शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

आरक्षण टिकवण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची - उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 06:02 IST

मागण्यांबाबत आश्वासन : हे आरक्षण सरकारने दिले नसून समाजाने मिळवले

मुंबई : मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतरही मराठा क्रांती ठोक मोर्चाने इतर प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी उपोषण सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मराठा आरक्षण कोर्टात नक्की टिकेल, कारण आरक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारली असल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी आरक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ढकलली.

उद्धव ठाकरे म्हणाले, आंदोलनातील हुतात्मा कार्यकर्त्यांची जाणीव ठेवून आंदोलकांनी उपोषण सुरूच ठेवल्याचे समजले. त्यामुळे उद्धव यांनी आझाद मैदानात जाऊन आंदोलकांची भेट घेतली. ज्या कार्यकर्त्यांनी हौतात्म्य पत्करत आरक्षण मिळवून दिले, त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही. मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व शासकीय नोकरी मिळवून देण्यासाठी शिवसेना प्रयत्न करेल. तसेच आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेल्या कार्यकर्त्यांची धरपकड थांबवत गुन्हे मागे घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन उद्धव यांनी उपोषणकर्त्यांना दिले. आरक्षण हे सरकारने दिलेले नसून ते समाजाने मिळवले असल्याचेही उद्धव यांनी नमूद केले.शिवसेना पक्षप्रमुखांच्या आश्वासनानंतर उपोषण मागेशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेत असल्याची घोषणा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक नानासाहेब जावळे-पाटील यांनी केली. उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागण्या मान्य करून घेण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण सोडत असल्याचेही जावळे-पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणUddhav Thackerayउद्धव ठाकरे