शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

...म्हणून त्यांच्या छातीत धडकी भरलीय; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 18:28 IST

आत्मविश्वास होता म्हणून ५० आमदारांसोबत १३ खासदार माझ्यासोबत आहेत.

मुंबई - महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार गेल्या ५ महिन्यापासून सुरू आहे. त्यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. छातीत धडकी भरलीय. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार कुणाला आहे? ज्यांनी बाळासाहेबांचे हिंदुत्व मोडले त्यांना आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. सत्तेच्या खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार मोडले. हिंदुत्व सोडले आणि तडजोड केली त्यांना शिकवण्याची आम्हाला आवश्यकता नाही असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही कामाख्या देवीला जाहीरपणे जाणार आहे. आम्ही बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी हे सरकार स्थापन केले. आम्ही जे करतो ते उघडपणे करतोय. कुठल्याही मंदिरात जाण्यास अडथळा नाही. जे करतो ते निधड्या छातीनं करतो. माझ्यासोबत मंत्री होते. मीडिया होती त्यामुळे आम्ही जे करतो ते लपूनछपून करत नाही. उघड करतो. दिवसाढवळ्या करतो. काही लपून करतात. त्यामुळे आम्हाला शिकवू नका. आत्मविश्वास होता म्हणून ५० आमदारांसोबत १३ खासदार माझ्यासोबत आहेत. महाविकास आघाडी सरकार कुणासाठी काम करायचं? हे सर्वसामान्यांना मान्य नव्हते. म्हणून त्यांच्या मनातील सरकार स्थापन केले. ३० जूनला ज्यांना हात दाखवायचा त्यांना दाखवला आहे असा टोलाही त्यांनी लगावला. 

महाराष्ट्राची १ इंचही जागा जाऊ देणार नाही कर्नाटकच्या विषयावर मी आधीच भाष्य केले आहे. २०१२ चा विषय आहे. तेव्हा कुणाचे सरकार होते. गेल्या अडीच वर्षात सीमाप्रश्नावर काय केले? एकनाथ शिंदे सीमाप्रश्नावर आंदोलन करून ४० दिवस जेलमध्ये होतो. त्यामुळे आम्हाला सांगू नका. सीमावासियांना मिळणाऱ्या योजना मविआनं बंद केल्या. सीमावर्ती भागात मराठी माणसाला न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतोय. महाराष्ट्राची एक इंचही जागा कुठेही जाऊ देणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. 

...म्हणून विरोधक राजकारण करतायेतछत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही. मागील ४ महिन्यापासून आमचं सरकार लोकहितासाठी काम करतंय. १०० पेक्षा जास्त निर्णय घेतलेत. त्यामुळे विरोधी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकलीय. त्यामुळे ते राजकारण करतायेत असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे