शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही; CM एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 16:44 IST

आज बाळासाहेबांना अभिप्रेत होतं ते काम आपण करतोय. सत्तेपेक्षा नाव मोठं असतं आणि ते जपायचे असते असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

रत्नागिरी - महाराष्ट्रातले शेकडो कार्यकर्ते आपल्यासोबत येतायेत. त्यांना बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल होण्याचा ओढा लागला आहे. आमचे पाऊल चुकीचे असते तर एवढे लोक आले असते का? सुरुवातीपासून बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसैनिकाने एकनाथ शिंदेंना साथ दिली आणि राज्यात सत्तांतर घडले. बाळासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीत कार्यकर्त्यांना मोठे केले. परंतु स्वार्थासाठी, मोहापायी, खुर्चीसाठी बाळासाहेबांची भूमिका आणि त्यांचे विचार बाजूला सारून जे काही घडले ते अघटित आहे. कोकणी माणसाचे बाळासाहेबांशी अतूट नाते आहे. शिवसेना आणि धनुष्यबाणाची त्यांची बांधिलकी आहे. खरी शिवसेना आपल्याकडे आहे. विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला. 

शिवसंकल्प अभियानासाठी मुख्यमंत्री रत्नागिरीत आले होते. इथं कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मला काय मिळेल यापेक्षा माझ्या शिवसैनिकाला काय मिळेल, या राज्याला काय मिळेल याचा विचार आम्ही केला. आम्ही मागचा पुढचा विचार न करता जे धाडस केले ते संपूर्ण जगाने पाहिले आहे. अनेक लोकांना चिंता होती. आपण घेतलेली भूमिका योग्य आहे हे अनेकांना वाटत होते पण त्यात यश मिळेल की नाही याबाबत शंका होती. परंतु जनतेच्या आशीर्वादाने ते यश मिळाले. आमची भूमिका चुकीची आणि स्वार्थासाठी असती तर जनतेने आमच्याकडे पाठ फिरवली असती. आज इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित झाला ही आमच्या कामाची पोचपावती आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच आज बाळासाहेबांना अभिप्रेत होतं ते काम आपण करतोय. सत्तेपेक्षा नाव मोठं असतं आणि ते जपायचे असते. आज बाळासाहेबांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण करतायेत. कलम ३७० हटवलं, राम मंदिर उभारलं मग बाळासाहेबांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार कुणाला आहे? जे टिंगळटवाळी करत होते त्यांना मंदिर बांधूनही दाखवले आणि उद्घाटनाची तारीखही सांगितली. राम मंदिराचा विषय आपण कधीही राजकीय केला नाही. हा श्रद्धेचा, अस्मितेचा आणि भावनेचा विषय आहे. आपण जे बोलतो त्याचे परिणाम काय होतील हे समजून बोलायला हवे. बाळासाहेब असते तर मोदींना शाबासकी दिली असती. परंतु आज त्यांच्यावर टीका करताय. राम मंदिराच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करताय असं शिंदेंनी म्हटलं. 

अहंकारापोटी केंद्राकडे पैसै मागितले नाहीत

आपण आज महायुती म्हणून काम करतोय. गेली ५०-६० वर्ष जी कामे झाली नाहीत ती गेल्या साडे नऊ वर्षात होतायेत. आज केंद्राकडून आपल्याला भरघोस निधी मिळतोय. परंतु पूर्वी अहंकारापोटी केंद्र सरकारकडे पैसे मागितले जात नव्हते. तुम्ही अडीच वर्षात महाराष्ट्रात कित्येक वर्ष मागे नेले. जर आम्ही हा निर्णय घेतला नसता तर आज आपण आणखी मागे पडलो असतो. अत्यंत विचार करून आम्ही हा निर्णय घेतला. देशाच्या विकासात महाराष्ट्र कुठेही कमी राहता कामा नये. राज्यात तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचं काम उद्योगमंत्री करतायेत असं शिंदेंनी सांगितले. 

महाराष्ट्र आपलं कुटुंब आहे

काही लोकांनी गरीबी हटावचा नारा दिला. त्यात गरिबांनाच हटवले. परंतु मागील ९ वर्षात मोदींनी गरिबांसाठी कित्येक योजना आणल्या. आपण आपलं पोट भरायचे आणि समोरच्याला काही द्यायचे नाही. देण्याची दानत लागते. आपले सरकार हे देणारे आहे. शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजार रुपये दिले जातात. १ रुपयांत पीकविमा देण्याचा निर्णय महाराष्ट्राने पहिल्यांदा घेतला. महिलांना ५० टक्के एसटी सवलत देण्याचा निर्णय घेतला. महिला सक्षमीकरणाचा निर्णय घेतला. महिलांना स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी बचत गटांना निधी दिला जातोय. योजना आणि निर्णय यापूर्वीदेखील होते. परंतु त्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळत नव्हता. महाराष्ट्र हे आपलं कुटुंब आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी एवढ्यापुरते मर्यादित आपलं काम नाही. हे सरकार सर्वसामान्यांच्या आशीर्वादाने स्थापन झाले आहे असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीShiv Senaशिवसेना