शहरं
Join us  
Trending Stories
1
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
2
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
3
"पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौथ्या टप्प्यातच बहुमत मिळाले", अमित शाहांचा मोठा दावा
4
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
5
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
6
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
7
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
8
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
9
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
10
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
11
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
12
लवंगाचे पाणी आरोग्यासाठी रामबाण, मिळतील आश्चर्यकारक फायदे!
13
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
14
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
15
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
16
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
17
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
18
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
19
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
20
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

सार्वजनिक वाहतुकीसाठी विजेवरील वाहनांचा वापर वाढवणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 6:24 AM

विजेवर चालणाऱ्या वाहनांचा (ई-व्हेइकल) वापर वाढविण्यासाठी राज्य सरकारने गुरुवारी टाटा मोटर्स

मुंबई : विजेवर चालणाऱ्या वाहनांचा (ई-व्हेइकल) वापर वाढविण्यासाठी राज्य सरकारने गुरुवारी टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा व ईईएसएल या कंपन्यांसोबत पाच महत्त्वाचे सामंजस्य करार केले. आगामी काळात सरकारी तसेच महानगरांमधील सार्वजनिक वाहतुकीसाठी ई व्हेइकलचा वापर वाढविणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी केली.मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले. राज्य सरकारने ई व्हेइकल धोरणाच्या अनुषंगाने आज शासकीय कार्यालये, सार्वजनिक तसेच खासगी वाहतूक सेवांमध्ये ई व्हेइकलचा वापर, चार्जिंग केंद्रे उभारणे आदीविषयी सामंजस्य करार केले. महिंद्रा समूह व उद्योग विभागातील करारानुसार महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी ही चाकण येथील प्रकल्पात विजेवर चालणाºया गाड्यांच्या उत्पादन क्षमतेत वाढ करणार आहे. या वाहनांसाठी लागणारे सुटे भाग तयार करणार आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक व खासगी वाहतूक व्यवस्थेसाठी इलेक्ट्रिक कार पुरविण्यासाठी महिंद्रा कंपनी सरकारला सहकार्य करणार आहे. तर, टाटा मोटर्स राज्य सरकारला एक हजार इलेक्ट्रिक वाहने पुरविणार असून, ई व्हेइकलसाठी राज्यामध्ये शंभर चार्जिंग केंद्रे उभारणार आहे. एनर्जी इफिशियन्सची सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) सार्वजनिक बांधकाम विभाग व सामान्य प्रशासन विभागाला विजेवर चालणाºया कार तसेच या वाहनांसाठी चार्जिंग सुविधा पुरविणार आहे. राज्यात विजेवरील वाहनांच्या वापर धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचा पर्यावरण विभाग ईईएसएलला निधी पुरविणार असून, त्याबाबतच्या सामंजस्य करारावरही सह्या झाल्या.पर्यावरणपूरक सुलभ, दळणवळण व शाश्वत वाहतूक व्यवस्था वाढविण्यावर सरकारचा भर आहे. त्यासाठी प्रदूषणमुक्त अशा विजेवर चालणाºया वाहनांच्या वापराचे धोरण तयार केले आहे. सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात देशात होत असलेले मोठे बदल स्वीकारण्यासाठी राज्याने पुढाकार घेतला आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.मुख्यमंत्र्यांकडून इलेक्ट्रिक कारचे लोकार्पणपेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दराला टक्कर देण्यासाठी निर्माण केलेल्या इलेक्ट्रिक व झूम कार अर्थात चार्जिंगवरील व बॅटरीवरील कारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून गेटवे आॅफ इंडिया येथे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी इलेक्ट्रिक कारमधून परिसरात फेरफटका मारला.मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांनी केला विजेवर चालणाºया बसमधून मंत्रालय ते गेटवे प्रवासमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी मंत्रालयात उभारण्यात आलेल्या ई चार्जिंग सेंटरचे उद्घाटन केले. त्यानंतर मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री महोदयांनी विजेवर चालणाºया बेस्टच्या बसमधून मंत्रालय ते गेटवे आॅफ इंडिया या मार्गावर प्रवास केला. या वेळी आमदार राज पुरोहित, संयुक्त राष्ट्र संघ - पर्यावरणचे कार्यकारी संचालक इरिक सोल्हेम, महिंद्रा कंपनीचे आनंद महिंद्रा आदींनीही या बसमधून प्रवास केला.