शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

राज्यात मुख्यमंत्र्यांचा कॉमेडी शो...; मविआच्या सभेतून नाना पटोलेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 20:27 IST

कुणीही आत्महत्या करू नका, आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्या लोकांना सत्तेतून बाहेर काढा असं आवाहन नाना पटोलेंनी केले.

नागपूर - राज्यात ईडीचं सरकार आहे. महाविकास आघाडीची सभा होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या दंगलीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. भाजपाचा पर्दाफाश संभाजीनगर सभेने केला. नागपूरच्या सभेचा वादही कोर्टात गेला. भाजपा का घाबरते? चोर के दाढी मे तिनका, ही परिस्थिती आज भाजपाची झालीय. देशातील सर्वात महागडे शहर नागपूर आहे. कर्जाने आणलेला देखावा दिसतो. या शहरात जे आणले ते कर्जरुपाने आणले. लोकांचे खिसे कापले जातात. नागपूरकारांना लुटले जातेय अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर हल्लाबोल केला. 

नाना पटोले म्हणाले की, अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अधिवेशनात सरकारने मदत करावी यासाठी आम्ही सातत्याने मागणी केली. राज्यात मुख्यमंत्र्यांचा कॉमेडी शो सुरू आहे. अजितदादा खूप हसतात. पण शेतकऱ्यांना एक पैसाची मदत केली नाही. २-३ दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. आत्महत्या मोठ्या प्रमाणात होतेय, राज्याच्या सरकारला देणेघेणे नाही. जाहिरातीवर १ हजार कोटी निधी प्रस्तावित केला आहे असा आरोप त्यांनी केला. 

तसेच अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. त्यात धर्माधिकारी यांनी मनुष्य ही जात आणि मानवता हा धर्म आहे अशा शब्दात त्यांनी व्यासपीठावरूनच सत्ताधाऱ्यांचे कान टोचले. राज्यातील जनतेचा पैसा तुटलेल्या एसटीवर लावून कोट्यवधी रुपये जाहिरातीवर खर्च केले जात आहे. ९ कंपन्यांना शासकीय व्यवस्थेत काम दिले गेले. जनतेच्या कामाचा पैसा कर रुपाने घेतला जातो. पण त्याचा वापर प्रशासकीय वापरातून लोकांसाठी करणे गरजेचा आहे. पण आऊटसोर्सिंग करून तरुणांची फसवणूक केली जात आहे. कंत्राटदारांची व्यवस्था निर्माण केलीय असा आरोप नाना पटोले यांनी म्हटलं. 

दरम्यान, कुणीही आत्महत्या करू नका, आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्या लोकांना सत्तेतून बाहेर काढा. स्वयंस्फूर्तीने लोक महाविकास आघाडीच्या सभेला येतील. लोकांचा राग पाहायला मिळणार आहे. माध्यमांना मी रोज सांगत होतो. ते संजय राऊतांचे ऐकतात, आमचं ऐकत नाही. राज्यात जनता राजा आहे. सत्ताधारी राजा नाही. मतदानाच्या रुपाने सत्ताधाऱ्यांना जाग आणण्याचं काम जनतेने करावं. महाविकास आघाडीच्या प्रत्येक सभेला ताकदीने यावे. सगळ्यांच्या एकतेमुळे जागा जिंकत चाललोय. राहुल गांधींना कितीही घाबरवण्याचं काम झाले, सदस्य रद्द केले, बेघर केले या सर्व गोष्टीची चीड यायला पाहिजे. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदे