शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही; CM एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 16:44 IST

आज बाळासाहेबांना अभिप्रेत होतं ते काम आपण करतोय. सत्तेपेक्षा नाव मोठं असतं आणि ते जपायचे असते असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

रत्नागिरी - महाराष्ट्रातले शेकडो कार्यकर्ते आपल्यासोबत येतायेत. त्यांना बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल होण्याचा ओढा लागला आहे. आमचे पाऊल चुकीचे असते तर एवढे लोक आले असते का? सुरुवातीपासून बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसैनिकाने एकनाथ शिंदेंना साथ दिली आणि राज्यात सत्तांतर घडले. बाळासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत कार्यकर्त्यांना मोठे केले. परंतु स्वार्थासाठी, मोहापायी, खुर्चीसाठी बाळासाहेबांची भूमिका आणि त्यांचे विचार बाजूला सारून जे काही घडले ते अघटित आहे. कोकणी माणसाचे बाळासाहेबांशी अतूट नाते आहे. शिवसेना आणि धनुष्यबाणाची त्यांची बांधिलकी आहे. खरी शिवसेना आपल्याकडे आहे. विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला. 

शिवसंकल्प अभियानासाठी मुख्यमंत्री रत्नागिरीत आले होते. इथं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मला काय मिळेल यापेक्षा माझ्या शिवसैनिकाला काय मिळेल, या राज्याला काय मिळेल याचा विचार आम्ही केला. आम्ही मागचा पुढचा विचार न करता जे धाडस केले ते संपूर्ण जगाने पाहिले आहे. अनेक लोकांना चिंता होती. आपण घेतलेली भूमिका योग्य आहे हे अनेकांना वाटत होते पण त्यात यश मिळेल की नाही याबाबत शंका होती. परंतु जनतेच्या आशीर्वादाने ते यश मिळाले. आमची भूमिका चुकीची आणि स्वार्थासाठी असती तर जनतेने आमच्याकडे पाठ फिरवली असती. आज इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित झाला ही आमच्या कामाची पोचपावती आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच आज बाळासाहेबांना अभिप्रेत होतं ते काम आपण करतोय. सत्तेपेक्षा नाव मोठं असतं आणि ते जपायचे असते. आज बाळासाहेबांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण करतायेत. कलम ३७० हटवलं, राम मंदिर उभारलं मग बाळासाहेबांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार कुणाला आहे? जे टिंगळटवाळी करत होते त्यांना मंदिर बांधूनही दाखवले आणि उद्घाटनाची तारीखही सांगितली. राम मंदिराचा विषय आपण कधीही राजकीय केला नाही. हा श्रद्धेचा, अस्मितेचा आणि भावनेचा विषय आहे. आपण जे बोलतो त्याचे परिणाम काय होतील हे समजून बोलायला हवे. बाळासाहेब असते तर मोदींना शाबासकी दिली असती. परंतु आज त्यांच्यावर टीका करताय. राम मंदिराच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करताय असं शिंदेंनी म्हटलं. 

अहंकारापोटी केंद्राकडे पैसै मागितले नाहीत

आपण आज महायुती म्हणून काम करतोय. गेली ५०-६० वर्ष जी कामे झाली नाहीत ती गेल्या साडे नऊ वर्षात होतायेत. आज केंद्राकडून आपल्याला भरघोस निधी मिळतोय. परंतु पूर्वी अहंकारापोटी केंद्र सरकारकडे पैसे मागितले जात नव्हते. तुम्ही अडीच वर्षात महाराष्ट्रात कित्येक वर्ष मागे नेले. जर आम्ही हा निर्णय घेतला नसता तर आज आपण आणखी मागे पडलो असतो. अत्यंत विचार करून आम्ही हा निर्णय घेतला. देशाच्या विकासात महाराष्ट्र कुठेही कमी राहता कामा नये. राज्यात तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचं काम उद्योगमंत्री करतायेत असं शिंदेंनी सांगितले. 

महाराष्ट्र आपलं कुटुंब आहे

काही लोकांनी गरीबी हटावचा नारा दिला. त्यात गरिबांनाच हटवले. परंतु मागील ९ वर्षात मोदींनी गरिबांसाठी कित्येक योजना आणल्या. आपण आपलं पोट भरायचे आणि समोरच्याला काही द्यायचे नाही. देण्याची दानत लागते. आपले सरकार हे देणारे आहे. शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजार रुपये दिले जातात. १ रुपयांत पीकविमा देण्याचा निर्णय महाराष्ट्राने पहिल्यांदा घेतला. महिलांना ५० टक्के एसटी सवलत देण्याचा निर्णय घेतला. महिला सक्षमीकरणाचा निर्णय घेतला. महिलांना स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी बचत गटांना निधी दिला जातोय. योजना आणि निर्णय यापूर्वीदेखील होते. परंतु त्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळत नव्हता. महाराष्ट्र हे आपलं कुटुंब आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरते मर्यादित आपलं काम नाही. हे सरकार सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने स्थापन झाले आहे असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीShiv Senaशिवसेना