शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: मुख्यमंत्री शिंदेंनी वारकऱ्यांचंही मन जिंकलं! अपघातग्रस्त वारकरी बांधवाना केला व्हिडिओ कॉल अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 15:40 IST

शिंदे यांनी आपल्या व्यग्र कामाकाजातून वेळ काढून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अपघातग्रस्त वारकरी बांधवांची विचारपूस केली. 

मुंबई-

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे कामाला लागले आहेत. त्यांनी आज मंत्रालयात अधिकृतरित्या मुख्यमंत्री कार्यालयात उपस्थित राहून पदभार स्वीकारला असला तरी ज्या दिवशी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याच दिवसापासून शिंदे कामाला लागल्याचं पाहायला मिळालं. सांगली येथील रस्ते अपघातात पंढरीच्या वारीला जाणारे काही वारकरी जखमी झाल्याची माहिती कळताच स्वत: मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांना फोन करुन अपघातग्रस्त वारकऱ्यांवर तातडीनं उपचार करुन त्यांना जी काही मदत लागेल ती करण्याचं आश्वासन दिलं होतं. तसंच गरज पडल्यास त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. आज शिंदे यांनी आपल्या व्यग्र कामाकाजातून वेळ काढून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अपघातग्रस्त वारकरी बांधवांची विचारपूस केली. 

जखमी वारकऱ्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची विचारपूस करण्यासाठी सांगली जिल्ह्यातील विटा येथी आमदार अनिल बाबर रुग्णालयात पोहोचले होते. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हिडिओ कॉल लावून अपघातग्रस्तांशी संवाद साधून दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जखमी वारकऱ्यांची आपुलकीचं विचारपूस केली आणि तब्येतीची विचारणा केली. 

 

व्हिडिओ कॉलमध्ये काय म्हणाले मुख्यमंत्री?"तब्येत कशीय तुमची? डॉक्टरांशी बोललो आहे मी त्यांच्याशी बोलणं झालंय ते सारं पाहतील. तुम्ही काळजी घ्या. आता कसंय बरं वाटतंय ना? बरं वाटेल तुम्हाला काळजी करू नका. जी काही लागेल ती व्यवस्था डॉक्टरांना करायला सांगितली आहे", असा आधार एकनाथ शिंदे अपघातग्रस्त वारकऱ्याला दिला. 

मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांना केल्या होत्या सूचनामिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून या अपघाताबाबत माहिती घेऊन या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शवली आहे. याबाबत त्यांनी स्वत: रुग्णालयातील डॉक्टरांशी फोनवरुन संवाद साधला होता. मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी फाट्याजवळ आज एक भीषण अपघात घडला. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पीक अप जीप घुसून झालेल्या या अपघातात 14 वारकरी जखमी झाले. जखमींना तातडीने मिरज सिव्हिल आणि कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मिरजेचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदे यांना फोन लावून या वारकऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यासोबत त्यांना लागतील ते सर्व उपचार करावेत. वेळ पडल्यास त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करावे त्यांच्यावरील उपचारात कोणतीही कसूर ठेवू नका असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यासाठी लागेल तो खर्च उचलण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाAshadhi Ekadashiआषाढी एकादशीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022