूबाजूच्या परिसरात डास होणार नाही, याची दक्षता घ्या, डासांपासून संरक्षण करा. कुठल्याही प्रकारचा ताप आणि अंगदुखी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. - डॉ. विनायक सावर्डेकर, सहयोगी प्राध्यापक, मेडिसिन विभाग, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल  

टॅग्स :Healthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्र