शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

राज्यात मुख्यमंत्र्यांचा कॉमेडी शो...; मविआच्या सभेतून नाना पटोलेंचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 20:27 IST

कुणीही आत्महत्या करू नका, आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्या लोकांना सत्तेतून बाहेर काढा असं आवाहन नाना पटोलेंनी केले.

नागपूर - राज्यात ईडीचं सरकार आहे. महाविकास आघाडीची सभा होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या दंगलीकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. भाजपाचा पर्दाफाश संभाजीनगर सभेने केला. नागपूरच्या सभेचा वादही कोर्टात गेला. भाजपा का घाबरते? चोर के दाढी मे तिनका, ही परिस्थिती आज भाजपाची झालीय. देशातील सर्वात महागडे शहर नागपूर आहे. कर्जाने आणलेला देखावा दिसतो. या शहरात जे आणले ते कर्जरुपाने आणले. लोकांचे खिसे कापले जातात. नागपूरकारांना लुटले जातेय अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर हल्लाबोल केला. 

नाना पटोले म्हणाले की, अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अधिवेशनात सरकारने मदत करावी यासाठी आम्ही सातत्याने मागणी केली. राज्यात मुख्यमंत्र्यांचा कॉमेडी शो सुरू आहे. अजितदादा खूप हसतात. पण शेतकऱ्यांना एक पैसाची मदत केली नाही. २-३ दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. आत्महत्या मोठ्या प्रमाणात होतेय, राज्याच्या सरकारला देणेघेणे नाही. जाहिरातीवर १ हजार कोटी निधी प्रस्तावित केला आहे असा आरोप त्यांनी केला. 

तसेच अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. त्यात धर्माधिकारी यांनी मनुष्य ही जात आणि मानवता हा धर्म आहे अशा शब्दात त्यांनी व्यासपीठावरूनच सत्ताधाऱ्यांचे कान टोचले. राज्यातील जनतेचा पैसा तुटलेल्या एसटीवर लावून कोट्यवधी रुपये जाहिरातीवर खर्च केले जात आहे. ९ कंपन्यांना शासकीय व्यवस्थेत काम दिले गेले. जनतेच्या कामाचा पैसा कर रुपाने घेतला जातो. पण त्याचा वापर प्रशासकीय वापरातून लोकांसाठी करणे गरजेचा आहे. पण आऊटसोर्सिंग करून तरुणांची फसवणूक केली जात आहे. कंत्राटदारांची व्यवस्था निर्माण केलीय असा आरोप नाना पटोले यांनी म्हटलं. 

दरम्यान, कुणीही आत्महत्या करू नका, आत्महत्या करायला भाग पाडणाऱ्या लोकांना सत्तेतून बाहेर काढा. स्वयंस्फूर्तीने लोक महाविकास आघाडीच्या सभेला येतील. लोकांचा राग पाहायला मिळणार आहे. माध्यमांना मी रोज सांगत होतो. ते संजय राऊतांचे ऐकतात, आमचं ऐकत नाही. राज्यात जनता राजा आहे. सत्ताधारी राजा नाही. मतदानाच्या रुपाने सत्ताधाऱ्यांना जाग आणण्याचं काम जनतेने करावं. महाविकास आघाडीच्या प्रत्येक सभेला ताकदीने यावे. सगळ्यांच्या एकतेमुळे जागा जिंकत चाललोय. राहुल गांधींना कितीही घाबरवण्याचं काम झाले, सदस्य रद्द केले, बेघर केले या सर्व गोष्टीची चीड यायला पाहिजे. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदे