शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

VIDEO: मुख्यमंत्री शिंदेंनी वारकऱ्यांचंही मन जिंकलं! अपघातग्रस्त वारकरी बांधवाना केला व्हिडिओ कॉल अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 15:40 IST

शिंदे यांनी आपल्या व्यग्र कामाकाजातून वेळ काढून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अपघातग्रस्त वारकरी बांधवांची विचारपूस केली. 

मुंबई-

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे कामाला लागले आहेत. त्यांनी आज मंत्रालयात अधिकृतरित्या मुख्यमंत्री कार्यालयात उपस्थित राहून पदभार स्वीकारला असला तरी ज्या दिवशी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याच दिवसापासून शिंदे कामाला लागल्याचं पाहायला मिळालं. सांगली येथील रस्ते अपघातात पंढरीच्या वारीला जाणारे काही वारकरी जखमी झाल्याची माहिती कळताच स्वत: मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांना फोन करुन अपघातग्रस्त वारकऱ्यांवर तातडीनं उपचार करुन त्यांना जी काही मदत लागेल ती करण्याचं आश्वासन दिलं होतं. तसंच गरज पडल्यास त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. आज शिंदे यांनी आपल्या व्यग्र कामाकाजातून वेळ काढून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अपघातग्रस्त वारकरी बांधवांची विचारपूस केली. 

जखमी वारकऱ्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची विचारपूस करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील विटा येथी आमदार अनिल बाबर रुग्णालयात पोहोचले होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हिडिओ कॉल लावून अपघातग्रस्तांशी संवाद साधून दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जखमी वारकऱ्यांची आपुलकीचं विचारपूस केली आणि तब्येतीची विचारणा केली. 

 

व्हिडिओ कॉलमध्ये काय म्हणाले मुख्यमंत्री?"तब्येत कशीय तुमची? डॉक्टरांशी बोललो आहे मी त्यांच्याशी बोलणं झालंय ते सारं पाहतील. तुम्ही काळजी घ्या. आता कसंय बरं वाटतंय ना? बरं वाटेल तुम्हाला काळजी करू नका. जी काही लागेल ती व्यवस्था डॉक्टरांना करायला सांगितली आहे", असा आधार एकनाथ शिंदे अपघातग्रस्त वारकऱ्याला दिला. 

मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांना केल्या होत्या सूचनामिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून या अपघाताबाबत माहिती घेऊन या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शवली आहे. याबाबत त्यांनी स्वत: रुग्णालयातील डॉक्टरांशी फोनवरुन संवाद साधला होता. मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी फाट्याजवळ आज एक भीषण अपघात घडला. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पीक अप जीप घुसून झालेल्या या अपघातात 14 वारकरी जखमी झाले. जखमींना तातडीने मिरज सिव्हिल आणि कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मिरजेचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदे यांना फोन लावून या वारकऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यासोबत त्यांना लागतील ते सर्व उपचार करावेत. वेळ पडल्यास त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करावे त्यांच्यावरील उपचारात कोणतीही कसूर ठेवू नका असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यासाठी लागेल तो खर्च उचलण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाAshadhi Ekadashiआषाढी एकादशीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022