शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

हाेय, आम्ही महाविकास आघाडीत होतो, मात्र...; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 08:55 IST

ठाकरे सरकारमध्ये आम्ही दोघेही होतो; परंतु आम्ही मुख्यमंत्री नव्हतो. आम्ही योजना घेऊन जायचो, त्यावर निर्णयच होत नव्हता.

छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही दोघेही मंत्री होतो; परंतु माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे योजनेचा प्रस्ताव घेऊन गेल्यावर ते निर्णयच घेत नव्हते, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी सुभेदारी विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना केली.

मुख्यमंत्री म्हणाले, विरोधी पक्षाला एकच सांगायचे की, त्यांनी अडीच वर्षांत घोषणाही केल्या नाहीत. प्रकल्पांसाठी निधी मिळणारच आहे. जे कधी मंत्रालयात गेले नाहीत, ते काय घोषणा करणार. ठाकरे सरकारमध्ये आम्ही दोघेही होतो; परंतु आम्ही मुख्यमंत्री नव्हतो. आम्ही योजना घेऊन जायचो, त्यावर निर्णयच होत नव्हता. त्याचा अनुभव अजित पवारांनाही आहे. इच्छाशक्ती असलेला मुख्यमंत्री पाहिजे. आम्ही सरकार पलटवले नसते तर राज्य आणखी मागे गेले असते, आता राज्य पहिल्या क्रमांकावर आले आहे. जेव्हा जायचे होते, शेतकऱ्यांच्या बांधावर तेव्हा गेले नाहीत. तेव्हा तर घराजवळदेखील कुणाला येऊ देत नव्हते. तेव्हा नीट राहिले असते तर हे दिवसदेखील आले नसते, अशी टीकाही शिंदे यांनी ठाकरेंवर केली. 

मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांचे मत असे...मनोज जरांगे यांना मुख्यमंत्र्यांनीच उपोषणाला बसविले, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. यावर मुख्यमंत्री म्हणाले, पटोले यांना राज्यात कुणीही गांभीर्याने घेत नाही. त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावे, आंदोलनामागे शिंदेंचा हात आहे का म्हणून, जरांगे यांनी माझ्या आवाहनाला मान दिला. मराठा आरक्षणासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. गृहमंत्र्यांवर केलेले आरोप खोटे असून, त्यांनी पोलिस लाठीमारप्रकरणी माफी मागितली आहे. कुणबी नोंद असेल तर मराठ्यांना आरक्षण देण्यास ओबीसींना आक्षेप नाही. सरसकट आरक्षण देण्यास ओबीसींचा विराेध आहे. त्यामुळे अशी कोणतीही भूमिका, राज्याची नाही. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही. जे सध्या आरोप करीत आहे, त्यांच्या नाकर्तेपणामुळे सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकले नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे