शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

VIDEO: मुख्यमंत्री शिंदेंनी वारकऱ्यांचंही मन जिंकलं! अपघातग्रस्त वारकरी बांधवाना केला व्हिडिओ कॉल अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 15:40 IST

शिंदे यांनी आपल्या व्यग्र कामाकाजातून वेळ काढून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अपघातग्रस्त वारकरी बांधवांची विचारपूस केली. 

मुंबई-

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे कामाला लागले आहेत. त्यांनी आज मंत्रालयात अधिकृतरित्या मुख्यमंत्री कार्यालयात उपस्थित राहून पदभार स्वीकारला असला तरी ज्या दिवशी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याच दिवसापासून शिंदे कामाला लागल्याचं पाहायला मिळालं. सांगली येथील रस्ते अपघातात पंढरीच्या वारीला जाणारे काही वारकरी जखमी झाल्याची माहिती कळताच स्वत: मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांना फोन करुन अपघातग्रस्त वारकऱ्यांवर तातडीनं उपचार करुन त्यांना जी काही मदत लागेल ती करण्याचं आश्वासन दिलं होतं. तसंच गरज पडल्यास त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. आज शिंदे यांनी आपल्या व्यग्र कामाकाजातून वेळ काढून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अपघातग्रस्त वारकरी बांधवांची विचारपूस केली. 

जखमी वारकऱ्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची विचारपूस करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील विटा येथी आमदार अनिल बाबर रुग्णालयात पोहोचले होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हिडिओ कॉल लावून अपघातग्रस्तांशी संवाद साधून दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जखमी वारकऱ्यांची आपुलकीचं विचारपूस केली आणि तब्येतीची विचारणा केली. 

 

व्हिडिओ कॉलमध्ये काय म्हणाले मुख्यमंत्री?"तब्येत कशीय तुमची? डॉक्टरांशी बोललो आहे मी त्यांच्याशी बोलणं झालंय ते सारं पाहतील. तुम्ही काळजी घ्या. आता कसंय बरं वाटतंय ना? बरं वाटेल तुम्हाला काळजी करू नका. जी काही लागेल ती व्यवस्था डॉक्टरांना करायला सांगितली आहे", असा आधार एकनाथ शिंदे अपघातग्रस्त वारकऱ्याला दिला. 

मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांना केल्या होत्या सूचनामिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून या अपघाताबाबत माहिती घेऊन या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शवली आहे. याबाबत त्यांनी स्वत: रुग्णालयातील डॉक्टरांशी फोनवरुन संवाद साधला होता. मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी फाट्याजवळ आज एक भीषण अपघात घडला. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पीक अप जीप घुसून झालेल्या या अपघातात 14 वारकरी जखमी झाले. जखमींना तातडीने मिरज सिव्हिल आणि कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मिरजेचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदे यांना फोन लावून या वारकऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यासोबत त्यांना लागतील ते सर्व उपचार करावेत. वेळ पडल्यास त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करावे त्यांच्यावरील उपचारात कोणतीही कसूर ठेवू नका असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यासाठी लागेल तो खर्च उचलण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाAshadhi Ekadashiआषाढी एकादशीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022